tag:blogger.com,1999:blog-47429102820465087742024-03-13T15:41:41.546-07:00शब्दकळा<p>
आता वंदीतसे। देवी शारदेस।
जिचा वाग्विलास। नित्य नवा।
</p><p>
चातुर्य-वागर्थ। कलेची स्वामिनी।
विश्वासी मोहिनी। घालिते जी॥
</p><p>
- श्री अभंग ज्ञानेश्वरी नित्यपाठ स्तोत्र</p>Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.comBlogger69125tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-25595955468935640902020-07-06T02:50:00.000-07:002021-05-11T07:17:29.332-07:00सारांश ...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण १ - 'स्व' चे मूळ स्वरूप</span><br style="box-sizing: border-box;" />'स्वरूपाचा' अर्थ आपले व्यक्तिमत्व असा नसून ती संकल्पना एका निर्वैयक्तिक आणि सर्वसमावेशक अशा विशुद्ध चैतन्याच्या अखंड अनुभूतीकडे इशारा करते. अहंकार, अस्मिता इत्यादिंच्या परिघात इंद्रियांच्या संयोगाने आलेल्या अनुभवांमुळे जन्माला आलेला, तसेच संस्कारांनी आणि वासनांनी बद्ध असलेला व्यक्तिमत्वदर्शक 'मी' आणि स्व-स्वरूप यात गल्लत होता कामा नये. सच्चिदानंद, देव, ज्ञान, ह्रदय, तुरिय/ तुर्यातीत, 'आत्मन' तसेच 'सहज स्थिती' अशा अनेकविध संकल्पनांचा उल्लेख रमण महर्षी स्व-स्वरूपाचे किंवा आत्मसाक्षात्कारी स्थितीचे समानार्थी किंवा पर्यायवाचक शब्द या स्वरूपात करत असत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण २ - स्वरूपाचे भान, स्वरूपाविषयीचे अज्ञान आणि साधकांच्या श्रेणी</span>अध्यात्मिक साधकांच्या ढोबळमानाने तीन श्रेणी असतात. आपल्या मूळ स्वरूपाविषयीची फक्त जाणीव करून देताच पहिल्या आणि सगळ्यात उच्च कोटीच्या साधकांना तत्क्षणी आत्मसाक्षात्कार होतो. ही 'सद्योमुक्ती' असते. ही श्रेणी वगळून इतर साधकांना 'क्रममुक्ती' साधावी लागते. दुसर्या श्रेणीतल्या काही पूर्वाभ्यास असलेल्या साधकांना अल्प काळ का होईना आत्मस्वरूपाचे चिंतन, मनन, निदीध्यास साधल्याने त्यांच्या आत्मस्थितीची बैठक एकदम पक्की होते. या श्रेणीतल्या साधकांनाही फारसे सायास घ्यावे लागत नाहीत. तिसर्या श्रेणीतल्या अध्यात्मिक साधकांना तुलनेने काहीसे दुर्दैवी म्हणावे लागेल, कारण कित्येक तपांच्या महत्प्रयासाने केलेल्या साधनेनंतरच अशांना आत्मलाभ प्राप्त होऊ शकतो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण ३ - ज्ञानी</span><br style="box-sizing: border-box;" />ज्या प्रचितीला आपण स्वरूपबोध किंवा आत्मस्थिती असे म्हणतो ती स्थिती अनुभवणारी एक व्यक्ती (ज्ञानी) ज्ञानापासून पृथकत्वाने अस्तित्वात असते. हे गृहीतक मुळातच चुकीचे आहे. स्वरूपबोधामागचे सत्य असे आहे की तिथे ना ज्ञानी अस्तित्वात असते ना अज्ञानी, असते ते केवळ विशुद्ध ज्ञान! गाढ झोपेतून चार घास खाण्यापुरते जागे झालेल्या बालकाप्रमाणे ज्ञानी आपले कर्म करत असतो. सकाळी जाग येते तेव्हा आपण काय खाल्ले याची कुठलीही नोंद त्या बालकाच्या स्मृतीत नसते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण ४ - आत्मविचार (सैद्धांतिक)</span><br style="box-sizing: border-box;" />मनाचे असे स्वायत्त अस्तित्व नाही या सत्याचा प्रत्यक्ष अनुभूतीतून शोध लावणे हेच आत्मविचारामागचे एकमेव ध्येय असते. आत्मविचार वगळता अन्य सारे प्रकार साधन घडून येण्यासाठी मनाचे अस्तित्व शाबूत ठेवावे लागते हे मुळातच गृहीत धरून चालतात, आणि मनाचे सहकार्य नसेल तर त्यांचा सराव करता येणे शक्य होत नाही. साधनेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अहंकार वेगवेगळी आणि सूक्ष्मतर रुपे घेतो, मात्र त्याचा मुळापासून विनाश होत नाही. देह आणि मन या द्वारे कार्य करणारा व्यक्तिगत 'मी' अस्तित्वात आहे या धारणेचा त्याग करता आला तर आत्मसाक्षात्कार घडून येण्यासाठी तेवढेच पुरेसे आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण ५ - आत्मविचार (साधना संहिता)</span><br style="box-sizing: border-box;" />या साधनेच्या प्राथमिक टप्प्यामधे अहंस्फुरणेविषयीचे अवधान ठेवणे ही एक मानसिक क्रिया असली, तरी तीच हळूहळू स्थिर विचार किंवा अनुभूतीचे रूप घेत जाते. साधना परिपक्व होत जाईल तसा 'मी' विषयीचा बौद्धिक विचार हळूहळू व्यक्तिनिष्ठ स्वरूपात प्रत्यक्षात अनुभवता येणार्या सच्चिदानंद स्वरूपासाठी मार्ग प्रशस्त करत जातो. पुढे नानाविध विचारांचे आवर्त तसेच बाह्य वस्तुंच्या संपर्कात येणे किंवा त्यांच्याशी तादात्म्य पावणे थांबायला लागले की व्यक्तित्वदर्शक 'मी' पूर्णपणे अंतर्धान पावतो. मागे उरते ती फक्त शुद्ध अस्तित्वाची प्रचिती, जी अनुभवताना स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे चलनवलन तात्पुरत्या स्वरूपात का होईना पूर्णपणे थांबते. सच्चिदानंद स्वरूपाची प्रचिती सुरूवातीच्या काळात अधूनमधून झलक दाखवल्यासारखी येत असली, तरी सातत्याने साधना करत राहिल्यास तिचा अनुभव घेणे आणि त्या प्रचितीत स्थिर होणे चढत्या भाजणीने सहजसाध्य होत जाते. तुम्ही ही साधना करत जाल, तसे तुमच्या ध्यानात येईल की तेच लोक, त्याच घटना आणि त्याच वस्तु सभोवती असल्या, तरी त्यांच्याकडे बघण्याच्या तुमच्या दृष्टीकोणात हळुहळू बदल होतो आहे. तुमच्या हातून घडलेल्या प्रत्येक कृतीतून तुमच्या ध्यानमग्नतेची साक्ष आपोआप दिसून येईल.<br style="box-sizing: border-box;" /><span style="box-sizing: border-box; font-weight: 700;"><br style="box-sizing: border-box;" />प्रकरण ६ - आत्मविचार (काही गैरसमज आणि त्यांचे निराकरण)</span><br style="box-sizing: border-box;" />'मी ब्रह्म आहे' किंवा 'तो (ईश्वर) मीच आहे' अशी ठाम खात्री देत असलेल्या विधानांचा मंत्रासारखा वापर करणे किंवा क्वचितप्रसंगी अशा महावाक्यांविषयी चिंतन मनन करणे आणि त्यातला गर्भितार्थ अनुभवण्याचा प्रयत्न करणे या पेक्षा आत्मविचार ही वेगळी साधनाप्रणाली आहे. मी कोण आहे' हा प्रश्न मनाचे विश्लेषण करून त्याच्या स्वरूपाविषयी बौद्धिक निष्कर्ष काढण्यासाठी दिलेले आमंत्रण नाही, तसेच तो एखादा सूत्रस्वरूपात गोवलेला मंत्रही नाही. साधकाच्या हाती असलेले ते एक सहज सुलभ साधन आहे, जे बाह्य वस्तुंविषयीचे विचार, वासना आणि आकलन यात गुंतलेल्या चित्ताच्या अवधानाला तेथून परावृत्त करून विचारक किंवा अनुभोक्त्याकडे परत वळवण्यात मोलाची मदत करते. 'मी कोण आहे' या प्रश्नाचे खरे उत्तर मनाच्या अंतरंगात किंवा मनाद्वारे शोधता येत नाही, कारण त्याचे एकमेव खरे उत्तर हे उन्मनी स्थितीची अनुभूतीच आहे असे रमण महर्षींचे ठाम मत होते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण 7 - भक्ती आणि समर्पण</span><br style="box-sizing: border-box;" />जगभरच्या धार्मिक परंपरांमधे व्यक्तिगत 'मी' च्या पलीकडे जाण्यासाठीचा एक उपाय या दृष्टीने परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाण्याविषयीचे प्रतिपादन केलेले दिसते. श्री रमण महर्षींना या मार्गाची वैधता पूर्णपणे मान्य होती आणि ते नेहेमी असे म्हणत असत की शरणागती ही साधनाप्रणाली देखील आत्मविचाराइतकीच परिणामकारक आहे. खरी शरणागती ईश्वराची उपासना करताना अंगीकारलेल्या उपास्य आणि उपासक या नात्यापलीकडे जाते हे दाखवण्यावर महर्षींचा भर असल्याचे दिसते, कारण आपण उपास्यापेक्षा वेगळे आहोत अशी कल्पना करून घेतलेल्या उपासकाचे स्वायत्त अस्तित्वच जेव्हा विलीन होऊन जाते तेव्हाच शरणागती सुफळ संपूर्ण होते. अहंतेचे पूर्णपणे आणि तत्क्षणी विसर्जन करणे हे ध्येय बहुतेक सगळ्याच साधकांसाठी अशक्य कोटीतली बाब आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेत महर्षी अशा अनुयायांना ज्याने भक्तीभाव दृढ होईल आणि मनावर ताबा मिळवता येईल अशा काही प्राथमिक इयत्तेतल्या साधनपद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला देत असत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण ८ - गुरूतत्व</span><br style="box-sizing: border-box;" />ईश्वर, सद्गुरू आणि आत्मा यात कुठलाही भेद नाही (ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने, व्योमवद् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः). वाघाच्या जबड्यात सापडलेले सावज जसे कधीच पलायन करू शकत नाही, तद्वतच एखाद्या भाग्यवंतावर सद्गुरूंचा कृपाकटाक्ष पडला की मग कुठल्याही परिस्थितीत सद्गुरू त्याला अंतराय देत नाहीत. भक्ताचे इहपरलोकी रक्षण करण्याची जबाबदारी ते आपल्या शिरावर घेतात. असे असले तरी साधकानेही न चुकता आणि एकाग्र निष्ठेने गुरूपदिष्ट मार्गाचे अनुसरण करावेच लागते. आत्मलाभ व्हावा अशी ईच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला गुरू लाभणे अनिवार्य आहे. सद्गुरू मनुष्य देहधारीच असणे मात्र अनिवार्य नाही. गुरू अंतर्यामी आहे आणि बाहेरही आहे. त्यामुळे गुरूकृपा दोन प्रकारे काम करते. बाहेर असलेले गुरू उपदेश देण्याचे तसेच त्यांच्या सामर्थ्याने शिष्याला आत्मनिष्ठ होण्यासाठी सक्षम बनवण्याचे कार्य करतात. अंतर्यामी असलेले गुरूतत्व जागृत झाले, की ते शिष्याच्या मनाला त्याच्या उगमस्थानाकडे परत वळवतात, तिथेच स्थिर करतात आणि शेवटी सच्चिदानंद निजस्वरूपात मनोलय घडवून आणतात.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण ९ - मौन आणि सत्संग महात्म्य</span>भारतात मौन दीक्षेची एक प्राचीन अशी परंपरा आहे. साक्षात शिवस्वरूप असलेल्या विख्यात गुरू दक्षिणामूर्तिंकडून अशी दीक्षा दिली जात असे. दक्षिणामूर्तिंनी अत्यंत व्युत्पन्न आणि विरक्त असूनही वैचारिक गोंधळात अडकलेल्या चार सनत्कुमारांना मौन दीक्षेद्वारे आत्मलाभ घडवून दिल्याची कथा सर्वज्ञात आहे. साधकांनी असे नमूद करून ठेवलेले आहे की त्यांना विनासायास लाभलेली असीम शांती तसेच आपण पूर्णपणे 'स्वस्थ' असल्याची अनुभूती या स्वरूपात महर्षींच्या मौन दीक्षेची प्रचिती येत असे. आपले ध्यान आत्मस्वरूपावर किंवा रमण सद्गुरूंच्या बाह्य रूपावर केंद्रित केलेल्या कुठल्याही साधकाला या मौन दीक्षारूपी शक्तीचा प्रत्यय घेता येतो. यात स्थळ, काळ आणि परिस्थितीचा अडसर कधीच येत नाही. गुरूकृपेकडे अवधान देण्याच्या क्रियेलाच महर्षी 'सत्संग' असे म्हणत असत. सत्संग या शब्दाचा शाब्दिक अर्थही (मनाने) सद्गुरूंच्या संगतीत राहणे असाच होतो. रमण महर्षी अगदी मनःपूर्वक सत्संग साधनेला अनुमोदन देत असत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण १० - ध्यान आणि एकाग्रता</span><br style="box-sizing: border-box;" />जागृती, निद्रा आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमधे ज्यात सातत्य राखता येते तेच ध्यान सर्वश्रेष्ठ असते. असे सातत्य येण्यासाठी 'मी ध्यान करतो आहे' असा विचारतरंगदेखील मनात उमटू नये इतकी उत्कटता ध्यानधारणेत असावी लागते. नानाविध मानसिक विभ्रमांचे मूळ कारण असलेल्या इंद्रियगोचर ज्ञानाचा पगडा क्षीण होत गेला, त्या पलीकडच्या अनुभूतीची गोडी लागली, आणि त्या योगे सतत उसळून येत असलेली अहंता आणि विषयांचा लळा लागलेल्या मनावर पूर्ण ताबा मिळाला, की साधकाच्या अंतःकरणात 'शब्देविण संवादु' अशा अनाहत नादाची आणि दिव्य अशा तापहीन प्रकाशाची अनुभूती येते. योगाची खरी शक्ती हीच आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण ११ - मंत्र, जप आणि नामस्मरण</span>दीक्षा देत असताना सद्गुरूंनी शिष्याला प्रदान केलेल्या एखादा शब्दाला किंवा श्लोकालाच मंत्राचे स्वरूप प्राप्त होते. सद्गुरूंना घडलेल्या साक्षात्कारातून किंवा त्यांनी केलेल्या ध्यानधारणेतून त्यांच्याजवळ अध्यात्मिक शक्तीचा जो संचय झालेला असतो, त्यापैकी काही भाग मंत्रस्वरूपात शिष्याकडे संक्रमित केला जातो. समर्पणाच्या मार्गावर या विश्वाचे संचालन करणारी सगळी जबाबदारी वाहणारी एक अव्याख्य अशी उच्चतर शक्ती आहे, तसेच व्यक्तिगत 'मी' ला जगाच्या व्यापारात नगण्य स्थान आहे हे भान निरंतर ठेवावे लागते. साधकांच्या जीवनात अशा वृत्तीची जोपासना व्हावी या दृष्टीने जप अत्यंत परिणामकारक ठरतो. नामस्मरणाचा सातत्याने सराव केल्याने कालांतराने साधकाला कळत नकळात अशी एक स्थिती प्राप्त होते जिथे प्रयत्न न करताच नामस्मरण सतत आणि आपोआप होत राहते. ही स्थिती प्राप्त करण्यासाठी ज्या दैवताचे नामस्मरण सुरू असते त्या इष्टदैवताला सर्वभावे शरण जावे लागते. निव्वळ एकाग्रतेने ती साध्य करता येत नाही. अनन्य भावाने शरणागती साधली की मग इष्टदेवतेचे नाम त्या साधकाची साथ कधीच सोडत नाही.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण १२ - दैनंदिन व्यावहारिक जीवन</span>आपल्या भक्तांना व्यावहारिक जीवनशैलीचा त्याग करून किंवा प्रापंचिक जबाबदार्यांना तिलांजली देत व्रतस्थ जीवन व्यतित करण्याची परवानगी महर्षींकडून कधीच मिळत नसे. लौकिक दृष्ट्या कुठल्याही परिस्थितीत असलेल्या साधकांसाठी आत्मसाक्षात्कार तितक्याच सुलभतेने साध्य होण्याजोगा आहे असे ते ठामपणे आणि सातत्याने साधकांच्या मनावर बिंबवत असत. महर्षी त्यांच्या अनुयायांना नेहेमी असा उपदेश देत असत की आपले कर्तव्य तत्परतेने पार पाडत असताना किंवा नित्य नैमित्तिक कर्मे करताना प्रारब्धानुसार देहाद्वारे ती घडत आहेत; मात्र त्यांचे कर्तृत्व ओढवून घेणारा किंवा त्यांची जबाबदारी स्वीकारणारा व्यक्तिगत 'मी' अस्तित्वात नाही असे सजग भान जागृत ठेवण्याने जो अध्यात्मिक लाभ होईल, तो प्रापंचिक जीवनाचा त्याग केल्याने किंवा नाहक देह कष्टवण्याने कधीच मिळणार नाही. अध्यात्मिक साधकांनी सरसकट पाळावेत असे आचरणविषयक नियम - संयत आहार, संयत निद्रा आणि संयत संभाषण.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण १3 - योगिक प्रक्रिया</span>हठयोग साधत असताना देहशुद्धीविषयक अतिरंजित कल्पना साधकाला पछाडून टाकत असल्याने योगविषयक प्रश्नांची उत्तरे देताना भगवान श्री रमण महर्षी हठयोगाविषयी नापसंती व्यक्त करत असत. अध्यात्मिक प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी मनावर ताबा मिळवणे ही एकमेव गोष्ट अत्यंत आवश्यक आहे हे महर्षींच्या उपदेशामागचे मुख्य सूत्र होते. प्राणायामाबद्दल मात्र त्यांचे मत अनुकूल होते. महर्षींना कुंडलिनी शक्ती तसेच चक्रे अस्तित्वात आहेत हे मान्य होते. महर्षी मात्र असे प्रतिपादन करत असत की सहस्त्रार चक्रापर्यंत कुंडलिनी शक्ती पोचल्याने आत्मसाक्षात्कार घडत नाही. सहस्त्रार चक्राला ओलांडून अमृतनाडीमधून (अमृत नाडीलाच परा नाडी किंवा जीवन नाडी ही नावे दिलेली आहेत) कुंडलिनी शक्ती छातीत उजव्या हाताच्या बाजूला असलेल्या हृदयचक्रापर्यंत पोचली की आत्मसाक्षात्कार घडतो असे महर्षींचे मत होते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण १४ - समाधी</span>सहज निर्विकल्प समाधी: ज्याने/ जिने (अध्यात्मिक साधना सफल झाल्यावर) अंततः अहंतेला कायमचेच दूर सारले आहे, अशा ज्ञानसिद्ध व्यक्तीची ही निरंतर टिकणारी स्थिती असते. या समाधीचे वर्णन करत असताना वापरलेले सहज (स्वाभाविक) आणि निर्विकल्प (अचल, कुठलाही फरक न पडणारी) हे दोन्ही शब्द अत्यंत महत्वाचे आहेत. सहजस्थितीत असलेला ज्ञानी सामान्यजनांप्रमाणेच लौकिक जगतात सहजतेने कार्यरत राहू शकतो. केवल निर्विकल्प समाधी: ही आत्मसाक्षात्कारापूर्वीची पायरी आहे. या स्थितीत असताना प्रयत्न न करताच स्वसंवेज्ञता अनुभवता येते, मात्र ती क्षणिक स्वरूपाची असते. या स्थितीत अहंकाराचा संपूर्ण नाश झालेला नसतो. केवल निर्विकल्प समाधीत साधकाचे देहभान हरपते. स्वरूपाची किंवा स्वसंवेज्ञतेची तात्पुरती झलक मिळत असली, तरी केवल निर्विकल्प समाधी स्थितीत कर्मेंद्रियांचा तसेच ज्ञानेंद्रियांचा योग्य तो उपयोग करणे किंवा व्यावहारिक जगात कार्यरत असणे साधकाला शक्य होत नाही. सविकल्प समाधी: सविकल्प समाधी स्थितीत अथक प्रयत्न करून आत्मभान टिकवावे लागते. ती किती काळ टिकेल हे पूर्णपणे समाधी अवस्था टिकवण्यासाठी साधक करत असलेल्या प्रयत्नांवर अवलंबून असते. स्वरूपावरचे ध्यान डळमळीत झाले, की स्वसंवेज्ञतेची प्रचिती विरत जाते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण 15 - दृष्टांत आणि सिद्धी</span>हेतुपुरस्सर दृष्टांत घडावेत किंवा सिद्धी प्राप्त व्हाव्यात या दिशेने प्रयत्न करण्यापासून श्री. रमण महर्षी त्यांच्या भक्तांना सातत्याने परावृत्त करत असत. दृष्टांत आणि सिद्धी या दोन्ही गोष्टी मनोनिर्मित असल्याने त्यांचा आत्मलाभ होण्याच्या दृष्टीने उपाय होण्यापेक्षा अपाय होण्याचीच शक्यता कित्येक पटीने जास्त आहे ही बाब महर्षी सातत्याने निदर्शनास आणून देत असत. स्वरूपसिद्धी प्राप्त होताना साधकावस्थेत घडलेल्या अत्यंत सहज, सुलभ आणि सात्विक तपश्चर्येची परिणती निसर्गतःच काही उपकारक सिद्धींमधे होते. या सिद्धी ईश्वरी कृपेच्या स्वरूपात आपल्या आपण (साधकाने जाणीवपूर्वक प्रयत्न न करताच) साधकाला मिळून जातात. प्रत्येक साधकाच्या प्रारब्धानुसार त्यांचे स्वरूप निरनिराळे असते. असे असूनही सिद्धी वश झाल्याने म्हणा किंवा त्या प्राप्त न झाल्याने म्हणा; परम शांतीत अचलपणे स्थित झालेला ज्ञानी तिळमात्रही विचलीत होत नाही. ज्ञान्याला स्वरूप साक्षात्कार झाल्यामुळे पक्के माहित असते की आत्मसिद्धी ही एकमेव शाश्वत सिद्धी आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण १६ - साधकांचे भावविश्व आणि त्यांच्या समस्या</span><br style="box-sizing: border-box;" />शारिरीक वेदना, सततची अस्वस्थता, वैचारिक गोंधळ, उत्कट भावभावनांचे मानसिक स्थिती सतत दोलायमान ठेवणारे हिंदोळे आणि मरूस्थळासारखी अधूनमधून झलक दाखवणारी सुखद शांतता या सगळ्या गोष्टींचा अध्यात्मिक साधनेचे वांछित/ अवांछित परिणाम या स्वरूपात साधकांना नेहेमी प्रत्यय येत असल्याचे लक्षात येते. श्री रमण महर्षींचा कल मात्र उघडपणे 'अध्यात्मिक अनुभव' या प्रकाराला फारसे महत्व न देण्याकडे होता. अनुभूतींचे विश्लेषण करण्यापेक्षा तसेच सुखद अनुभूतींमधे गुंतून पडण्यापेक्षा ज्याला अनुभूती येतात त्या 'मी' विषयीचे भान सजगपणे आणि सातत्याने जागृत ठेवणे अधिक महत्वाचे आहे या गोष्टीवर महर्षी सतत भर देत असत. अध्यात्मिक अनुभूतींविषयी चर्वितचर्वण करण्याबाबत कमालीचे अनुत्सुक असलेले महर्षी एखाद्या निष्ठावंत अध्यात्मिक साधकाने/ साधिकेने ध्यानधारणा करताना व्यत्यय आणत असलेल्या वास्तवदर्शी समस्येशी निगडीत प्रश्न विचारला असता त्याला/ तिला तितक्याच तत्परतेने मार्गदर्शन करत असत. पुढ्यात उभ्या असलेल्या साधकाची/ साधिकेची परिपक्वता लक्षात घेत जर संयुक्तिक वाटले तरच आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता कुठलीच समस्या अस्तित्वात असू शकत नाही ही बाब त्याच्या/ तिच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न महर्षी करत असत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण १७ - विश्वनिर्मिती संबंधित सिद्धांतप्रणाली आणि जगाचे सत्यत्व</span><br style="box-sizing: border-box;" />अजातवाद असे सांगतो की काळ, अवकाश आणि कार्यकारण भावाचे अस्तित्व फक्त अज्ञानी व्यक्तीच्या मनातच असते. आत्मप्रचिती आली की या तिन्ही गोष्टी अस्तित्वातच नाहीत असा बोध होतो. अजातवाद सिद्धांतप्रणाली जगाचे सत्यत्व (व्यावहारिक वस्तुस्थिती) नाकारत नाही. जगाच्या उत्पत्तीची प्रक्रिया मात्र अजातवादाला पूर्णपणे अमान्य आहे. 'मी आहे' या विचाराबरोबरच ('मी' च्या सापेक्षतेत) जग अस्तित्वात येते (उदा. गाढ झोपेतून जाग आल्यावर). 'मी आहे' हा विचार नसेल तर जगाचे ('मी' च्या सापेक्षतेत असलेले) अस्तित्व संपुष्टात येते (उदा. निद्रीस्त झाल्यावर). अद्वैत वेदांतात या सिद्धांतप्रणालीला दृष्टी - सृष्टी वाद असे नाव दिलेले आहे. सृष्टी - दृष्टी वाद या सिद्धांतप्रणालीनुसार 'कार्यकारण भावाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली वस्तुनिष्ठ वास्तविकता' असे जगाचे स्वरूप असल्याने जगाच्या निर्मितीचा मागोवा घेतला असता कोण्या एका विवक्षित क्षणी जगाच्या निर्मितीची घटना घडली असावी ही एकमेव शक्यता संभवते. बौद्धिक कुतुहल शमविण्यापलीकडे सृष्टी - दृष्टी वादावर आधारलेल्या सिद्धांतप्रणालींची धाव जात नसल्याने पारमार्थिक साधकांनी त्यांना अवास्तव महत्व देण्याची गरज नाही अशी शिकवण महर्षी सातत्याने देत असत. आदि शंकराचार्यांची 'माया' ही संकल्पना नीट न समजल्यानेच त्यांना अनाठायी आणि अनुदार टीकेचे धनी व्हावे लागले. शंकराचार्यांचा उपदेश असा आहे: १. ब्रह्म सत्य आहे २. जग मिथ्या आहे आणि ३. जगच ब्रह्म आहे. दुसरे विधान करून आचार्य थांबले नाहीत. तिसरे विधान अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्या विधानाच्या संदर्भात बाकी दोन्ही विधानांचा खरा भावार्थ लक्षात येतो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण १८ - पुनर्जन्म</span>देहाचा मृत्यु झाल्यावर जीवात्म्याची (individual soul) गती पुढे कशी असते या विषयी सविस्तर स्पष्टीकरण देण्यासाठी बहुतांशी सगळ्याच धर्मांनी आपापल्या सिद्धांतप्रणालींची निर्मिती केल्याचे दिसून येते. त्या पैकी काहींचा असा दावा आहे की जीवात्मा स्वर्ग किंवा नरकात जातो, तर काहींचा असा दावा आहे की जीवात्मा नवा देह धारण करून पुनर्जन्म घेतो. आत्मस्वरूपाच्या भूमिकेतून पाहिले असता स्वर्ग, नरक आणि पुनर्जन्म तर सोडाच, (आत्मस्वरूपाचा) जन्म आणि मृत्यु देखील संभवत नसल्याची प्रत्यक्ष अनुभूती येते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण १९ - ईश्वराचे स्वरूप</span><br style="box-sizing: border-box;" />ईश्वर स्वसंवेद्य, स्वयंसिद्ध आणि निराकार आहे. ईश्वर उपाधी रहित, निखळ अस्तित्वमात्र तसेच विशुद्ध चैतन्यस्वरूप आहे. ईश्वरी शक्तीच्या आधारे ईश्वरातच जग प्रकट होते (ईश्वर आणि जगाचा स्वरूप - संबंध आहे), मात्र तो विश्वाचा निर्माता नाही. संकल्प आणि वासनांपासून ईश्वर नित्यमुक्त आहे. ईश्वरी अस्तित्व स्वयंसिद्ध असले तरी ईश्वर कधीच संकल्पयुक्त क्रिया करत नाही. आपण आणि ईश्वर एकरूप असल्याचा बोध नसेल, तर स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा भ्रम निर्माण होतो. या भ्रमाचे आवरण दूर केले की फक्त ईश्वरच बाकी उरतो किंवा साधक आणि ईश्वर एकरूप होऊन जातात (उदा. देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होउनी ठेलो - संत तुकाराम महाराज).</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण २० - (मानवी जीवनातले) दु:ख आणि नैतिकता</span>दु:ख भोगणारा जीव, जगत आणि ईश्वर हे त्रिकूट मनोनिर्मीत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आणून देत तदनुषंगिक क्लिष्ट, निरूद्देश आणि प्रायः निष्फळ ठरत असलेल्या चर्चांना महर्षी नेहेमी बगल देत असत. आपण समग्र अस्तित्वापेक्षा पृथकतेने नांदतो आहोत असा भ्रम मनातच जन्म घेतो. या भ्रममूलक कल्पनेतून निष्पन्न झालेल्या सगळ्या संकल्पनांचे ओझे मनालाच वागवावे लागते. त्यांचे दु:खद परिणामही मनालाच भोगावे लागतात. दुष्कृत्यांचे परिणामस्वरूप किंवा ईश्वरेच्छेमुळे दु:ख भोगावे लागते हे महर्षींना पूर्णपणे अमान्य होते. एखाद्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार झाला तर तिला व्यक्तिगत पातळीवरच नव्हे तर जगात सर्वत्र दिसणारे तथाकथित दु:ख अस्तित्वातच नाही अशी स्वानुभवाने खात्री पटते असा निर्वाळा महर्षींनी नि:संदिग्ध शब्दात दिलेला आहे. याच संकल्पनेला तिच्या अंतिम तार्किक निष्पत्तीपर्यंत नेत स्व-स्वरूपाचा बोध करून घेणे हा स्वत:च्या तसेच इतरेजनांच्या दु:खाचा अंत करण्याचा सगळ्यात परिणामकारक मार्ग आहे असे प्रतिपादन महर्षींनी वेळोवेळी केलेले दिसते. जगात वावरताना एखाद्या व्यक्तीच्या आचरणात कुठल्या गोष्टींचा समावेश असलाच पाहिजे किंवा तिने कुठल्या गोष्टी पूर्णपणे त्याज्य मानल्या पाहिजेत अशा नीती नियमांविषयीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात महर्षींना मुळीच स्वारस्य नव्हते. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे या संदर्भातल्या जगभरच्या सगळ्या पारंपारिक धारणांचे महाजाल हे बेगडी नीतीमूल्यांच्या आधारे न्यायनिवाडा करत मनाने रचलेले थोतांड आहे; मनोनाश झाल्यावर नीती-अनीतीविषयीच्या सगळ्या संकल्पना पार धुळीला मिळतात असा महर्षींचा नैतिकतेविषयीचा एकंदर दृष्टीकोन होता.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रकरण २१ - कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्य</span><br style="box-sizing: border-box;" />श्री रमण महर्षींना कर्म सिद्धांताची वैधता मान्य असली, तरी ते असे सांगत असत की एखादी व्यक्ती आपले सच्चिदानंद स्वरूपापेक्ष पृथक असे स्वायत्त अस्तित्व आहे अशा भ्रमात जगत असेल तरच तिच्या बाबतीत कर्माचे सिद्धांत लागू होतात. या पातळीवर जगताना (पारमार्थिक अर्थाने अज्ञानी असताना) प्रत्येक व्यक्तीला प्रारब्धवशात भूतकाळात केलेली कृत्ये तसेच भूतकाळात केलेल्या विचारांचे परिणाम अनुक्रमे पूर्वनियोजीत घटनाक्रम तसेच नानाविध अनुभवांच्या स्वरूपात भोगावे लागतात. आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत मात्र सारे कर्तृत्व भोक्तृत्व स्वरूपात विलीन झाल्याने कर्माचा सिद्धांत पूर्णपणे निरर्थक ठरतो.</div>
</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-53328325238991267622020-07-03T02:55:00.000-07:002021-05-11T07:17:23.668-07:00भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २१ - कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्य<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
या प्रकरणात कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्याविषयीचा भगवान श्री रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणात आहोत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
पौर्वात्य जगतात प्रचलित असलेल्या बहुतांशी सगळ्या धर्मांच्या सिद्धांतप्रणालींनी 'कर्माचा सिद्धांत' मांडलेला आहे. या सिद्धांताचे सगळ्यात लोकप्रिय स्वरूप लक्षात घेतले तर तो असे गृहीतक मांडताना दिसतो, की प्रत्येक व्यक्तीने केलेल्या चांगल्या आणि वाईट कृत्यांची स्वतंत्र खात्यात नोंद ठेवणारी एक वैश्विक गणनप्रणाली अस्तित्वात आहे. प्रत्येक व्यक्तीला तिने केलेल्या कृत्यांची फळे भोगावीच लागतात - चांगल्या कृत्यांची चांगली फळे मिळतात, तर वाईट कृत्यांचे दु:खद परिणाम भोगावे लागतात. हाच सिद्धांत पुढे असे सांगतो की कर्मफलांचे सारे 'संचित' त्याच जन्मात भोगावे लागणे क्रमप्राप्त नसल्याने शिल्लक राहिलेला भाग पुढच्या जन्मात भोगावा लागतो. (जगी सर्व सूखी असा कोण आहे, विचारे मना तूचि शोधून पाहे, मना त्वाची रे पूर्वसंचीत केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले - समर्थ रामदास स्वामी) त्यामुळे कर्माचे विविध प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. हिंदूंच्या विविध दर्शनांमधे ('schools of thought') उल्लेख असलेल्या पुढील वर्गीकरण पद्धतीचा संदर्भ श्री रमण महर्षी देत असतः</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
१. <span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">संचित कर्मः</span> पूर्वजन्मांमधे साठलेले कर्मांचे ऋण<br style="box-sizing: border-box;" />२. <span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">प्रारब्ध कर्मः</span> संचित कर्माचा एक उपसंच, जो या जन्मी भोगणे भाग पडते. कर्माचा सिद्धांत मानवी जीवनातल्या सगळ्या घटना पूर्वनियोजीत असतात असे प्रतिपादन करत असल्याने प्रारब्ध या शब्दाचा अर्थ 'नियती' या स्वरूपात देखील घेतला जातो.<br style="box-sizing: border-box;" />३. <span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">आगामी कर्मः</span> या जन्मी केलेल्या कृत्यांमुळे आणि विचारांमुळे संचितात सतत पडत असलेली भर. या पैकी उर्वरित कर्मभोग पुढच्या जन्मात भोगावा लागतो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
श्री रमण महर्षींना उपरोक्त कर्म सिद्धांताची वैधता मान्य असली, तरी ते असे सांगत असत की एखादी व्यक्ती आपले सच्चिदानंद स्वरूपापेक्ष पृथक असे स्वायत्त अस्तित्व आहे अशा भ्रमात जगत असेल तरच तिच्या बाबतीत कर्माचे सिद्धांत लागू होतात. या पातळीवर जगताना (पारमार्थिक अर्थाने अज्ञानी असताना) प्रत्येक व्यक्तीला प्रारब्धवशात भूतकाळात केलेली कृत्ये तसेच भूतकाळात केलेल्या विचारांचे परिणाम अनुक्रमे पूर्वनियोजीत घटनाक्रम तसेच नानाविध अनुभवांच्या स्वरूपात भोगावे लागतात. क्वचित प्रसंगी महर्षी असे देखील सांगत असत की एखादी व्यक्ती तिच्या जीवनात करत असलेली प्रत्येक कृती तसेच तिला जीवनभर येत गेलेले सगळे अनुभव तिच्या जन्माच्या वेळीच निर्धारित केलेले असतात. त्यामुळे आपल्याला जर काही स्वातंत्र्य असेल तर ते इतकेच आहे की कर्ता किंवा अनुभोक्ता (सच्चिदानंद स्वरूपापेक्षा विभक्त स्वरूपात) अस्तित्वातच नाही हे जाणून घेणे! आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत मात्र सारे कर्तृत्व भोक्तृत्व स्वरूपात विलीन झाल्याने कर्माचा सिद्धांत पूर्णपणे निरर्थक ठरतो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
श्री रमण महर्षी कर्माच्या सिद्धांताला ईश्वरी संकल्पाचे प्रकट स्वरूप मानत असत. ते असा उपदेश देत असत की आत्मसाक्षात्कार होण्याआधी प्रत्येक व्यक्तीच्या प्रारब्धावर नियंत्रण ठेवणारा मनुष्य-सदृश स्वरूपातला ईश्वर मानावाच लागतो. प्रत्येक व्यक्तीला तिने केलेल्या कर्मांचे परिणाम भोगावेच लागतील असा दंडक या ईश्वरानेच घालून दिलेला आहे. प्रत्येक जीवाला संचित कर्मापैकी कुठला भाग कुठल्या जन्मी भोगावा लागेल याची निवड देखील ईश्वरच करतो. आत्मस्वरूपाचा बोध करून घेत कर्मबंधनाची लक्ष्मणरेषा लांघून पुढे जाणे हा एकमेव मार्ग मुक्तीच्या दिशेने जाणारा आहे. देहतादात्म्याने तसेच कर्ताभावाने वावरत असलेल्या व्यक्तीला ईश्वरी न्यायसत्तेच्या अधिकारक्षेत्राबाहेर अन्य कुठल्याही मार्गाने पळून जाता येत नाही.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः देहपात होईपर्यंत प्रारब्ध भोगावे लागते असे मानले जाते. देह अस्तित्वात असतानाच प्रारब्धावर मात करणे शक्य आहे का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: होय, ते शक्य आहे. जड देह आणि सच्चिदानंद स्वरूप यांच्या मधे शिरकाव केलेल्या अहंकार या तिसर्या घटकावर कर्माची गती अवलंबून आहे. जिथे कर्माच्या सिद्धांताची सत्ता चालते तो अहंकारच जर त्याच्या उगमस्थानी (स्व-स्वरूपात) विलीन होत शून्यवत झाला, तर पूर्णपणे त्याच्यावरच अवलंबून असलेली कर्माची गती आपोआप थांबते. जिथे 'अहं' नाही तिथे कर्माची गती आपोआप खुंटते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः अशी कुठली यंत्रणा अस्तित्वात आहे जी संचित कर्माचा एक छोटासा हिस्सा निवडते, आणि असे ठरवते की तो अमुक एका जन्मात प्रारब्धाच्या स्वरूपात भोगावा लागेल?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: प्रत्येक व्यक्तीला तिच्या कर्माची फळे भोगणे अनिवार्य असले, तरी त्याचे/ तिचे हित साधता येईल अशा दृष्टीने त्यांचे व्यवस्थापन करण्याचा आटोकाट प्रयत्न ईश्वरी सत्ता करते. ईश्वर संचिताचे कुशलतेने व्यवस्थापन करत असला तरी संचितात भर घालण्याचे किंवा त्यातून सवलत देण्याचे काम कदापि करत नाही. मानवाचे अचेतन मन चांगल्या आणि वाईट कर्मांचे भले मोठे गोदाम आहे. याच गोदामातून त्या त्या वेळी प्रत्येक व्यक्तीच्या अध्यात्मिक विकासाला सहाय्यभूत ठरेल अशा गोष्टींची, मग त्या सुखद असोत किंवा दु:खद, नेमकी निवड ईश्वर करतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट यदृच्छेने कधीच घडत नाही.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः आम्ही आज जे अनुभवतो आहोत ते प्राग्जन्मी केलेल्या कर्मांचे फळ आहे. आम्ही पूर्वी केलेल्या चुका जर आम्हाला समजल्या, तरच आम्हाला त्या दुरूस्त करता येतील.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: तुम्ही एखादी चूक दुरूस्त केलीत असे गृहीत धरले, तरी तुम्हाला असंख्य जन्म घ्यावे लागतील इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही जन्मोजन्मी गोळा केलेले संचित कर्म शिल्लक उरते. त्यामुळे आपण विचारणा करत आहात ती पद्धत मुळातच चुकीची आहे. तुम्ही कर्माच्या वृक्षाची जितकी छाटणी कराल, तितक्याच जोमाने त्याची वाढ होते. तुम्हाला कर्म-वृक्षाचे मूळ शोधून काढून ते छाटून टाकावे लागेल.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः कुठलेही नियोजन न करता किंवा ती मिळवण्याचा प्रयत्न न करताच एखादी भोग्य वस्तू मला विनासायास मिळाली, आणि मी तिचा उपभोग घेतला, तर (कर्माच्या दृष्टीने) तिचे वाईट परिणाम भोगावे लागणार नाहीत, नाही का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: तसे होत नाही. प्रत्येक कृत्याचे परिणाम भोगावेच लागतात. प्रारब्धवशात एखादी गोष्ट तुमच्या नशिबी आली, तर तुम्हाला ती टाळता येत नाही हे खरे आहे. ती गोष्ट अधिक प्रमाणात मिळावी, किंवा त्या अनुभवाची पुनरूक्ती व्हावी अशी भावना न ठेवता, त्या गोष्टीबाबात फारशी आसक्ती न बाळगता तुम्ही तिचा स्वीकार केलात तर 'जन्म घेणे लागे वासनांचे संगे' या उक्तीप्रमाणे आगामी जन्मांना कारणीभूत ठरून ती तुमचे नुकसान करणार नाही. याच नाण्याची दुसरी बाजू अशी आहे, की त्या गोष्टीचा उपभोग घेताना तुमची आसक्ती वाढली आणि साहजिकच ती अधिक प्रमाणात मिळावी अशी तुमची वासना बळावली; तर अशा वासनांची परिणती अपरिहार्यपणे 'पुनरपि जननं, पुनरपि मरणं' अशा शृंखलेत होते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः एखाद्या व्यक्तीच्या जीवनातल्या महत्वाच्या घटना (जन्मस्थान, जन्मत:च मिळणारे ठराविक देशाचे नागरिकत्व, कौटुंबिक परिस्थिती, व्यवसायाची निवड किंवा व्यावसायिक कारकीर्दीचा आलेख, लग्न, अपत्यप्राप्ती) पूर्णपणे कर्मप्रारब्धानुसार घडतात हे मी समजू शकतो, पण तिच्या संपूर्ण जीवनपटातला एकून एक तपशील संगतवार लक्षात घेतला तर अत्यंत गौण ठरतील अशा कार्यकलापांसकट तिने केलेली प्रत्येक कृती आधीच निश्चीत झाली असावी हे कसे शक्य आहे? (रमणाश्रमात त्या काळी विद्युत उपकरणे नव्हती) आता क्षणभर इकडे लक्ष द्या. माझ्या हातात असलेला पंखा मी नुकताच खाली ठेवला. मी अमुक एके दिवशी, अमुक वाजून अमुक मिनीटांनी आधीच ठरलेल्या कालावधीपुरता वापर करून झाला की तो पंखा आधीच ठरलेल्या ठिकाणी खाली ठेवला - हे सगळे पूर्वनिर्धारीत आहे का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: खचितच. देह करत असलेली प्रत्येक कृती आणि त्याला ज्या ज्या अनुभवांमधून जावे लागते ते सारे अनुभव या दोन्ही गोष्टी देह अस्तित्वात येतो तेव्हाच ठरलेल्या असतात.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः मग मानवाला असलेल्या कर्म स्वातंत्र्याला किंवा आपण करत असलेल्या कृत्यांची त्याने/ तिने जबाबदारी घेण्याला काय अर्थ उरतो?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: देहतादात्म्यापासून मुक्त होण्याचे सामर्थ्य मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानप्राप्तीचा निदीध्यास घ्यावा आणि 'प्रयत्नांती परमेश्वर' या न्यायाने स्वरूपज्ञान प्राप्त करावे या एकाच बाबतीत मानव स्वतंत्र आहे. मानवी देह अटळ असलेल्या प्रारब्धाप्रमाणे पूर्वनिर्धारीत कार्यकलापातून जाण्यासाठी बाध्य असतो. देहाशी तादात्म्य साधून कर्मफलात गुंतून पडायचे, की कर्मफलात आसक्ती न ठेवता प्रारब्धवशात होत असलेल्या सगळ्या कार्यकलापांचे निव्वळ साक्षी बनून रहायचे ही एकच गोष्ट ठरवण्याचे स्वातंत्र्य मात्र मानवाकडे प्रत्येक क्षणी असते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
पुरवणी:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
समसामयिक असलेले रमण महर्षी आणि आईनस्टाईन हे आपापल्या प्रांतातले दिग्गज प्रत्येक गोष्ट पूर्वनिर्धारीत असते (Everything is predetermined) असे मानत होते. त्या संदर्भात गॅरी वेबर यांनी केलेल्या विवेचनाचा दुवा देत लेखमालेचा समारोप करतो -</div>
<iframe allow="accelerometer; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen="" frameborder="0" height="315" src="https://www.youtube.com/embed/XqLDWyk1uLQ" style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px;" width="560"></iframe><br />
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; overflow-wrap: break-word;">
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||</div>
</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-82003678408009147112020-07-01T23:29:00.000-07:002021-05-11T07:17:16.181-07:00भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २० - (मानवी जीवनातले) दु:ख आणि नैतिकता<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २० - (मानवी जीवनातले) दु:ख आणि नैतिकता<br />
<br />
या प्रकरणात मानवी जीवनातल्या दु:ख, व्यथा तसेच नैतिकतेविषयी भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.<br />
<br />
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:<br />
<br />
ईश्वरवादी सिद्धांतप्रणालींमधे स्पष्टपणे दिसत असलेल्या विसंगती आणि विरोधाभासांचा उलगडा करण्यात गेली कित्येक शतके पाश्चात्य जगतातले ब्रह्मवेत्ते आणि तत्वज्ञानी गुंतुन पडलेले आहेत. वानगीदाखल सांगायचे तर - ईश्वर आपली कामे (विश्वनिर्मिती) करताना चुकत नसेल, तर जगात इतके पाप, ताप, दैन्य तसेच अनिर्बंधपणे विघातक कृत्ये करत असलेल्या दुष्ट प्रवृत्ती का आहेत? सर्वशक्तीमान ईश्वराकडे पाप, ताप, दैन्याचा तत्क्षणी परिहार करण्याचे तसेच दुष्ट प्रवृत्तींचे क्षणार्धात निर्दालन करण्याचे करण्याचे सामर्थ्य असूनही तो या गोष्टींकडे कानाडोळा का करतो?<br />
<br />
जीव, जगत आणि ईश्वर ही तीन तत्वे निर्विवादपणे अस्तित्वात आहेत, तसेच ती स्वयंसिद्ध आहेत असे बहुतांशी सगळ्याच धर्मांनी गृहीत धरलेले आहे. महर्षी मात्र असे सांगत असत की एकाच महत्तत्वाचे तीन प्रकारे प्राकट्य होते, किंवा उपरोक्त तिन्ही तत्वांचे स्वायत्त अस्तित्व सतत अबाधित असते - हे दोन्ही सिद्धांत मांडणे अहंता (व्यक्तिगत 'मी' ची जाणीव) अस्तित्वात असेल तरच शक्य आहे, अन्यथा नाही. दु:ख भोगणारा जीव, जगत आणि ईश्वर हे त्रिकूट मनोनिर्मीत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आणून देत तदनुषंगिक क्लिष्ट, निरूद्देश आणि प्रायः निष्फळ ठरत असलेल्या चर्चांना महर्षी नेहेमी बगल देत असत.<br />
<br />
महर्षी असे सांगत असत की दुष्कृत्यांमुळे दु:खाची तीव्रता वाढत असल्याने दुष्टबुद्धीने कुठलेही कृत्य करणे टाळलेच पाहिजे, मात्र दुष्कृत्ये हे दु:खनिर्मितीमागचे मूळ कारण नाही. महर्षींच्या मते परस्परांशी तसेच जगातल्या इतर सजीव/ निर्जिव सृष्टीबरोबर क्रिया प्रतिक्रिया करण्यात गुंतलेली आपण स्वायत्त, स्वतंत्र व्यक्तिमत्वे आहोत या मनोनिर्मीत संकल्पनेला सत्य मानून जगणेच दु:खाचे मूळ कारण आहे. आपण समग्र अस्तित्वापेक्षा पृथकतेने नांदतो आहोत असा भ्रम मनातच जन्म घेतो. या भ्रममूलक कल्पनेतून निष्पन्न झालेल्या सगळ्या संकल्पनांचे ओझे मनालाच वागवावे लागते. त्यांचे दु:खद परिणामही मनालाच भोगावे लागतात. महर्षींचे मूलगामी विवेचन लक्षात घेतले तर निरंतर विश्लेषण, चिकीत्सा आणि भेदभाव करण्यात गुंतलेले मानवी मनच दु:ख निर्माण करते; किंबहुना मनाला लागलेल्या या अनिष्ट वळणाचीच स्वाभाविक परिणती अपरिहार्यपणे दु:ख भोगावे लागण्यात होते असे म्हणावे लागेल. दुष्कृत्यांचे परिणामस्वरूप किंवा ईश्वरेच्छेमुळे दु:ख भोगावे लागते हे महर्षींना पूर्णपणे अमान्य होते.<br />
<br />
महर्षींच्या विवेचनाला आपल्या अनुभवांशी पडताळून पाहिल्यावर बहुतांशी प्रश्नकर्त्यांना व्यक्तिगत पातळीवर ते मान्य करण्यात अडचण नसली, तरी जगात सर्वत्र सातत्याने दिसणारे दु:ख फक्त द्रष्ट्याच्या मनातच अस्तित्वात आहे ही संकल्पना मात्र कित्येकांच्या पचनी पडत नसे. महर्षी मात्र या बाबतीत आपल्या भूमिकेवर अत्यंत ठाम होते, ते कितीही फिरवून फिरवून प्रश्न विचारले तरी आपल्या भूमिकेपासून तसूभरही ढळत नसत असे स्पष्टपणे दिसून येते. एखाद्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार झाला तर तिला व्यक्तिगत पातळीवरच नव्हे तर जगात सर्वत्र दिसणारे तथाकथित दु:ख अस्तित्वातच नाही अशी स्वानुभवाने खात्री पटते असा निर्वाळा महर्षींनी नि:संदिग्ध शब्दात दिलेला आहे. याच संकल्पनेला तिच्या अंतिम तार्किक निष्पत्तीपर्यंत नेत स्व-स्वरूपाचा बोध करून घेणे हा स्वत:च्या तसेच इतरेजनांच्या दु:खाचा अंत करण्याचा सगळ्यात परिणामकारक मार्ग आहे असे प्रतिपादन महर्षींनी वेळोवेळी केलेले दिसते.<br />
<br />
रमण महर्षी इतरेजनांच्या दु:खाकडे दुर्लक्ष करण्याचा उपदेश आपल्या अनुयायांना देत असत असा त्यांच्या भूमिकेचा अन्वयार्थ लावणे पूर्णपणे चुकीचे, अन्याय्य आणि दुर्दैवी ठरेल. या बाबतीत व्यवहारज्ञानाशी अधिक सुसंगत भूमिका घेत आत्मसाक्षात्कार होण्याआधी साधकांनी स्वत:प्रमाणेच इतरेजनांचेही दु:ख खरेच आहे असे मानून ते दूर करण्यासाठी यथाशक्ती यथामति पावले उचलली पाहिजेत (आत्मौपम्य बुद्धीने वावरले पाहिजे) असा उपदेश महर्षी देत असत. त्या जोडीलाच 'माझ्या तुलनेत दुर्दैवी (आर्थिक, बौद्धिक, सामाजिक प्रतिष्ठा किंवा अन्य बाबतीत खालच्या पातळीवर) असलेल्या लोकांवर मी उपकार करतो आहे' तसेच 'मीच या दुर्दैवी लोकांचा तारणहार आहे' अशा अहंतेला (निकृष्ट पातळीवरच्या मनोव्यापाराला) थारा न देता इतरेजनांना मदत करता आली, तरच पारमार्थिक लाभ होतो अन्यथा नाही ही बाब महर्षी नेहेमी त्यांच्या अनुयायांच्या निदर्शनास आणून देत असत.<br />
<br />
जगात वावरताना एखाद्या व्यक्तीच्या आचरणात कुठल्या गोष्टींचा समावेश असलाच पाहिजे किंवा तिने कुठल्या गोष्टी पूर्णपणे त्याज्य मानल्या पाहिजेत अशा नीती नियमांविषयीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात महर्षींना मुळीच स्वारस्य नव्हते. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे या संदर्भातल्या जगभरच्या सगळ्या पारंपारिक धारणांचे महाजाल हे बेगडी नीतीमूल्यांच्या आधारे न्यायनिवाडा करत मनाने रचलेले थोतांड आहे; मनोनाश झाल्यावर नीती-अनीतीविषयीच्या सगळ्या संकल्पना पार धुळीला मिळतात असा महर्षींचा नैतिकतेविषयीचा एकंदर दृष्टीकोन होता. धार्मिक किंवा अध्यात्मिक जगतात नैतिकतेचा बडिवार माजवण्याची प्रदीर्घ परंपरा असली, तरी महर्षींनी मात्र अगदीच नाईलाज असेल तरच नैतिकतेच्या संदर्भात काहीशा नाखुशीनेच एखाद दुसरे वक्तव्य केल्याचे स्पष्टपणे दिसून येते.नैतिकतेविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एखाद्या प्रश्नकर्त्याने महत्प्रयासाने महर्षींवर दबाव आणला, तर आत्मशोध घेणे हे एकमेव कृत्य माझ्या मते सदासर्वकाळ आणि निर्विवादपणे योग्य ठरणारे आहे, तेव्हा आपण तेच हाती घ्या असे सांगून महर्षी मूळ प्रश्नाला बगल देत असत.<br />
<br />
प्रश्नः जग दु:खाच्या खाईत लोटले जात आहे. आपल्या मते त्या मागचे कारण काय आहे? ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही व्यक्तिगत तसेच सामूहिक पातळीवर काय करायला हवे?<br />
रमण महर्षी: स्वत:चे खरे स्वरूप जाणून घ्या. तेवढी एकच गोष्ट साध्य करणे पुरेसे आहे.<br />
<br />
प्रश्न: बंध किंवा मोक्ष हे वास्तविक पाहता अस्तित्वातच नसतील, तर आम्हाला सुख आणि दु:खाचा खराखुरा अनुभव येण्यामागे काय कारण आहे?<br />
रमण महर्षी: एखादी व्यक्ती जेव्हा तिच्या मूळ (सच्चिदानंद) स्वरूपापासून ढळते, तेव्हा सुखदु:खे खरी वाटायला लागतात. ती खरे सांगायचे तर अस्तित्वातच नसतात.<br />
<br />
प्रश्नः जर ईश्वरच 'सबकुछ' आहे, तर आपण केलेल्या कृत्याचे दु:खद परिणाम एखाद्या व्यक्तीला का भोगावे लागतात? जी कृत्ये केल्याने व्यक्तीला दु:ख भोगावे लागते, ती ईश्वरी संकेतानुसार होत नाहीत?<br />
रमण महर्षी: 'मी कर्ता आहे' या भूमिकेतून जो वावरतो, त्यालाच सुख किंवा दु:ख भोगणे भाग पडते.<br />
<br />
प्रश्नः पण सगळी कृत्ये तर ईश्वरी संकेतानुसार घडतात, व्यक्ती ही फक्त ईश्वरी सत्तेच्या हातातले एक साधन असते.<br />
रमण महर्षी: हा तर्क तुम्ही फक्त दु:ख भोगावे लागले की वापरता, विनासायास सुख मिळाल्यावर नाही. 'मी ईश्वरी सत्तेच्या हातातले निव्वळ एक उपकरण आहे' अशी शरणागत भूमिका तुम्ही स्थळ, काळ आणि परिस्थितीची पर्वा न करता सुखदु:खाच्या सगळ्या प्रसंगात सातत्याने निभावली, तर दु:ख तुमच्या जीवनातून आपोआप हद्दपार होईल.<br />
<br />
प्रश्नः जगात कित्येक महान व्यक्ती आहेत, समाजसेवक आहेत, मात्र त्यांना कुठलाही प्रश्न पुरता सोडवता येत नाही. सर्वत्र पसरलेली अनागोंदी आणि दुरावस्था कमी करता येत नाही.<br />
रमण महर्षी: अशा व्यक्ती बहुतांशी अहं-केंद्रित असतात, आणि तेच त्यांच्या असहायतेचे कारण आहे. हेच लोक स्वरूपात स्थित असते, तर त्यांची गती काही वेगळीच झाली असती.<br />
<br />
प्रश्नः ज्ञानी किंवा महात्मे मदत का करत नाहीत?<br />
रमण महर्षी: आपण हा निष्कर्ष कुठल्या आधारावर काढला की ते मदत करत नाहीत? जगभरची समाजहितासाठी चाललेली दांभिक प्रवचनबाजी, तथाकथित सामाजिक कार्यच नव्हे तर आवश्यक वस्तुंचा पुरवठा या स्वरूपात चाललेले ठोस स्वरूपाचे मदतकार्य या तिन्ही गोष्टी एका बाजूला आणि महात्म्यांचे मौन तेवढे दुसर्या बाजूला - यात तुलना केली तर महात्म्यांच्या मौनाचे पारडेच नि:संशयपणे भारी पडेल! (न बोलताच) ज्ञानी इतरांच्या तुलनेत खूप काही साध्य करून जातो.<br />
<br />
प्रश्नः कर्म करत असलेल्या व्यक्तीच्या मनात असलेल्या हेतूंचे काय? प्रत्येक कृत्यामागचा कर्त्याचा हेतू महत्वाचा नसतो?<br />
रमण महर्षी: प्रामाणिकपणे, प्रेमपूर्वक, साधनशुचिता पाळून आणि शांत मनाने केलेले कुठलेही कृत्य हे सत्कृत्यच आहे. वासनांनी डागाळलेले, अहंतेचा दंश असलेले आणि मनाचा क्षोभ करणारे कुठलेही कृत्य दुष्कृत्यच ठरते. 'ज्याचा शेवट गोड, ते सारेच गोड' असा विचार करत कुठलेही सत्कृत्य गैरमार्गाने करू नका. गैरमार्गाने केलेले सत्कृत्य देखील शेवटी दुष्कृत्यातच परिणत होते. त्यामुळे कर्म करण्यामागच्या सद्भावनेइतकेच कर्म करण्यासाठी स्वीकारलेल्या पद्धतीच्या साधनशुचितेचे महत्व आहे.<br />
<br />
प्रश्नः मुक्ती मिळवण्यासाठी सदाचरण करणे पुरेसे नाही का?<br />
रमण महर्षी: कोणासाठी मुक्ती? मुक्तीची ईच्छा धरणारा कोण आहे? सदाचरण म्हणजे 'सत आचरण', आपल्याला या शब्दाने नेमके काय अभिप्रेत आहे? काय योग्य आहे आणि काय अयोग्य याचा निवाडा कोण करणार? तो कोणत्या निकषांवर करणार? आपापल्या पूर्वसंस्कारांच्या, धारणांच्या आणि पूर्वग्रहांच्या मोजपट्टीने प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने योग्य काय आणि अयोग्य काय याचा निवाडा करत बसते. खरे सांगायचे झाले तर वास्तविकतेचा यथार्थ आणि परिपूर्ण बोध झाला तरच योग्य काय आणि अयोग्य काय हे आपोआप लक्षात येते. मुक्तीची आस ज्याच्या मनात आहे त्या 'मी' चे खरे स्वरूप जाणून घेणे हाच त्यासाठीचा राजमार्ग आहे. बंधनात वावरत असल्याच्या भ्रमात असलेल्या खोट्या 'मी' ला किंवा अहंतेला (अध्यात्मिक साधनेने) तिच्या उगमस्थानाप्रत मागे नेत मूळ (सच्चिदानंद) स्वरूपात विलीन करून टाकणे हेच प्रत्येक व्यक्तीच्या हिताचे ठरेल असे खरे सदाचरण आहे. <br />
<br />
पुरवणी:<br />
<br />
स्वरूपज्ञान झाल्याने दु:खाचे मूळ कारणच नाहीसे झाल्याचे वर्णन पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंदांनी असे केले आहे:<br />
<br />
छाया तैसा देह, मानितो स्वभावे, नाही आम्हा ठावे, सुख-दु:ख<br />
जन्म-मरणाचा, संपला संसार, झाला साक्षात्कार, स्वरूपाचा<br />
कैचा देश-काळ, विश्व चि केवळ, माया-मृगजळ, कळो आले<br />
स्वामी म्हणे आम्ही, अनादि अनंत, सुख-दु:खातीत, स्वयंसिद्ध<br />
<br />
अंतर्यामी अवधूत स्थितीत असलेल्या ज्ञान्यासाठी विधी-निषेधांचे महात्म्य उरत नाही हे स्वामीजींनी असे सांगितले आहे:<br />
<br />
नेणे विधी ना निषेध, नेणे पाप-पुण्य-बंध<br />
नेणे लौकिक-संबंध, जगी वागतो स्वच्छंद<br />
घर दार ना संसार, सदा राहे निराधार<br />
स्वामी म्हणे संतजन, तया कैचे जगद्भान!<br />
<br /></div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-54046961256751454812020-06-30T03:57:00.000-07:002021-05-11T07:17:11.878-07:00भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १९ - ईश्वराचे स्वरूप<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
वैदिक सहा दर्शनांपैकी (सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत) सांख्य आणि मीमांसा ही दर्शने निरीश्वरवादी आहेत. निरीश्वरवाद ही संकल्पना जुनीच आहे. वैदिक परंपरेला निरीश्वरवादाचे वावडे नाही. असे असले तरी काळाच्या कसोटीवर उतरल्याने (मूळ तत्वांना बाधा न आणता बदलत्या काळानुसार अत्यंत उच्च कोटीच्या सत्पुरूषांनी वेळोवेळी उजाळा दिल्याने) वेदांत तत्वज्ञानाची महती आजही अखंडपणे टिकून आहे या गोष्टीचा आवर्जुन उल्लेख करत मूळ विषयाकडे वळतो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
या प्रकरणात ईश्वराच्या स्वरूपाविषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रथमदर्शनी भगवान रमण महर्षींनी ईश्वराविषयी केलेली विधाने एकमेकांशी विसंगत असल्याने तसेच काही बाबतीत ती परस्पर विरोधी देखील असल्याने कोड्यात टाकणारी वाटतात. प्रसंगोप्पात त्या त्या संदर्भानुसार परमेश्वर कधीच काही करत नाही (तो सदैव अकर्ता असतो), तर कधी ईश्वरी संकल्पाविना झाडाचे पान देखील हलत नाही अशी विधाने ते करत असत. कधी ईश्वर ही एक मनोनिर्मीत संकल्पना आहे, तर कधी ईश्वर ही चराचराला व्यापून दशांगुळे उरणारी एकमेव वस्तुस्थिती किंवा सद्वस्तु (सत्य) असल्याचे ते सांगत असत. प्रश्नकर्त्यांच्या आकलनक्षमतेतला तसेच त्यांच्या वैचारिक पार्श्वभूमीतला फरक लक्षात घेतला, तर महर्षींसमवेत त्यांचे वेगवेगळ्या पातळ्यांवर संवाद होत असल्याचे जणू प्रतिबिंबच महर्षींनी दिलेल्या वरपांगी पाहता विसंवादी वाटत असलेल्या उपदेशांमधे स्पष्टपणे दिसून येते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
सगुण साकार स्वरूपात ईश्वराची भक्ती करत असलेल्या साधकांचा बुद्धिभेद न करता देव मनुष्य-सदृश स्वरूपात अस्तित्वात आहे या गृहीतकार आधारित असलेले विवेचन महर्षी करत असत. ईश्वरच सृष्टीचा निर्माता आहे, श्रीकृष्णाने करंगळीने गोवर्धन पर्वत उचलावा तसे आपल्या दैवी शक्तीने तोच जगाचा भार वाहतो आहे, सगळ्या जीवसृष्टीचे भरणपोषण करण्याची काळजी तोच घेतो आहे, तसेच ईश्वरी संकल्पाच्या विरोधात गेले असता काहीही साध्य करता येत नाही - साधारणत: अशा स्वरूपाचा उपदेश सगुण साकार उपासकांना महर्षी देत असत. साधकाचे/ साधिकेचे स्वतंत्र व्यक्तिमत्व जोवर अस्तित्वात आहे, तोवर सगुण साकार ईश्वरभक्ती उपकारक आहे (किंवा तोच चित्तशुद्धीचा राजमार्ग आहे) हा महर्षींच्या शिकवणीचा गाभा होता. (हाच मार्ग पुढे अनन्य शरणागतीच्या/ समर्पणभावाच्या आणि ओघानेच आत्मज्ञानप्राप्तीच्या दिशेने जातो. 'भक्ती ही ज्ञानमाता आहे' असे महर्षी नेहेमी सांगत असत).</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
त्या उलट सगुण साकाराविषयी आकर्षण नसलेल्या (निर्गुण निराकाराकडे ओढा असलेल्या) साधकांना ईश्वर आणि ईश्वरी सत्तेविषयीच्या उपरोक्त संकल्पना 'अथ ते इति' मनोनिर्मीत असून प्रत्येकाच्या अंतर्यामी जन्मजातच लाभलेल्या ईश्वरी प्रचितीचा/ सच्चिदानंद स्वरूपाचा (हृदयस्थो जनार्दनः) अनुभव घेण्यात त्या बाधक ठरतात असा उपदेश महर्षी देत असत. महर्षींच्या सर्वोच्च पातळीवरच्या उपदेशात 'ईश्वर' तसेच 'स्व-स्वरूप' या शब्दांचा प्रयोग आत्मसाक्षात्कार झाल्यावर ज्या स्वयंसिद्ध स्वसंवेद्य परतत्वाची (सर्वेश्वराची) प्रचिती येते, त्या अद्वैतानुभूतीचेच जणू ते समानार्थी शब्द असावेत अशा प्रकारे केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे महर्षींच्या उपदेशानुसार आत्मसाक्षात्कार हाच ईश्वरी साक्षात्कार आहे. ईश्वराची (द्वैतभावाने) प्रचिती घेणे असा ईश्वरी साक्षात्काराचा अर्थ होत नाही, उलट साधक आणि ईश्वर यांच्या संबंधातला द्वैतभाव नष्ट झाल्यावर साधकाचा आपल्या स्वायत्त अस्तित्वाचा भ्रम लयाला गेल्याने त्याला एकतत्वाचा बोध होतो असा अर्थ महर्षींना अभिप्रेत आहे या त्यांनी वेळोवेळी केलेल्या विवेचनातून स्पष्ट होते (उदाहरणः अरे अरे ज्ञाना झालासी पावन । तुझें तुज ध्यान कळों आले ॥ तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव । फिटला संदेह अन्य तत्त्वी ॥ - संत ज्ञानेश्वर महाराज).</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
भगवान रमण महर्षींनी आत्मानुभवाच्या पातळीवरून केलेल्या ईश्वरविषयक विवेचनाचा गोषवारा असा घेता येईलः</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
१. ईश्वर स्वसंवेद्य, स्वयंसिद्ध आणि निराकार आहे. ईश्वर उपाधी रहित, निखळ अस्तित्वमात्र तसेच विशुद्ध चैतन्यस्वरूप आहे.<br style="box-sizing: border-box;" />२. ईश्वरी शक्तीच्या आधारे ईश्वरातच जग प्रकट होते (ईश्वर आणि जगाचा स्वरूप - संबंध आहे), मात्र तो विश्वाचा निर्माता नाही. संकल्प आणि वासनांपासून ईश्वर नित्यमुक्त आहे. ईश्वरी अस्तित्व स्वयंसिद्ध असले तरी ईश्वर कधीच संकल्पयुक्त क्रिया करत नाही.<br style="box-sizing: border-box;" />३. आपण आणि ईश्वर एकरूप असल्याचा बोध नसेल, तर स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा भ्रम निर्माण होतो. या भ्रमाचे आवरण दूर केले की फक्त ईश्वरच बाकी उरतो किंवा साधक आणि ईश्वर एकरूप होऊन जातात (उदा. देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होउनी ठेलो - संत तुकाराम महाराज).</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
सर्वेश्वराव्यतिरिक्त हिंदू पुराणांमधे नॉर्स किंवा ग्रीक पुराणांप्रमाणेच बहुविध देव/ देवतांचे वर्णन केलेले आहे. याच देव/ देवता सांप्रतच्या काळात हिंदू धर्माचे प्रमुख वैशिष्ट्य झाल्याचे दिसून येते. या देव देवता त्यांची उपासना करत असलेल्या लोकांइतक्याच सत्य आहेत असे सांगून महर्षी कित्येकांना आश्चर्याचा धक्का देत असत. आत्मसाक्षात्कार झाल्यावर ईश्वर (एकेश्वरवादी) असेल किंवा बहुविध देव/ देवता (इष्टदैवत या स्वरूपात) असतील; साधकांच्या दृष्टीने पाहता त्यांचे प्राक्तन एकसारखेच असते (देवतेचे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही, साधकच उपास्य देवतेत विलीन होऊन जातो) हे महर्षीं मान्य करत असत. साक्षात्कारी स्थिती प्राप्त करण्याआधी विश्वाचे संचलन करत असलेल्या सर्वोच्च ईश्वरी सत्तेने नेमेलेले विशिष्ट जबाबदारी पार पाडणारे उच्चपदस्थ अधिकारी अशा स्वरूपात देव/ देवतांचे पूजन करणे किंवा त्यांची सकाम उपासना करण्याला देखील महर्षी मान्यता देत असत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः ईश्वराचे वर्णन सगुण साकार आणि निर्गुण निराकार दोन्ही पद्धतींनी केले जाते. सगुण साकार ईश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपातच अवघे जग समाविष्ट आहे असे मानले जाते. असे असेल तर या जगाचाच एक घटक असलेल्या आम्हाला परमेश्वराच्या व्यक्त स्वरूपाचा सहजतेने प्रत्यय यायला हवा.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: ईश्वराच्या तसेच जगाचा स्वरूपाविषयी किंवा सत्यासत्यतेविषयी निर्णय घेण्याआधी तुम्ही स्व-स्वरूपाची ओळख करून घेणे तुमच्या हिताचे आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः स्व-स्वरूपाचा बोध झाल्यानेच ईश्वरी साक्षात्कार घडेल?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: खचितच, देव तुमच्या अंतर्यामी आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्न: मग स्व-स्वरूपाला जाणून घेण्यात किंवा ईश्वरी साक्षात्कार होण्यात अडसर कशाचा आहे?<br style="box-sizing: border-box;" />रमंण महर्षी: इतस्ततः भटकणारे मन आणि जगण्याची विपर्यस्त पद्धत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः ईश्वर ही एक व्यक्ती आहे का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: होय, ईश्वर नेहेमीच प्रथमपुरूषी एकवचनी ('मी' चे शुद्ध चैतन्यस्वरूप) असतो, तो नेहेमी दत्त म्हणून तुमच्या पुढ्यात उभा असतो. तुम्ही जागतिक घडामोडींना अवास्तव महत्व देत असल्याने तो दृष्टीआड होतो. तुम्ही अवांतर गोष्टींमधे स्वारस्य घेणे थांबवले आणि केवळ ईश्वरप्राप्तीचाच मनोमन ध्यास घेतला तर (अवांतर गोष्टी दृष्टीआड होत) सच्चिदानंद स्वरूपात फक्त त्याचेच प्राकट्य शिल्लक उरते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः आपण असे सांगता की ईश्वरविषयक मांडलेली कुठलीही व्याख्या, मग ती कितीही उच्च उदात्त आणि महान असेल, तरी ती निव्वळ संकल्पनाच असते. याचा अर्थ असा घ्यावा का की ईश्वरच अस्तित्वात नाही?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: नाही, (ज्याच्याविषयी कुठलीही संकल्पना शब्दात मांडता येत नाही असे) ईश्वराचे अस्तित्व नित्यसिद्ध आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः मी जेव्हा जेव्हा सगुण साकार रूपात ईश्वराचे पूजन करतो, दर वेळी आपण काही चूक तर केली नाही ना असा एक संदेह माझ्या मनात निर्माण होतो. अमर्याद असलेल्या ईश्वराला मर्यादेत बंदिस्त करणे, निराकाराला साकार स्वरूपात भजणे हा एक प्रकारचा प्रमादच नाही का? त्याच वेळी निर्गुण निराकार स्वरूपात ईश्वरी उपासना करताना सातत्य ठेवणे मला कठिण जाते.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: तुम्ही विशिष्ट नावाने पुकारले असता लगेच प्रतिसाद द्याल की नाही? तुम्ही नामरूपात्मक जगतच सत्य आहे असे मानून जगता, तोवर सगुण साकार स्वरूपातच तुम्ही ईश्वरी उपासना करावी यात आक्षेपार्ह काय आहे? आपल्या स्वरूपाचा बोध होत नाही तोवर ईश्वरी उपासना सुरू ठेवा, ती सगुण साकार किंवा निर्गुण निराकार स्वरूपात असल्याने काही फरक पडत नाही.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
पुरवणी:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंदांनी केलेले मार्गदर्शन अध्यात्मिक साधकांच्या दृष्टीने मोलाचे आहे:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
शब्दाचे पांडित्य, कल्पनेच्या गोष्टी, वाउगी चावटी, करू नये<br style="box-sizing: border-box;" />तेणे पोटी उठे, दंभ अभिमान, आत्म-समाधान दूर राहे<br style="box-sizing: border-box;" />गोडी कळावया, द्यावा गूळ खाया, देव ओळखाया, स्वानुभव<br style="box-sizing: border-box;" />स्वामी म्हणे नाही, पांडित्याचे काम, स्वये आत्माराम, दाखवावा<br style="box-sizing: border-box;" />(संदर्भः स्वामी स्वरूपानंद कृत संजीवनी गाथा)</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
स्वामीजींची वर-प्रार्थना अशी आहे:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; overflow-wrap: break-word;">
उदारा जगदाधारा देई मज असा वर | स्व-स्वरुपानुसंधानी रमो चित्त निरंतर ||१||<br style="box-sizing: border-box;" />काम-क्रोधादिका थारा मिळो नच मदंतरी | अखंडित वसो मूर्ति तुझी श्रीहरी साजिरी ||२||<br style="box-sizing: border-box;" />शरीरी हि घरी दारी स्त्रीपुत्रादि परिग्रही | अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही ||३||<br style="box-sizing: border-box;" />नको धन नको मान नको लौकिक आगळा | सोडवी हा परी माझा मोहपाशातुनी गळा ||४||<br style="box-sizing: border-box;" />नको भोग नको त्याग नको विद्या नको कला | अवीट पदपद्माची अमला भक्ति दे मला ||५||<br style="box-sizing: border-box;" />नर नारी हरिरूप दिसो बाहेर अंतरी | राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी ||६||<br style="box-sizing: border-box;" />मी-माझे मावळो सर्व तू तुझे उगवो अता | मी-तूपण जगन्नाथा, होवो एक चि तत्वता ||७||<br style="box-sizing: border-box;" />देव-भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता | दाखवी देव-देवेशा, प्रार्थना ही तुला आता ||८||<br style="box-sizing: border-box;" />(संदर्भः स्वामी स्वरुपानंद कृत भावार्थ ज्ञानेश्वरी)</div>
</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-69221953942164913992020-06-28T05:31:00.001-07:002021-05-11T07:17:07.333-07:00भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १७ - विश्वनिर्मिती विषयक सिद्धांतप्रणाली आणि जगाचे सत्यत्व<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
या प्रकरणापासून 'अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोह' हा विभाग सुरू होतो. या विभागातल्या पहिल्या प्रकरणात विश्वनिर्मिती संबंधित विविध सिद्धांतप्रणाली तसेच जगाच्या सत्यत्वाविषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
अध्यात्मिकतेशी संलग्न असलेल्या सैद्धांतिक प्रणालींमधे रमण महर्षींना 'न के बराबर' इतकेच स्वारस्य होते. 'स्व' विषयीचे सजग भान जागृत ठेवणे ही साधकांच्या जीवनातली सर्वोच्च प्राथमिकता व्हावी ही एकमेव गोष्ट महर्षींच्या दृष्टीने सगळ्यात मोलाची होती. ती साध्य करायची असेल तर तर्कवितर्क करण्यात वेळ दवडण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती (साधना/ उपासना) करणेच अत्यंत महत्वाचे आहे असे आग्रही प्रतिपादन ते सातत्याने करत असत. निव्वळ सैद्धांतिक स्वरूपाच्या चर्चांना प्रोत्साहन मिळू नये या दृष्टीने तर्ककुतर्क सुरु झाले की महर्षी एक तर मौन धारण करत असत, किंवा शक्य असेल तर प्रश्नकर्त्याला ' जो सगळ्या शंका कुशंका उपस्थित करतो आहे त्याच्या स्वरूपाचा शोध घेण्याकडे लक्ष केंद्रित केलेत तर तेच तुमच्या हिताचे ठरेल' असे सांगत संवादाची दिशाच बदलण्याचा ते प्रयत्न करत असत. क्वचित प्रसंगी साधकांच्या दृष्टीने खरोखर उपयुक्त ठरेल असे वाटले तरच तत्वज्ञानाच्या विविध पैलूंवर महर्षींनी सविस्तर भाष्य देखील केलेले दिसते. प्रश्नकर्त्याने तळमळीने विचारलेले प्रश्न संपल्यावर त्याने/ तिने निव्वळ आपलाच मुद्दा पुढे रेटण्यासाठी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली किंवा संवादाचा रोख वांझोट्या बौद्धिक कसरतींच्या ('स्टराईल इंटेलेक्चुअलिझम') दिशेने जातो आहे हे लक्षात आल्यावर मोठ्या खुबीने विषयांतर करून प्रश्नकर्त्याचे लक्ष त्याच्या/ तिच्या जिव्हाळ्याच्या तसेच व्यावहारिक दृष्ट्या उपयुक्त असलेल्या विषयांकडे वळवण्यात महर्षी कुशल होते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
जगाचे सत्यत्व किंवा विश्वाच्या उत्पत्तीबाबात सामान्यज्ञानाने ('कॉमन सेन्स') काढलेल्या निष्कर्षांपेक्षा रमण महर्षींचा दृष्टीकोन खूपच आगळावेगळा असल्याचे सर्वज्ञात असल्याने त्यांच्याबरोबर झालेल्या तात्विक चर्चेत हे दोन्ही विषय प्रामुख्याने चर्चिले जात असत. प्रश्नकर्त्याची भूमिका तसेच त्याच्या/ तिच्या वैचारिक परिपक्वतेशी सुसंगत ठरतील अशा पद्धतीने अन्य तात्विक विषयांप्रमाणेच महर्षी या दोन्ही विषयांवर दिलेली उत्तरे देखील शिंप्याने एखाद्याच्या मापाचे कपडे शिवावे तद्वतच 'बेतून' देत असत. असे असले तरी महर्षींच्या संकल्पना बहुसंख्य लोकांनी नि:शंकपणे स्वीकारलेल्या तसेच मनोभावे अंगिकारलेल्या भौतिक जगाच्या सत्यत्वाचे पूर्णपणे खंडन करण्याकडे झुकलेल्या होत्या हे सहज लक्षात येते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
भौतिक जगाविषयी बोलताना महर्षी तीन वेगवेगळ्या भूमिका घेत असत. तिन्ही भूमिकांचे महर्षींनी वेळोवेळी (ठराविक परिप्रेक्ष्यात) समर्थन केलेले दिसले, तरी त्यांनी वेळोवेळी केलेल्या टिकाटिप्पणींकडे साक्षेपाने पाहिले असता पहिले दोन सिद्धांतच सत्य आहेत किंवा साधकांसाठी उपयुक्त आहेत असे त्यांचे ठाम मत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">१. अजातवाद ('अगा जे घडलेची नाही', कार्यकारणभाव पूर्णपणे नाकारणारा सिद्धांत, अध्यात्मिक सत्य) -</span></div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
जगाच्या उत्पत्तीसंबंधी विचार करू पाहता मुळात जगाची उत्पती कधीच झालेली नाही असे प्रतिपादन करणारी 'अजातवाद' ही एक प्राचीन हिंदू तत्वप्रणाली आहे. भौतिक जगातल्या कार्यकारणभावाला ही तत्वप्रणाली पूर्णपणे नाकारते. ज्ञानसिद्ध व्यक्तीची प्रचिती लक्षात घेतली तर आत्मतत्व ही एकमेव सद्वस्तु अपरिवर्तनीय वास्तविकतेच्या स्वरूपात निरंतर नांदत असते. त्यामुळे आत्मस्वरूपात कुठलीही गोष्ट अस्तित्वात येणे किंवा तिचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यताच नसते. जगाच्या उत्पत्तीविषयीचच्या बहुतांशी सगळ्याच सिद्धांतप्रणाली काळ, अवकाश आणि कार्यकारण भावावर आधारित असल्याने या तीन गोष्टी गृहीत न धरता त्या मांडताच येत नाहीत. अजातवाद ही एकमेव पूर्णपणे विपरीत भूमिका घेणारी सिध्दांतप्रणाली आहे. अजातवाद असे सांगतो की काळ, अवकाश आणि कार्यकारण भावाचे अस्तित्व फक्त अज्ञानी व्यक्तीच्या मनातच असते. आत्मप्रचिती आली की या तिन्ही गोष्टी अस्तित्वातच नाहीत असा बोध होतो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
अजातवाद सिद्धांतप्रणाली जगाचे सत्यत्व (व्यावहारिक वस्तुस्थिती) नाकारत नाही. जगाच्या उत्पत्तीची प्रक्रिया मात्र अजातवादाला पूर्णपणे अमान्य आहे. ज्ञानी व्यक्तीला जगाच्या सत्यत्वाचाच अनुभव येतो, मात्र परस्परांवर क्रिया प्रतिक्रिया घडत असल्याने सतत परिवर्तनशील असलेल्या नानाविध प्रकारच्या जड वस्तु आणि उर्जा यांची गोळाबेरीज असे त्या जगाचे स्वरूप नसते. ज्ञानदृष्टीने पाहता आत्मस्वरूपात अकारण प्रकट झालेला एक देखावा इतकेच जगाचे सत्यस्वरूप आहे. हा मुद्दा उलगडून दाखवताना महर्षी असे सांगत असत की जगत रूपी देखाव्याचे खरे स्वरूप किंवा त्या देखाव्यामागे सुप्त स्वरूपात असलेले पायाभूत चैतन्य (substratum) आणि स्वसंवेज्ञतेचे कार्यकलाप संभवत नसलेले निखळ अस्तित्व (beingness of the Self) ही एकच गोष्ट असल्याने स्वसंवेज्ञतेतच अपरिहार्यपणे जगद्रूप असलेला देखावा समाविष्ट झालेला असतो. ज्ञानसिद्ध व्यक्तीसाठी जग प्रकट स्वरूपात दृष्टीगोचर असल्याने नव्हे, तर आत्मस्वरूपाचाच एक अविभाज्य घटक या स्वरूपात सत्य असते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
जगाचे उगमस्थान (स्वसंवेज्ञता) तसेच त्याच्या अनेकत्वामागे दडलेल्या एकत्वाविषयी अज्ञानी व्यक्ती मात्र पूर्णपणे अनभिज्ञ असते. परिणामस्वरूप ज्ञानेंद्रियांमार्फत मिळवलेल्या माहितीचा सातत्याने चुकीचा अन्वयार्थ लावत उर्जेच्या संयोगाने क्रिया प्रतिक्रियांमधे गुंतलेल्या स्वायत्त वस्तुंचा समूह अशा स्वरूपात अज्ञानी व्यक्ती तिच्या मनानेच सतत आभासी जगाची निर्मिती करत राहते. अज्ञाननिर्मित जग मूळ वस्तुस्थितीवर मनाने आरोपित केलेले असल्याने ज्ञानदृष्टीने पाहता त्याचे मूल्य स्वप्नाइतकेच आहे. या सगळ्या उहापोहाचे सार रमण महर्षी एका वाक्यात सांगत असत - आत्मस्वरूपात अंतर्भाव असलेला एक देखावा या स्वरूपात जग सत्य आहे, मात्र मनाने मूळ सत्यस्वरूपावर आरोपित केलेले जग मिथ्या आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">२. दृष्टी - सृष्टी वाद (मी आहे त्यामुळे जग आहे, मीच माझे जग निर्माण करतो, प्रातिभासिक सत्य) -</span></div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
'अजातवाद' सिद्धांतप्रणाली प्रश्नकर्त्याच्या पचनी पडत नसेल तर महर्षी असे प्रतिपादन करत असत की 'मी आहे' या विचाराबरोबरच ('मी' च्या सापेक्षतेत) जग अस्तित्वात येते (उदा. गाढ झोपेतून जाग आल्यावर). 'मी आहे' हा विचार नसेल तर जगाचे ('मी' च्या सापेक्षतेत असलेले) अस्तित्व संपुष्टात येते (उदा. निद्रीस्त झाल्यावर). अद्वैत वेदांतात या सिद्धांतप्रणालीला दृष्टी - सृष्टी वाद असे नाव दिलेले आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर अज्ञानी व्यक्ती अनुभवत असलेले जग हे मुळातच वस्तुस्थितीवर मनाने आरोपीत केलेले स्वप्न असल्याने मन निद्रिस्त झाले की त्या जगाचे अस्तित्व संपुष्टात येते. मन स्वतःला पूर्णपणे सत्य वाटेल असे आभासी जगत निर्माण करण्यासाठी सक्षम आहे हा सिद्धांत सिद्ध करण्यापुरतीच दृष्टी - सृष्टी वादाची धाव आहे. आत्मस्वरूपाच्या भूमिकेतून पाहिले असता आभासी 'मी' ने मनाद्वारे निर्माण केलेले स्वप्नवत जगत असे जगाचे एकंदर स्वरूप असल्याने जगाची खरोखरच निर्मिती झालेली आहे असे अजिबात सिद्ध होत नाही. रमण महर्षी कधी कधी असे सांगत असत की 'दृष्टी - सृष्टी वाद' सिद्धांतप्रणालीत विश्वनिर्मीतीशी संबंधित अंतिम सत्याचा समावेश नसला, तरी एक कामचलाउ गृहीतकप्रमेय ('वर्किंग हायपोथेसिस') या स्वरूपात तिचा स्वीकार करणे साधनेच्या दृष्टीकोनातून पाहता उपयुक्त आहे. हा मुद्दा आणखी स्पष्ट करून सांगताना जगाकडे सातत्याने 'मनाने निर्माण केलेला एक चकवा' या स्वरूपात पाहण्याची सवय लावून घेतली, तर बाह्य जगताविषयी वाटणारे आकर्षण साहजिकच कमी होते. त्या योगे चित्त विचलित होणे कमी झाल्याने सतत स्वरूपानुसंधान साधणे सुलभ आणि सुकर होते असे स्पष्टीकरण महर्षी देत असत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<span style="box-sizing: border-box; font-weight: 700;">३. सृष्टी - दृष्टी वाद (जगाचे स्वायत्त अस्तित्व, उत्क्रांती वाद, व्यावहारिक सत्य) -</span></div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
जगाच्या उत्पत्तीबद्दल सामान्यज्ञानाने ('कॉमन सेन्स') आकलन होण्याजोगी ही एक सिद्धांतप्रणाली आहे. या सिद्धांतप्रणालीनुसार 'कार्यकारण भावाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली वस्तुनिष्ठ वास्तविकता' असे जगाचे स्वरूप असल्याने जगाच्या निर्मितीचा मागोवा घेतला असता कोण्या एका विवक्षित क्षणी जगाच्या निर्मितीची घटना घडली असावी ही एकमेव शक्यता संभवते. पाश्चात्य जगतात प्रचलित असलेल्या बायबल मधील सृष्टीच्या उत्पत्तीची कथा ते 'बिग बँग थिअरी' पर्यंतच्या सगळ्या संकल्पनांचा समावेश सृष्टी - दृष्टी वादातच होतो. अजातवाद किंवा दृष्टी - सृष्टी वादाचा भावार्थ समजावून घेण्यासाठी एखादा साधक पूर्णपणे अपात्र आहे किंवा त्या सिद्धांतप्रणालीं त्याला पूर्णपणे अमान्य आहेत असे लक्षात आल्यावरच महर्षी सृष्टी - दृष्टी वादावर आधारलेल्या सिद्धांतप्रणालींचा उल्लेख करत असत. बौद्धिक कुतुहल शमविण्यापलीकडे सृष्टी - दृष्टी वादावर आधारलेल्या सिद्धांतप्रणालींची धाव जात नसल्याने पारमार्थिक साधकांनी त्यांना अवास्तव महत्व देण्याची गरज नाही अशी शिकवण महर्षी सातत्याने देत असत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
*** व्यावहारिक सत्य, प्रातिभासिक सत्य आणि अध्यात्मिक सत्य या वेदांतातल्या संकल्पना उपरोक्त विवेचनात स्पष्ट केलेल्या आहेत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः सृष्टीची निर्मिती कशी झाली? काही लोक म्हणतात की ती पूर्वनियोजीत (ईश्वरी संकल्प) घटना आहे. काही लोक म्हणतात की ही सारी ईश्वराची लीला आहे. सत्य नेमके काय आहे?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: जगभरच्या धार्मिक साहित्यामधे विविध सिद्धांत दिलेले आहेत. पण (सृष्टीची) निर्मिती खरोखर झालेली आहे का? निर्मिती झालेली असेल तरच तदनुषंगिक स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. आपल्यापैकी किती जणांना विश्वनिर्मितीविषयीच्या सगळ्या सिद्धांतप्रणालींची साद्यंत माहिती असते? एक गोष्ट मात्र आपल्याला पक्की माहित आहे की मी अस्तित्वात आहे. साहजिकच मी असा सल्ला देतो आहे की 'मी' चे खरे स्वरूप आधी जाणून घ्या, विश्वनिर्मिती झाली अथवा नाही हे त्या नंतर ठरवायला काय हरकत आहे?</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः विश्वनिर्मितीच्या मागचा हेतू काय आहे?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: (स्मितहास्य करत) हा प्रश्न उपस्थित व्हावा हा एकमेव हेतू आहे. या प्रश्नाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरू करा, आणि शेवटी अवघ्या अस्तित्वाच्या निर्मितीची गंगोत्री असलेल्या आत्मस्थितीत लीन होऊन जा किंवा वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर सर्वोच्च सत्याचा साक्षात्कार करून घ्या. विश्वनिर्मितीमागच्या हेतूचा शोध घेण्यासाठी केलेल्या मानवी प्रयत्नांची परिणती शेवटी स्वरूपाचा शोध घेण्यातच होते. अनात्मतत्वाला दूर सारत सच्चिदानंद स्वरूपाचा त्याच्या चैतन्यमय विशुद्ध अवस्थेत साक्षात्कार झाला तरच साधकाचे समाधान होते. परम विश्रांत असलेली आत्मस्थिती प्राप्त केल्यावर साधकाचे प्रयत्न आपोआप थांबतात.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
विश्वनिर्मीतीबद्दल जगभर किती सिद्धांतप्रणाली असाव्यात याची तर गणतीच नाही! त्यांचा सारा शोध बहिर्गामी आहे (बाह्य जगाच्या वस्तुनिष्ठ विश्लेषणाच्या आधारे चाललेला आहे). काळ आणि अवकाश अमर्याद असल्याने रोज नवनव्या सिद्धांतप्रणाली निर्माण होत राहतील. त्या मन आणि बुद्धीच्या चौकटीतच घुसमटत राहतील. त्या पेक्षा मनाच्या उगमस्थानाचा शोध आरंभला, तर काळ आणि अवकाशाच्या मर्यादा ओलांडून स्वरूपाची प्रचिती येते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
तुमच्या लक्षात येईल की जो तो आपले स्वत:चे समाधान करण्यासाठी विश्वाच्या उत्पत्तीचे वैज्ञानिक किंवा तार्किक स्पष्टीकरण शोधण्याच्या प्रयत्नात असतो. या बाबतीत निर्णायक स्वरूपाची तर्कनिष्पत्ती निघणे कालत्रयी तरी शक्य होणार आहे का? क्रमसृष्टीवर (क्रमशः विकसित होत गेलेले जग) आधारित असंख्य सिद्धांतप्रणाली आहेत. त्या उलट दृष्टी - सृष्टी वादाप्रमाणे 'युगपात सृष्टी'(simultaneous creation) हेच सृष्टीचे खरे स्वरूप आहे. द्रष्टा नसेल तर कुठलीही गोष्ट दृश्यमान होत नाही. द्रष्ट्याच्या स्वरूपाचा शोध घेतला तर अवघी सृष्टी द्रष्ट्यातच सामावलेली दिसते. दृष्टीला बहिर्मुख करून अंतहीन असलेल्या इंद्रियगोचर घडामोडींचा अन्वयार्थ लावत बसल्याने हाती काय येणार आहे?</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्न: महर्षी नेहेमी असे सांगतात की माया आणि ब्रह्म एकच आहे. हे कसे शक्य आहे?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: आदि शंकराचार्यांची 'माया' ही संकल्पना नीट न समजल्यानेच त्यांना अनाठायी आणि अनुदार टीकेचे धनी व्हावे लागले. शंकराचार्यांचा उपदेश असा आहे: १. ब्रह्म सत्य आहे २. जग मिथ्या आहे आणि ३. जगच ब्रह्म आहे. दुसरे विधान करून आचार्य थांबले नाहीत. तिसरे विधान अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्या विधानाच्या संदर्भात बाकी दोन्ही विधानांचा खरा भावार्थ लक्षात येतो. आत्मस्वरूपात अंतर्भाव असलेला देखावा असा बोध झाला तर जग सत्यस्वरूप/ ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूपापेक्षा पृथकत्वाने नांदणारे (नानाविध वस्तुंनी बनलेले, कार्यकारण भाव असलेले) जग असा बोध झाला तर तेच जग मिथ्या/ मायास्वरूप आहे. अर्थातच द्रष्ट्याच्या प्रचितीनुसार अन्वयार्थ बदलला तरी तत्वतः माया आणि ब्रह्म यात अभेदच आहे!</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; overflow-wrap: break-word;">
*** ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रहैव नापरः (निरालम्बोपनिषद – २८)</div>
</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-91915634856379023452020-06-25T21:26:00.003-07:002021-05-11T07:17:03.407-07:00भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १६ - साधकांचे भावविश्व आणि त्यांच्या समस्या<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १६ - साधकांचे भावविश्व आणि त्यांच्या समस्या<br />
<br />
या प्रकरणात अध्यामिक साधकांचे भावविश्व तसेच त्यांच्या समस्यांविषयीचे भगवान श्री रमण महर्षींचे मार्गदर्शन आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.<br />
<br />
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:<br />
<br />
शारिरीक वेदना, सततची अस्वस्थता, वैचारिक गोंधळ, भाव भावनांचे सतत दोलायमान करणारे हिंदोळे आणि मरूस्थळासारखी अधूनमधून झलक दाखवणारी सुखद शांतता या सगळ्या गोष्टींचा अध्यात्मिक साधनेचे वांछित/ अवांछित परिणाम या स्वरूपात साधकांना नेहेमी प्रत्यय येतो. इथे उल्लेख केलेले अनुभव 'प्रचिती' या विभागातल्या मागील दोन प्रकरणांमधे उल्लेख केलेल्या अनुभवांइतके नाट्यमय स्वरूपाचे नसले, तरी साधकविश्वात या अनुभूतींबद्दल कमालीचे कुतुहल असल्याचे दिसून येते. एक तर आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरचे मैलाचे दगड किंवा त्या मार्गापासून पथभ्रष्ट करणारे चकवे असा त्यांचा अन्वयार्थ लावला जातो. त्या नुसार सकारात्मक अनुभव क्षणिक न ठरता ते स्थिर व्हावेत किंवा अधिकाधिक कालावधी करता अनुभवता यावेत, तसेच नकारात्मक अनुभवांचा अडसर दूर करता यावा या हेतूने अध्यात्मिक साधक जिवाचे रान करताना दिसतात.<br />
<br />
श्री रमण महर्षींचा कल 'अध्यात्मिक अनुभव' या प्रकाराला फारसे महत्व न देण्याकडे होता. अनुभूतींचे विश्लेषण करण्यापेक्षा तसेच अनुभूतींमधे गुंतून पडण्यापेक्षा ज्याला अनुभूती येतात त्या 'मी' विषयीचे भान सजगपणे आणि सातत्याने जागृत ठेवणे अधिक महत्वाचे आहे या गोष्टीवर महर्षी सतत भर देत असत. क्वचित प्रसंगी आपल्या उपदेशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आत्मविचाराला तात्पुरती बगल देत एखाद्या साधकाला विशिष्ट अनुभूती येण्यामागच्या मूळ कारणाविषयी महर्षींनी सविस्तर उहापोह केल्याची मोजकीच का असेना उदाहरणे आहेत. त्या जोडीलाच क्वचित प्रसंगी महर्षींनी आत्मलाभ व्हावा या दृष्टीने साधकांना आलेल्या अनुभूतींचे उपकारक किंवा अपायकारक असे वर्गीकरण करत तदनुषंगिक मार्गदर्शन केल्याची देखील काही उदाहरणे आहेत. साक्षेपाने धांडोळा घेतल्यावर मात्र अध्यात्मिक अनुभूतींमधे स्वारस्य घेण्यापासून महर्षी आपल्या भक्तांना सातत्याने परावृत्त करत असत असेच दिसून येते.<br />
<br />
अध्यात्मिक अनुभूतींविषयी चर्वितचर्वण करण्याबाबत कमालीचे अनुत्सुक असलेले महर्षी एखाद्या निष्ठावंत अध्यात्मिक साधकाने ध्यानधारणा करताना व्यत्यय आणत असलेल्या वास्तवदर्शी समस्येशी निगडीत प्रश्न विचारला असता त्याला तत्परतेने मार्गदर्शन करत असत. साधकांनी मांडलेल्या समस्या, त्यांच्या तक्रारी, त्यांच्या व्यथा महर्षी अतिशय संयत वृत्तीने, सहानुभूतीपूर्वक तसेच अगदी जिवाचे कान करून समजावून घेत असत. त्यांच्या समस्यांचे समाधान होईल या दृष्टीने अत्यंत विधायक स्वरूपातली उत्तरे महर्षींकडून मिळत असत. पुढ्यात उभ्या असलेल्या साधकाची/ साधिकेची परिपक्वता लक्षात घेत जर संयुक्तिक वाटले तरच आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता कुठलीच समस्या अस्तित्वात असू शकत नाही ही बाब त्याच्या/ तिच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न महर्षी करत असत.<br />
<br />
प्रश्नः ध्यान करत असताना काही वेळा मला एका विशिष्ट प्रकारच्या आनंदाची अनुभूती येते. अशा वेळी मी स्वता:ला "हा आनंद कोण अनुभवतो आहे" असा प्रश्न विचारायला हवा का?<br />
रमण महर्षी: तुमचे मन स्वरूपात पूर्णपणे लीन झालेले असेल, तुम्ही अनुभवता तो आनंद जर खरोखरचा आत्मानुभूतीचा आनंद असेल, तर तुम्हाला अशी शंका येण्याची शक्यताच उरणार नाही. हा प्रश्नच स्पष्ट करतो की तुम्ही अजून आत्मस्थिती प्राप्त केलेली नाही. सगळ्या शंका उपस्थित करणार्याचे 'मी' चे मूळ स्वरूप किंवा त्याचे उगमस्थान गवसले तरच सगळ्या शंकाकुशंकांचा अंत होतो. एक एक शंका दूर करत बसणे फारसे हितावह नसते. एका शंकेचे निरसन केले तर तिच्या उत्तरातूनच दुसरी शंका निर्माण होते, आणि मारूतीच्या शेपटाप्रमाणे ही मालिका अंतहीन होत जाते. मात्र शंकाकुल असलेल्या व्यक्तीने आपल्या मूळ स्वरूपाचा शोध आरंभला तर शंका कुशंकांच्या कचाट्यात सापडलेला 'मी' वास्तविक पाहता अस्तित्वातच नाही हे तिच्या लक्षात येते. स्वरूपबोध झाला की सगळ्या शंका कुशंकांचा आपोआप अंत होतो.<br />
<br />
प्रश्नः ध्यानस्थ असताना कधीकधी आनंदाची उत्कट प्रचिती आल्याने डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याची जाणीव मला होते. इतर वेळी मात्र मला अशी अनुभूती येत नाही. या मागे काय कारण आहे?<br />
रमण महर्षी: सच्चिदानंद स्वरूप ही एक निरंतर अस्तित्वात असलेली गोष्ट असल्याने स्वरूपानंदाची येरझार होणे संभवत नाही. ज्या गोष्टींची येरझार झाल्याचे अनुभवता येते त्या मनोनिर्मीत असल्याने तुम्ही तिकडे फारसे लक्ष न पुरवलेलेच बरे.<br />
<br />
प्रश्नः ध्यानातल्या आनंदाने देहात विलक्षण चैतन्याचा संचार होतो, मात्र ती अनुभूती ओसरल्यावर मला खिन्न, निरूत्साही आणि हताश झाल्यासारखे वाटते. असे का होते?<br />
रमण महर्षी: आनंदाची अनुभूती येत असताना तसेच ती ओसरल्यानंतर परतून मूळ स्थितीत आल्यावर - या दोन्ही स्थितीत त्या अनुभवण्यासाठी तुम्ही सदोदित उपस्थित असता हे तुम्हाला मान्य आहे तर. सगळ्या अनुभूती अनुभवताना तुम्ही आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेणे एकीकडे सुरूच ठेवा. तुम्हाला स्वरूपाचा यथोचित बोध झाला, की मग या तथाकथित अनुभूती तुमच्या खिजगणतीतही नसतील अशी मला खात्री आहे.<br />
<br />
प्रश्नः ध्यान करत असताना अवांतर विचार आणि वासनांकडे धाव घेण्याच्या मनाच्या ओढाळ प्रवृत्तीवर मात करण्यासाठी मी काय करायला हवे? विचारांवर ताबा मिळवण्यासाठी मला माझ्या जीवनाचे नियमन कशा प्रकारे करता येईल?<br />
रमण महर्षी: तुमचे मन जसजसे स्वरूपानुसंधानात स्थिर होत जाईल, तसतसे इतर विचार आपोआपच बाजूला पडत जातील. मन दुसरे तिसरे काहीही नसून नानाविध विचारांचे ते एक गाठोडे आहे. विचारांच्या या वटवृक्षाचे मूळ 'मी आहे' हा विचारच आहे. 'मी' च्या मूळ स्वरूपाकडे तुमची दृष्टी वळेल आणि त्याचे उगमस्थान तुम्हाला गवसेल तेव्हा सगळे विचार स्वरूपात विलीन होऊन जातील.<br />
<br />
नियमीपणे ठरलेल्या वेळी जागे होणे, स्नान संध्या करणे, मंत्रपठण किंवा जपजाप्य करणे तसेच चित्तशुद्धीसाठी अन्य कर्मकांडे करणे या गोष्टी उपयुक्त आहेत यात शंकाच नाही. मात्र उपरोक्त सगळ्या गोष्टी आत्मविचाराकडे ज्यांचा कल नाही किंवा आत्मविचार करण्याचे सामर्थ्य ज्यांच्या ठायी नाही अशा साधकांसाठीच राखून ठेवलेल्या आहेत. आत्मविचार करणे ज्यांना शक्य आहे अशा साधकांसाठी यम नियम, शिस्तबद्धता, कर्मकांडे आणि तत्सम गोष्टींची मुळीच गरज नाही. <br />
</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-34274917251815301662020-06-24T01:55:00.002-07:002021-05-11T07:16:58.783-07:00भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण 15 - दृष्टांत आणि सिद्धी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
या प्रकरणात दृष्टांत आणि सिद्धींविषयक भगवान रमण महर्षींचा अभिप्राय आपण जाणून घेणार आहोत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
ध्यानधारणेमुळे होणारे अवांछित परिणाम काही वेळा साधकांना विस्मयचकित करतात. ध्यानावस्थेत असताना अकस्मात देव देवतांचे दर्शन झाल्याची, अद्भुत सुगंध दरवळल्याची तसेच क्वचित प्रसंगी अतिंद्रिय सिद्धी (उदा. सुदूर असलेल्या गोष्टींचे दर्शन होणे, इतर व्यक्तींच्या मनातले विचार ओळखता येणे, हवी ती वस्तू प्राप्त होणे इ. ) प्राप्त झाल्याची नोंद कित्येक साधकांनी करून ठेवलेली आहे. या दोन्ही गोष्टी प्रयत्नाने (हेतुपुरस्सर) साध्य करता येत असल्याचा दावा देखील काही योग साधकांनी केलेला दिसतो. विशिष्ट पद्धतीच्या योगिक प्रक्रियांनी सिद्धी प्राप्त करता येतात असे उल्लेख काही प्राचीन ग्रंथांमधे केलेले दिसतात. योगशास्त्रविषयक ग्रंथसंपदेत महर्षी पतंजलिंच्या 'योगसूत्र' या ग्रंथाला महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. योगसूंत्रांमधे अष्टसिद्धी प्राप्त होण्यात सहाय्यभूत ठरतील अशा योगिक प्रक्रियांचे सविस्तर वर्णन केलेले आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
हेतुपुरस्सर दृष्टांत घडावेत किंवा सिद्धी प्राप्त व्हाव्यात या दिशेने प्रयत्न करण्यापासून श्री. रमण महर्षी त्यांच्या भक्तांना सातत्याने परावृत्त करत असत. दृष्टांत आणि सिद्धी या दोन्ही गोष्टी मनोनिर्मित असल्याने त्यांचा आत्मलाभ होण्याच्या दृष्टीने उपाय होण्यापेक्षा अपाय होण्याचीच शक्यता कित्येक पटीने जास्त आहे ही बाब महर्षी सातत्याने निदर्शनास आणून देत असत. भक्तांना दृष्टांत झाल्याची उस्फूर्त आणि अहेतुकपणे प्रचिती आली तर महर्षींनी ती अध्यात्मातल्या प्रगतीचा एक संकेत असल्याचे अपवादात्मक प्रसंगी मान्य केल्याची मोजकीच उदाहरणे आहेत. अशा प्रसंगी दृष्टांत झालेल्या भक्ताला तो मानसिक पातळीवरचा क्षणभंगुर अनुभव आहे; तसेच असे अनुभव आत्मसाक्षात्काराच्या तुलनेत खालच्या प्रतलावरचे असल्याने दुर्लक्ष करण्याजोगे असल्याची जाणीव महर्षी न चुकता करून देत असत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
अवचितपणे सिद्धी प्राप्त झाली असता तिची भुरळ पडल्याने पथभ्रष्ट होण्याच्या संभाव्य धोक्याची रूपरेषा महर्षी समजावून सांगत असत. सिद्धी प्राप्त केल्याने अहंतेपासून मुक्ती न मिळता उलट अहंकार बळावण्याचीच शक्यता जास्त आहे असे महर्षी स्पष्टपणे बोलून दाखवत असत. सिद्धी प्राप्त करण्याची हाव आणि आत्मसाक्षात्कार या दोन गोष्टींमध्ये अंतर्विरोध असल्याने त्या एकत्र राहूच शकत नाहीत; त्या पैकी एका गोष्टीचीच निवड करावी लागते असे महर्षींचे ठाम मत होते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
आत्मस्वरूप प्रत्येक व्यक्तीच्या अत्यंत निकट आहे. ते चिरंतन आहे. त्या उलट सिद्धी मात्र सर्वार्थाने अनात्मस्वरूप, बाह्य जगात मिरवण्याजोग्या आणि अशाश्वत असे फसवे मृगजळ आहे. सच्चिदानंद स्वरूप ही सहजस्थिती आहे. सिद्धी प्रयत्नपूर्वक मिळवाव्या लागतात. अतिंद्रिय किंवा अतिमानस शक्तीं मनाला हव्याहव्याश्या वाटतात. त्या वश करण्यासाठी मनाला सतत सतर्क ठेवावे लागते. त्या उलट मनोनाश झाल्यावर स्वरूप आपोआप प्रकट होते. स्वरूपाचे सजग भान टिकवण्यासाठी प्रयत्नांची गरज नसते. सिद्धी अहंकाराच्या आश्रयानेच प्रकट केल्या जातात. स्वरूपबोध हा अहंकाराच्या पल्याडचा प्रांत असल्याने अहंतेचा नाश केल्यावरच त्याचा साक्षात्कार होतो असा उपदेश महर्षी सातत्याने देत असत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः महर्षी पतंजलिंनी उल्लेख केलेल्या सिद्धी खरोखर अस्तित्वात आहेत की ती निव्वळ त्यांच्या मनोविश्वातली स्वप्नसदृश गोष्ट आहे?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: महर्षि पतंजलिंनी स्वत:च स्पष्टपणे नमूद केलेले आहे की सगळ्या सिद्धी मनोनिर्मित आहेत. त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गातला अडसर आहेत. ब्रह्मस्वरूप झालेल्या किंवा स्वरूप साक्षात्कार झालेल्या साधकाच्या लेखी त्या कवडीमोलाच्याही नसतात.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः तथाकथित बुवा आणि बापूंच्या (अतिंद्रिय) शक्तींविषयी आपले काय मत आहे?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: या शक्ती उच्च पातळीवरच्या असतील किंवा निकृष्ट पातळीवरच्या असतील, त्या मनोनिर्मित असतील अथवा अतिमानस स्थितीत अनुभवलेल्या असतील; ज्या व्यक्तीकडे अतिंद्रिय शक्ती आहे असे मानले जाते त्या व्यक्तीच्या संदर्भातच (पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ स्वरूपातच) त्यांचे अस्तित्व असते. (पारमार्थिक लाभ करून घ्यायचा असेल तर) अशा व्यक्तीचे मूळ स्वरूप काय आहे याचा तिला शोध घ्यावाच लागेल.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः अध्यात्मिक मार्गावर वाटचाल करत असताना मैलाचे दगड या स्वरूपात सिद्धी प्राप्त होत जातात, की सिद्धी आणि मुक्ती परस्परविरोधी गोष्टी आहेत?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: आत्मसाक्षात्कार होणे ही सर्वोच्च सिद्धी आहे. तुम्हाला क्षणभर जरी सत्यस्वरूपाचा साक्षात्कार झाला, तर तुमचे (सिद्धींच्या मोहात पाडून) अज्ञानाच्या खाईत लोटत असलेल्या मार्गांविषयीचे आकर्षंण कायमचे संपुष्टात येईल.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः मग सिद्धींचा उपयोग काय आहे?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: दोन प्रकारच्या सिद्धी असतात, त्या पैकी एक प्रकार आत्मसाक्षात्कारात विघ्न निर्माण करणारा आहे. मंत्रजप केल्याने, रहस्यमय गुणधर्म असलेल्या काही रसायनांचे सेवन केल्याने, कठोर तपश्चर्या केल्याने तसेच ठराविक प्रकारची समाधी लावणे साध्य केल्याने सिद्धी प्राप्त होतात अशी एक धारणा रूढ झालेली आहे. उपरोक्त पद्धतीने शक्ती प्राप्त करणे हे आत्मसाक्षात्कारासाठी उपयुक्त ठरणारे साधन नाही. उलटपक्षी अशा पद्धतीने सिद्धी प्राप्त झाल्या तरी तुम्ही अज्ञानाच्या गर्तेतच अधिक खोलवर रूतत जाल!</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः मग या पेक्षा वेगळ्या प्रकारच्या (उपकारक) सिद्धी कशा असतात?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: तुम्हाला स्वरूप साक्षात्कार झाला तर तुमच्या ठायी निसर्गत:च असलेले आंतरिक सामर्थ्य आणि प्रज्ञान यांचे सहजस्फूर्त प्राकट्य होत जाणे असे या सिद्धींचे स्वरूप असते. स्वरूपसिद्धी प्राप्त होताना साधकावस्थेत घडलेल्या अत्यंत सहज, सुलभ आणि सात्विक तपश्चर्येची परिणती निसर्गतःच काही उपकारक सिद्धींमधे होते. या सिद्धी ईश्वरी कृपेच्या स्वरूपात आपल्या आपण (साधकाने जाणीवपूर्वक प्रयत्न न करताच) साधकाला मिळून जातात. प्रत्येक साधकाच्या प्रारब्धानुसार त्यांचे स्वरूप निरनिराळे असते. असे असूनही सिद्धी वश झाल्याने म्हणा किंवा त्या प्राप्त न झाल्याने म्हणा; परम शांतीत अचलपणे स्थित झालेला ज्ञानी तिळमात्रही विचलीत होत नाही. ज्ञान्याला स्वरूप साक्षात्कार झाल्यामुळे पक्के माहित असते की आत्मसिद्धी ही एकमेव शाश्वत सिद्धी आहे. आत्मसिद्धीच्या जोडीला विनासायास मिळत असलेल्या सिद्धी कुणालाही प्रयत्नपूर्वक मिळवता येत नाहीत. तुम्ही साक्षात्कारी स्थितीत असाल तेव्हाच अशा सिद्धींची साक्षात प्रचिती येते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
पुरवणी:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत बाराव्या अध्यायाच्या सुरूवातीला आत्मसिद्धी/ सोहंसिद्धीचे काव्यात्म पद्धतीने वर्णन केलेले आहे. इथे समाविष्ट केलेल्या निवडक ओव्यांमधला 'योगसुखाचे सोहळे' ते 'समाधिबोधे निजविसी, बुझाऊनि' हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. आई जगदंबेने बाळाला मांडीवर घेत त्याचे सोहंसिद्धीचे लळे पुरवावे, 'आधारशक्तीच्या' (कुंडलिनी) बळावर त्याचे संगोपन करावे, अनाहत नादाचा खुळखुळा वाजवावा, चिदाकाशाच्या पाळण्यात त्याला झुलवावे, सत्रावीचे स्तन्य द्यावे, प्रत्यकज्योतीने त्याला ओवाळावे, हातात मन पवनाची (प्राणशक्तीची) खेळणी द्यावी, आत्मसुखाची बाळलेणी लेववावी आणि समाधीचा बोध देत त्याला निजवावे अशा प्रकारचे हे एक नितांत सुंदर रूपक आहे. माऊलींनी त्या आधी गुरूंच्या कृपादृष्टीने वैषयिक वासना निर्विष होतात, त्यांची डंख करण्याची क्षमता संपते; तसेच प्रसादरसाचे कल्लोळ उठल्याने साधकाच्या जीवनातून शोकसंतप्त भावना कशी हद्दपार होते याचे सुंदर वर्णन केलेले आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
*** सत्रावीचे स्तन्य - पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, अंतःकरण पंचक आणि प्राण या सोळा कला आहेत. स्वरूपानंद किंवा अमृतकला ही सत्रावी कला मानली जाते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; overflow-wrap: break-word;">
जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे ।<br style="box-sizing: border-box;" />अनवरत आनंदे । वर्षतिये ॥ १ ॥<br style="box-sizing: border-box;" />विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी ।<br style="box-sizing: border-box;" />ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ॥ २ ॥<br style="box-sizing: border-box;" />तरी कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी ।<br style="box-sizing: border-box;" />जरी प्रसादरसकल्लोळीं । पुरें येसि तूं ॥ ३ ॥<br style="box-sizing: border-box;" />योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे ।<br style="box-sizing: border-box;" />सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ॥ ४ ॥<br style="box-sizing: border-box;" />आधारशक्तीचिया अंकीं । वाढविसी कौतुकीं ।<br style="box-sizing: border-box;" />हृदयाकाशपल्लकीं । परीये देसी निजे ॥ ५ ॥<br style="box-sizing: border-box;" />प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं ।<br style="box-sizing: border-box;" />आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥ ६ ॥<br style="box-sizing: border-box;" />सतरावियेचें स्तन्य देसी । अनुहताचा हल्लरू गासी ।<br style="box-sizing: border-box;" />समाधिबोधें निजविसी । बुझाऊनि ॥ ७ ॥<br style="box-sizing: border-box;" />म्हणौनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझिया पाउलीं ।<br style="box-sizing: border-box;" />या कारणें मी साउली । न संडीं तुझी ॥ ८ ॥<br style="box-sizing: border-box;" />अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी ।<br style="box-sizing: border-box;" />तो सकलविद्यांचिये सृष्टीं । धात्रा होय ॥ ९ ॥</div>
</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-80637392819855682292020-06-22T04:05:00.000-07:002021-05-11T07:16:55.235-07:00विभाग ५ - प्रचिती - प्रकरण १४ - समाधी - भाग १<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
या प्रकरणापासून 'प्रचिती' या पाचव्या विभागाची सुरूवात होते. अध्यात्म हा वास्तविक पाहता प्रचितीचाच प्रांत आहे. या विभागातल्या पहिल्या प्रकरणात समाधीविषयीचा रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
ध्यानसाधनेच्या प्रगत टप्प्यावर आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचे सजग भान येणे किंवा ध्यान साधत असताना अत्यंत उत्कटपणे ध्येय वस्तूत (उदा. नाम, प्रतिमा, मूर्ती इ.) अखंडपणे लीन होणे ही अवस्था साधकांना अनुभवता येते. पौर्वात्य जगतातल्या अध्यात्मिक साहित्यात ही प्रचिती दर्शवण्यासाठी 'समाधी' हा शब्द प्रचुरतेने वापरला जातो . नानाविध अध्यात्मिक संप्रदायांमधे तसेच विविध धर्मांमधे समाधीच्या वेगवेगळ्या अवस्था आणि नानाविध प्रकारांचे सविस्तर वर्णन केलेले आढळते. प्रत्येक संप्रदाय आपापली आगळीवेगळी परिभाषा वापरत असल्याचे तसेच आपापल्या पद्धतीने समाधीचे वर्गीकरण करत असल्याचे तसेच समाधीच्या विविध प्रकारांची प्रतवारी ठरवत असल्याचेही स्पष्टपणे दिसून येते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
श्री. रमण महर्षी समाधीचे ढोबळमानाने तीन प्रकारांमधे वर्गीकरण करत असतः</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
१. सहज निर्विकल्प समाधी: ज्याने/ जिने (अध्यात्मिक साधना सफल झाल्यावर) अंततः अहंतेला कायमचेच दूर सारले आहे, अशा ज्ञानसिद्ध व्यक्तीची ही निरंतर टिकणारी स्थिती असते. या समाधीचे वर्णन करत असताना वापरलेले सहज (स्वाभाविक) आणि निर्विकल्प (अचल, कुठलाही फरक न पडणारी) हे दोन्ही शब्द अत्यंत महत्वाचे आहेत. सहजस्थितीत असलेला ज्ञानी सामान्यजनांप्रमाणेच लौकिक जगतात सहजतेने कार्यरत राहू शकतो. स्वरूपबोध हीच सहजस्थिती झालेल्या ज्ञान्याला तो स्वतः इतरेजनांपेक्षा आगळा वेगळा आहे असे वाटत नाही. ज्ञान्याला तो स्वतः आणि बाह्य जगत हे विभक्त स्वरूपात न दिसता समग्र अस्तित्वाची एकरस आणि अखंड अनूभूति विनासायास येत राहते. अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट अविभाज्य असलेल्या स्वरूपाचेच प्राकट्य आहे अशी अनूभूती ज्ञान्याला मिळते (संत ज्ञानेश्वरांनी याच अनुभूतीच्या सैद्धांतिक विवेचनाच्या जोडीलाच 'चिद्विलास' - एकाच चैतन्याचा विलास या स्वरूपात नितांत सुंदर असे काव्यात्म वर्णन देखील केलेले आहे).</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
२. केवल निर्विकल्प समाधी: ही आत्मसाक्षात्कारापूर्वीची पायरी आहे. या स्थितीत असताना प्रयत्न न करताच स्वसंवेज्ञता अनुभवता येते, मात्र ती क्षणिक स्वरूपाची असते. या स्थितीत अहंकाराचा संपूर्ण नाश झालेला नसतो. केवल निर्विकल्प समाधीत साधकाचे देहभान हरपते. स्वरूपाची किंवा स्वसंवेज्ञतेची तात्पुरती झलक मिळत असली, तरी केवल निर्विकल्प समाधी स्थितीत कर्मेंद्रियांचा तसेच ज्ञानेंद्रियांचा योग्य तो उपयोग करणे किंवा व्यावहारिक जगात कार्यरत असणे साधकाला शक्य होत नाही.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
३. सविकल्प समाधी: सविकल्प समाधी स्थितीत अथक प्रयत्न करून आत्मभान टिकवावे लागते. ती किती काळ टिकेल हे पूर्णपणे समाधी अवस्था टिकवण्यासाठी साधक करत असलेल्या प्रयत्नांवर अवलंबून असते. स्वरूपावरचे ध्यान डळमळीत झाले, की स्वसंवेज्ञतेची प्रचिती विरत जाते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः सहज समाधीचा अनुभव साधकाला कधी प्राप्त करता येतो?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: अगदी सुरूवातीपासूनच. (याच नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की) केवल निर्विकल्प समाधी वर्षानुवर्षे अनुभवत आलेल्या साधकाने जर वासनांना मुळापासून नष्ट केलेले नसेल तर त्याला मुक्ती मिळत नाही.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः सहजावस्था प्राप्त होण्याआधी निर्विकल्प समाधीचा अनुभव येणे अनिवार्य आहे का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: कुठल्याही प्रकारच्या समाधीमध्ये (मग ती निर्विकल्प असो अथवा सविकल्प) कायमचे स्थित होणे हीच सहजस्थिती असते. देहभान असे आपण कशाला म्हणतो? जड देहात चैतन्याचा आविर्भाव झाला की देहभान येते. अस्तित्वात आपल्याच ठायी परिपूर्णतेने नांदणारे असे एक विशुद्ध चैतन्य आहे. देह आणि देहभान या दोन्हींचा या विशुद्ध चैतन्यावर कुठलाही प्रभाव पडत नाही. देहभान असेल किंवा नसेल तरी ते निरंतर जसे आहे तसेच राहते. साधकाने जर या विशुद्ध चैतन्यातच स्वत:ची मांड पक्की केलेली असेल, तर मग देहभान हरपले काय किंवा जागृत राहिले काय, त्याने काय फरक पडणार आहे? समाधी अवस्थेची अत्यंत उत्कट प्रचिती येणे हा देहभान पूर्णपणे हरपण्याचा एक फायदा आहे, मात्र सर्वोच्च असलेली ज्ञानसिद्धी प्राप्त झाल्यानंतर देहभान असल्याने किंवा नसल्याने ज्ञानसिद्ध व्यक्तीला त्याने काहीच फरक पडत नाही.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः समाधी आणि (जागृती, निद्रा आणि सुषुप्तीपेक्षा वेगळी असलेली) चौथी अवस्था किंवा तुर्यावस्था एकच आहेत का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: समाधी, तुर्या किंवा निर्विकल्प या सगळ्यांचा भावार्थ एकच आहे, तो म्हणजे आत्मस्वरूपाचे सतत भान असणे. जागृती, निद्रा आणि सुषुप्तीपेक्षा वेगळी असलेली चौथी अवस्था किंवा विशुद्ध चैतन्यमय अवस्था असा तुर्यावस्था या शब्दाचा अर्थ होतो. ही चौथी अवस्था चिरंतन असते आणि बाकी तीन अवस्था तिच्यातच ये जा करत राहतात. मन त्याच्या उगमस्थानामध्ये हृदयकेंद्रात विलीन होत असल्याची तसेच ते निश्चल होत असल्याची सजग जाणीव तुर्यावस्थेत असते. असे असले तरी माफक प्रमाणात का होईना विचारांचे अतिक्रमण तुर्यावस्थेत होत राहते. तुर्यावस्थेत इंद्रियांचे कार्य देखील काही अंशी का असेना सुरूच राहते . निर्विकल्प स्थितीत इंद्रिये पूर्णपणे शांतवल्याने तसेच विचारांचे काहूर पूर्णपणे थांबल्याने तिला एक अत्यंत उत्कट आणि आल्हासदायक स्थिती असे म्हणावे लागेल. सविकल्प समाधीतही तुर्यावस्था प्राप्त करता येते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः समाधी अवस्था उल्हसित करणारी असते की ती हर्षोन्मादाचा अनुभव देते?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: प्रत्यक्ष समाधी अवस्थेत निव्वळ असीम शांतताच नांदत असते. समाधीतून बाहेर येत असताना मन पुनरूज्जीवीत होते, त्या वेळी समाधीतल्या शांततेच्या आठवणीने हर्षोन्माद अनुभवता येतो. भक्तीमार्गात हर्षोन्मादाचा अनुभव आधी येतो. आनंदाश्रू येणे, तनु रोमांचीत होणे, आवाज सद्गदित होणे इ. अष्टसात्विक भावांच्या स्वरूपात हर्षोन्मादाची भावस्थिती प्रकट होते. अंततः अहंता पूर्णपणे लयाला गेली आणि सहजस्थितीचा लाभ झाला की अष्टसात्विक भाव आणि हर्षोन्माद आपोआप नाहीसे होतात.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः (ध्यानाच्या प्रगत अवस्थेत) मन जेव्हा स्वरूपात विलीन व्हायला लागते तेव्हा कित्येक वेळा साधकांना भयगंड ग्रासून टाकतो असे दिसते.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: समाधी अवस्थेत प्रवेश करताना अल्पशा प्रमाणात अहंतेची जाणीव मागे शिल्लक राहिल्याने (अहंता स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी निकराचे प्रयत्न करत असल्याने) साधकांना भयग्रस्ततेचा तसेच शरीराचा थरकाप होत असल्याचा अनुभव येतो. जेव्हा कणभरही अवशेष मागे न ठेवता अहंतेचा पूर्णपणे नाश होतो तेव्हा साधक विशुद्ध चैतन्याने व्यापलेल्या विस्तीर्ण अवकाशात स्थिर होतो. असे स्थैर्य लाभले की भयग्रस्तता संपून फक्त आनंदच मागे उरतो. शरीराचा थरकाप होणे देखील थांबते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः समाधी स्थितीचा अनुभव घेतल्यानंतर साधकांना सिद्धी देखील प्राप्त होतात का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: सिद्धींचे प्रदर्शन मांडायचे असेल तर ते ज्यांच्यासमोर मांडायचे अशा इतरेजनांची (अर्थातच द्वैतभावाची) गरज भासणे अनिवार्य आहे . सिद्धींचे प्रदर्शन करत असलेल्या व्यक्तीकडे (अद्वैत/ कैवल्य) ज्ञानाचा अभाव असतो हे उघड आहे. त्यामुळे कवडीमोल सिद्धींबाबत विचार न केलेलाच बरा. ज्ञानप्राप्ती हेच साधकाचे अंतिम ध्येय असले पाहिजे, तसेच कैवल्य ज्ञान प्राप्त करण्याची एकमेव अभिप्सा त्याच्या ठायी असली पाहिजे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः माझे मन त्या (समाधी/ निर्विचार) स्थितीत क्षणभरही बुडून जात नाही.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: त्या साठी "मी सच्चिदानंद स्वरूप आहे, माझे खरे अस्तित्व मन आणि इंद्रियगोचर घडामोडींपलीकडे आहे" अशी दृढ श्रद्धा असणे अनिवार्य आहे (श्रद्धावान लभते ज्ञानम).</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः (मी सश्रद्ध आहे) असे असले तरी स्वरूपात लीन होण्याचे सगळे प्रयत्न उधळून लावणारा मन हा एक कधीच ताब्यात न येणारा चौखूर उधळलेला जणू उन्मत्त अश्वच आहे असा अनुभव मला येतो.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: मन सक्रिय राहिल्याने काय फरक पडतो? त्याचा सारा खेळ स्वरूपाच्या आधारानेच तर चालतो. मनाचे सारे खेळ एकीकडे सुरू असतानाच तुम्ही आपले लक्ष सजगपणे स्वरूपावर स्थिर ठेवा.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
पुरवणी:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
ध्यानधारणेच्या प्रगत टप्प्यावर साधकांना येत असलेल्या अनुभूतीचे पावसच्या प. पू. स्वामी स्वरूपानंदांनी असे वर्णन केले आहे:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
इंद्रिये प्रबळ, सर्वथा ती जाण, मनाच्या आधीन, होती मग<br style="box-sizing: border-box;" />प्राणामाजी मन, एकवटे पूर्ण, मिळो लागे प्राण, शून्यालागी<br style="box-sizing: border-box;" />ऐसा योगाभ्यास, स्वभावे चि होय, नेणो कैसा काय, धनंजया<br style="box-sizing: border-box;" />आणि तयाचिया, मनो-मंदिरात, येवोनि रहात, समाधी ती</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
सहजस्थिती प्राप्त व्हावी किंवा आत्मलाभ व्हावा या साठी लागणारी अर्हता स्वामीजींच्या शब्दात अशी आहे:<br style="box-sizing: border-box;" />यापरी जो काम-, क्रोध लोभातून, मोकळा होवोन, राहे स्वस्थ<br style="box-sizing: border-box;" />तयासि च लाभे, एवढे गहन, आत्मप्राप्ति धन, धनंजया</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; overflow-wrap: break-word;">
(संदर्भः स्वामी स्वरूपानंद कृत अभंग ज्ञानेश्वरी नित्यपाठ स्तोत्र)</div>
</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-23496396066570622182020-05-17T05:30:00.002-07:002020-06-02T23:17:32.598-07:00महर्षी गीता - भगवान रमण महर्षी कृत गीता-सार <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
एकदा एका भक्ताने भगवद्गीतेचे सार सांगणारा एकच श्लोक कोणता असे विचारले असता भगवान रमण महर्षींनी पुढील श्लोक सांगीतला होता:<br />
<br />
जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत<br />
नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात<br />
(श्री स्वामी स्वरूपानंद कृत श्रीमत भावार्थ गीता १०.२०)<br />
<br />
पुढे महर्षींनी गीता-सार सांगण्यासाठी भगवद्गीतेतल्या निवडक ४२ श्लोकांची सुसंगत आणि क्रमवार मांडणीदेखील केली (इथे हा श्लोक चौथ्या क्रमांकावर येतो). परमहंस स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीमत भावार्थ गीतेतील श्लोक त्याच क्रमाने घेतले, तर महर्षींनी सुचवलेले गीता-सार असे होईलः<br />
<br />
(1)<br />
संजय सांगे धृतराष्ट्राते पार्थ तसा उद्वेगे<br />
मान खालती घालुनी रथी बसला होता मागे<br />
भरूनी आले नयन त्यातुनी घळघळ वाहे नीर<br />
कारूण्ये अति दीन जाहला म्हणुनी सुटला धीर<br />
(भावार्थ गीता २.१)<br />
<br />
(2)<br />
वदे श्री-पति, "क्षेत्र बोलती पार्था या देहाते<br />
ह्याते जाणे तया बोलती 'क्षेत्रज्ञ' असे ज्ञाते"<br />
(भावार्थ गीता १३.१)<br />
<br />
(3)<br />
सर्व क्षेत्री मी चि किरीटी, क्षेत्रज्ञ वसे जाण<br />
क्षेत्र-क्षेत्रज्ञासी जाणणे ते चि मानितो ज्ञान<br />
(भावार्थ गीता १३.२)<br />
<br />
(4)<br />
जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत<br />
नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात<br />
(भावार्थ गीता १०.२०)<br />
<br />
(5)<br />
दिवस उगवला जसा मावळे अस्तापाठी उदय<br />
रिते चि भरते भरले सरते हा सृष्टीचा न्याय!<br />
उपजे ते ते विनाश पावे नाश पावले निपजे<br />
अटळ गोष्ट ही म्हणुनि अर्जुना, तुज हा शोक न साजे<br />
(भावार्थ गीता २.२७)<br />
<br />
(6)<br />
होउनि गेला होणार पुढे असा न ह्याते जाण<br />
जन्म न पावे न निमे अज हा शाश्वत नित्य पुराण<br />
जाण विनाशी देह जाय परि भंग नसे आत्म्याते<br />
शस्त्रे छाया तोडिली तरी काय रूते अंगाते?<br />
(भावार्थ गीता २.२०)<br />
<br />
(7)<br />
न तुटे न जळे न भिजे न सुके असे सर्व-गत नित्य<br />
तेवि स्थिर हा अचल सनातन हा अव्यक्त अचिंत्य<br />
(भावार्थ गीता २.२४)<br />
<br />
(8)<br />
ते अविनाशी जाण जे असे अखिल जगा व्यापोनी<br />
विनाश अव्यय तत्वाचा त्या करू शकेना कोणी<br />
(भावार्थ गीता २.१७)<br />
<br />
(9)<br />
जे नाही ते असेल कुठुनी अभाव अस्तित्वाचा?<br />
तत्वज्ञांनी निर्णय केला ह्या दोहींचा साचा<br />
जसे वेगळे करी मिसळले राजहंस पय-पाणी<br />
तद्वत विश्वी गुप्त सार ते शोधी तत्वज्ञानी<br />
सुवर्ण आणिक हीण निवडिती बुद्धिमंत तावून<br />
उपाधीतुनी तेवि काढिती संत सार शोधून<br />
की पाखडुनी भूस टाकुनी केवळ दाणा घेती<br />
तैसे ज्ञानी माया त्यजुनी ब्रह्मपदी स्थिर होती<br />
(भावार्थ गीता २.१६)<br />
<br />
(10)<br />
सूक्ष्म म्हणूनि ते लिप्त न होते जसे सर्वगत गगन<br />
भरला देही सर्वत्र तसा अलिप्त आत्मा जाण<br />
(भावार्थ गीता १३.३२)<br />
<br />
(11)<br />
पद अविनाशी स्वयंप्रकाशी तेजोमय ते पूर्ण<br />
प्रकाशित तया करू न शकती सूर्य चंद्र वा अग्न<br />
पावता जिथे पुन्हा न परते स्वर्ग-नरक-संसारी<br />
जीव समरसे ते चि मम असे परं-धाम अवधारी<br />
(भावार्थ गीता १५.६)<br />
<br />
(12)<br />
विश्वी भरले विश्व जाहले जरी ते चि संपूर्ण<br />
तरी लोपता विश्व तत्वता ते न लोपते जाण!<br />
त्या अव्यक्ताक्षर तत्वाते 'परम गति' असे म्हणती<br />
पावता चि मत्परंधाम ते जन्म-मरण ना पुढति<br />
(भावार्थ गीता ८.२१)<br />
<br />
(13)<br />
सांडुनि जाती घन वर्षांती जसे स्वभावे गगन<br />
तेवि जयाते सोडुनि गेले मोह आणि अभिमान<br />
पदार्थमात्री अनासक्त जे अध्यात्मी तल्लीन<br />
नितांत निर्मळ बुद्धि जयांची नसे वासनाधीन<br />
सुख दु:खादि द्वंद्व-बंध ते आकळिती न जयांते<br />
सहजे ज्ञाते पावती चि ते अव्यय परम-पदाते<br />
(भावार्थ गीता १५.५)<br />
<br />
(14)<br />
विषय-विलासामाजी चि पिसा होउनि जो साचार<br />
शास्त्र-विधीते त्यजुनी येथे करितो स्वैराचार<br />
न च कल्पांती ती परम गती तया लाभते जाण<br />
सुख हि न च मिळे मग ते कुठले तया ब्रह्म-निर्वाण!<br />
(भावार्थ गीता १६.२३)<br />
<br />
(15)<br />
तरी अर्जुना, एक चि नाना नाशिवंत भूतांत<br />
सम अविनाशी ईश्वर पाहे तो ज्ञाता निभ्रांत<br />
(भावार्थ गीता १३.२७)<br />
<br />
(16)<br />
मिळे सागरा अखंड-धारा जशी जान्हवी जगती<br />
तसा भक्त तो मला भेटतो अनन्य-भावे अंती<br />
मिळता अनली इंधन जैसे अग्निरूप ते होते<br />
साक्षात्कारी तेवि संपते देव-भक्त हे नाते<br />
मजसी मिळता नुरे तत्वता 'मी-तो' ऐसे द्वैत<br />
म्हणुनि राहे मी चि होऊनी मज माजी चि निवांत!<br />
अनन्य-भक्ति करी भारता, तो चि तत्वता माते<br />
असा जाणतो आणि पाहतो समरस होतो तेथे<br />
(भावार्थ गीता ११.५४)<br />
<br />
(17)<br />
स्वभाव ज्याचा जसा तयाची श्रद्धा हि तशी मानी<br />
श्रद्धा धरितो तसा चि होतो श्रद्धा-मय हा प्राणी<br />
(भावार्थ गीता १७.३)<br />
<br />
(18)<br />
ब्रह्म-निष्ठ तो ज्ञान पावतो तत्पर संयम-शील<br />
परम शांति मग ती मिळवाया तया न लागे वेळ<br />
(भावार्थ गीता ४.३९)<br />
<br />
(19)<br />
सदा रंगले नित्य जे भले प्रेमे माझ्या ठायी<br />
ज्ञान-भक्ति-सुख देवोनि तया निज-धामाते नेई<br />
(भावार्थ गीता १०.१०)<br />
<br />
(20)<br />
जाण अर्जुना, करूनी करूणा स्वये प्रकटुनी हृदयी<br />
तया दावितो तेजस्वी तो ज्ञान-दीप लवलाही<br />
प्रकाश होता नुरे तत्वता भ्रांति-रूप अंधार<br />
मद्भक्ताला तदा संपला जन्म-मरण-संसार<br />
(भावार्थ गीता १०.११)<br />
<br />
(21)<br />
आत्म-ज्ञाने असे जयांचे हरपले अज्ञान<br />
तया प्रकटवी पर-तत्वाते रवि-सम ते चि ज्ञान<br />
जशी उजळता पूर्व दिशा ती दिशा उजळती दाही<br />
आत्मानुभवे तया स्वभावे विश्वी न दुजे काही<br />
जिथे पहावे तिथे दिसावे आत्म-रूप जगतात<br />
आत्मरूपता अशी प्रकटता रंगुनि जाती त्यात<br />
(भावार्थ गीता ५.१६)<br />
<br />
(22)<br />
थोर इंद्रिये त्याहुनी मन ते थोर त्याहुनी बुद्धी<br />
त्या बुद्धीहुनी परमात्म जो तो चि थोर निरूपाधि<br />
(भावार्थ गीता ३.४२)<br />
<br />
(23)<br />
त्या आत्म्याते जाणुनि राहे आत्म-बळे स्थिर तेथे<br />
आणि संहरी अजिंक्य ऐशा काम-रूप शत्रुते<br />
(भावार्थ गीता ३.४३)<br />
<br />
(24)<br />
प्रदीप्त अग्नि जसा जाळुनी टाकी काष्ठे पूर्ण<br />
ज्ञानाग्नि तसा भस्मसात करी सर्व हि कर्मे जाण<br />
(भावार्थ गीता ४.३७)<br />
<br />
(25)<br />
नसे अपेक्षा फली जयाची सकल हि कर्मे करिता<br />
'मी कर्ता, हे करीन' न शिवे संकल्प असा चित्ता<br />
ज्ञानाग्निने अशी जयाची कर्मे जळुनी जाती<br />
सुजाण नर ते त्या पुरूषाते 'पंडित' ऐसे म्हणती<br />
(भावार्थ गीता ४.१९)<br />
<br />
(26)<br />
आत्म-ज्ञानी निष्काम यती स्वाधीन अंतःकरण<br />
क्रोध-रहित जे सर्वत्र तया असे ब्रह्म-निर्वाण<br />
योगी-जन तो कस पावतो ह्या देही चि ब्रह्म<br />
ऐक भारता, तुज सांगतसे संक्षेपे ते वर्म<br />
(भावार्थ गीता ५.२६)<br />
<br />
(27)<br />
मग ह़ळूहळू उपरत व्हावे धैर्य-युक्त बुद्धीने<br />
आत्म-स्थित मन करूनी काही नच चिंतावे त्याने<br />
(भावार्थ गीता ६.२५)<br />
<br />
(28)<br />
ज्या ज्या विषयाकडे धावते मन चंचल अस्थिर ते<br />
तेथतेथुनी झणि आवरूनी स्व-वश करावे त्याते<br />
जरी स्वभावे स्थिर न च होई तरी सुखे सोडावे<br />
आणि पुनरपि तसे स्व-रूपी हळूचि परतू द्यावे<br />
सवय लागता अशी सहज ते आत्म-रूपी रंगेल<br />
आत्म-रूप ते होता स्थिरता कधी न मग भंगेल<br />
(भावार्थ गीता ६.२६)<br />
<br />
(29)<br />
जये साधिला मनोलय असा पवनद्वारा गगनी<br />
मोक्ष लक्षुनि तृष्णा-भीति-क्रोधरहित होवोनी<br />
मन-बुद्धीसह इंद्रिय-वृत्ती रिगता चि महा-शून्यी<br />
तो चि पावतो संयमी मुनी जीवन्मुक्ती निदानी!<br />
(भावार्थ गीता ५.२८)<br />
<br />
(30)<br />
आत्म्याठायी भूतमात्र ते सकळा भूती आत्मा<br />
सर्वत्र चि हे समत्व पाहे असे योग-युक्तात्मा<br />
(भावार्थ गीता ६.२९)<br />
<br />
(31)<br />
नित्य अंतरी चिंतन करूनी उपासिती जे भक्त<br />
अनन्य-भावे अखंड माते होउनिया संयुक्त<br />
निज-सायुज्या नेउनी तया अथवा भक्ति-प्रेम<br />
देउनी असा मी चि तयांचा वाहे योग-क्षेम!<br />
(भावार्थ गीता ९.२२)<br />
<br />
(32)<br />
नित्य जोडला एकनिष्ठ तो असे श्रेष्ठ सर्वात<br />
मी अत्यंत प्रिय त्यासि तसा तो प्रिय मज अत्यंत!<br />
अनन्य सहजे निरंतर भजे मी चि होउनी माते<br />
असुनी देही आत्म-रूप तो त्यजी देह-भावाते<br />
(भावार्थ गीता ७.१७)<br />
<br />
(33)<br />
योगी ज्ञानी भक्त भला तो बहु जन्मांती शरण<br />
मज सर्वस्वी येउनि चुकवी जन्म आणखी मरण!<br />
पाहे अथवा निवांत राहे तरी तयाते मीच<br />
सबाह्य-अभ्यंतरी दिसतसे नसे दुजे काहीच<br />
आत्मानुभवे जग चि आघवे वासुदेव-मय झाले<br />
बहु दुर्लभ तो महंत विश्वी विश्व होउनी खे़ळे!<br />
(भावार्थ गीता ७.१९)<br />
<br />
(34)<br />
सोडुनि नाना मन:कामना आत्म-तुष्ट जो राहे<br />
आत्म-द्वारा, तया बोलती स्थित-प्रज्ञ तू पाहे<br />
(भावार्थ गीता २.५५)<br />
<br />
(35)<br />
निष्कामत्वे जगी वावरे जो नि:स्पृह निरूपाधि<br />
निरहंकारी निर्मम नर तो परम शांति संपादी<br />
(भावार्थ गीता २.७१)<br />
<br />
(36)<br />
सर्वा भूती भगवंत असा भाव बाणला म्हणुनी<br />
कवणाते तो नुबगे ज्याते तेवि नुबगती कोणी<br />
विषय निमाला विश्वी झाला विश्व-रूप जो पाही<br />
म्हणुनि जयाला चित्ती नुरला हर्ष-विषाद मुळी हि<br />
जगती न दुजे ह्यास्तव सहजे निर्भय जो अक्रोधी<br />
प्राणाहुनि तो प्रिय मज होतो पार्था सम्यग्बोधी!<br />
(भावार्थ गीता १२.१५)<br />
<br />
(37)<br />
समान मानापमान मानी समान शत्रू-मित्र<br />
निश्चल राहे विश्वी पाहे आत्म-रूप सर्वत्र<br />
होता ब्रह्मावबोध कर्मारंभ खुंटला ज्याचा<br />
जाण अर्जुना, तो चि त्रिगुणातीत बोलिला साचा<br />
(भावार्थ गीता १४.२५)<br />
<br />
(38)<br />
परी रंगला आत्म-सुखी जो जया आत्म-संतृप्ती<br />
आत्म्यात चि तो संतुष्ट तया कार्य उरे ना जगती<br />
असुनि देही तया न राहे देह-धर्म-संबंध<br />
म्हणुनि तयाचा कर्तव्याचा सुटला सहजे बंध<br />
(भावार्थ गीता ३.१७)<br />
<br />
(39)<br />
कर्म तयाने केले अथवा न च केले ह्या जगती<br />
तरि धनंजया, अ-संगा तया काय तयाची महती!<br />
नसे तयाचा मोह गुंतला इथे भूत-मात्रात<br />
देह विसरला अखंड रमला जो आत्मानंदात<br />
परी अर्जुना, जोवरी मना भेटे ना हे ज्ञान<br />
कर्म-साधना तोवरी जना उचित सर्वथा जाण<br />
(भावार्थ गीता ३.१८)<br />
<br />
(40)<br />
आणि मिळे ते गोड मानितो जो निर्मत्सर झाला<br />
सुख दु:खादि द्वन्द्वे ती ना स्पर्शू शकती ज्याला<br />
मिळो यश तसे न मिळो तेथे असे सदा सम-भावे<br />
जरी आचरे कर्म सकल तो कर्म-बंध न च पावे<br />
(भावार्थ गीता ४.२२)<br />
<br />
(41)<br />
पार्था, पाहे ईश्वर राहे सर्व-भूत-हृदयात<br />
निज-मायेने तो चि खेळवी जगत्सुत्र निभ्रांत<br />
घालुनी यंत्री माया-सूत्री तो परमेश नियंत्री<br />
भूते सगळी जशी बाहुली सूत्र-धार कळसूत्री<br />
(भावार्थ गीता १८.६१)<br />
<br />
(42)<br />
त्या हृदयस्था शरण सर्वथा जाई अर्जुना, भावे<br />
जसे जान्हवी-जळ सर्वस्वी सागराकडे धावे<br />
कृपा तयाची होता साची स्वानंदैकनिधान<br />
पावशील तू परम शांतिचे दिव्य अव्यय स्थान<br />
(भावार्थ गीता १८.६२)<br />
<br />
भगवद्गीतेचे सारतत्व संक्षिप्त स्वरूपात ४२ निवडक श्लोकांमधून सांगून झाल्यावर फलश्रुती किंवा सांगता या स्वरूपात भगवान रमण महर्षींनी एक श्लोक तामिळ भाषेत रचला, त्याचा भावानुवाद असा करता येईलः<br />
<br />
ज्याने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत असताना शाश्वत सत्याचा सहजतेने उपदेश केला, अर्जुनाच्या भवतापाचे लीलया निवारण केले, मानवी देहाच्या स्वरूपात अवतरलेल्या हे कृपासिंधू, तू आमचे रक्षण कर.<br />
<br />
||श्रीकृष्णार्पणमस्तु||<br />
<br /></div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-70936747629480428772020-05-01T02:52:00.002-07:002020-06-04T21:24:14.096-07:00श्री शेषाद्री स्वामी आणि भगवान श्री रमण महर्षी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
श्री शेषाद्री स्वामी हे रमण महर्षींना समकालिन असलेले सिद्ध सांप्रदायिक सत्पुरूष होते. रमण महर्षी आणि स्वामींमधे आंतरिक जिव्हाळ्याचे आणि परस्पर आदराचे नाते होते. शेषाद्री स्वामींविषयी उल्लेख केला नाही तर महर्षींच्या चरित्राला पूर्णत्व येत नाही. महर्षींच्या आयुष्यात त्यांच्या भूमिकेला एक अनन्यसाधारण असे महत्व होते.<br />
<br />
वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करून रमण महर्षी अरूणाचलाच्या आश्रयाला आले. तेथे निर्मनुष्य असलेल्या तळघरासारख्या जागेत असलेल्या 'पाताळलिंगम' या ठिकाणी महर्षींना याची देही याचि डोळा आपलाच मृत्यु होत असल्याचा अनुभव आला, तसाच पुढे निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त झाली. देहभान हरपलेल्या अवस्थेत त्या गुफेत महर्षी किती दिवस ध्यानस्थ होते हे सांगता येणे अवघड आहे. शेषाद्री स्वामींना दृष्टांत होत असत. एके दिवशी कोवळ्या वयातल्या एका सुकुमार योग्याचा अस्थिपंजर झालेला देह स्वामींना स्वप्नात दिसला आणि "या मुलाचे रक्षण कर" असा आदेशच अरूणाचलेश्वराने दिला. आपल्याला घडलेले दृष्टांत फोल नसतात हे पक्के माहित असलेल्या स्वामींनी त्या बालयोग्याचा शोध आरंभला. अरूणाचलाचा कानाकोपरा धुंडाळून देखील तो बालयोगी काही सापडेना. तेव्हा अरूणाचलेश्वरासमोर बैठक मारत स्वामींनी संकल्प सोडला की आता जोवर त्या बालयोग्याचा शोध लागत नाही तोवर अन्न किंवा पाण्याचे देखील सेवन करणार नाही. त्याला हुडकण्यासाठी आकाशपाताळ एक करेन. मनाच्या त्या उद्विग्न अवस्थेत अचानक स्वामींच्या लक्षात आले की आपण पाताळलिंगम या निर्जन स्थानी तर शोध घेतलेलाच नाही.<br />
<br />
ते तडक पाताळलिंगम गुफेत येऊन पोचले. तिथे पाहतात तर काय आश्चर्य! अस्थिपंजर झालेला एक कोव़ळ्या वयातला मुलगा तिथे समाधिस्थ बसलेला त्यांना दिसला. देहाचे भान नसल्याने त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी क्षते पडलेली होती, पिसवांसारख्या परजीवी कीटकांनी केलेल्या जखमा चिघळलेल्या होत्या. स्वामींच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. त्या अस्थिपंजर देहाला कडेवर घेत त्याचा पुत्रवत सांभाळ करायचे त्यांनी मनोमन ठरवले. रमण महर्षींच्या जीवनात शेषाद्रींचा प्रवेश झाला तो असा.<br />
<br />
तिरूवन्नमलै गावाच्या पंचक्रोशीत शेषाद्री स्वामींची ख्याती एक विक्षिप्त अवलिया अशा स्वरूपाची होती. शेषाद्री स्वामींना संताप आला तर त्यांच्या पुढ्यात असलेल्या माणसाची खैर नसे. त्यांनी उच्चारलेले शब्द हमखास खरे होत असत. त्यामुळे गावात त्यांच्याबद्दल एक प्रकारची आदरयुक्त भीती होती. अध्यात्मात रूचि असलेल्या कित्येकांना त्यांच्याबद्दल नितांत आदर होता, तर काहींच्या लेखी ते फक्त एक विक्षिप्त व्यक्ती होते. शेषाद्रींचे कित्येक किस्से प्रसिद्ध आहेत. वानगीदाखल सांगायचे तर शेषाद्री स्वामी गावातून जात असताना समोरून एक गावकरी आणि एक रेडा येत होता. स्वामींनी त्या माणसाला विचारले, हे काय आहे? तो माणूस बुचकळ्यात पडला आणि म्हणाला, "महाराज, हा तर रेडा आहे". यावर स्वामी म्हणाले, "अरे रेड्या, ते ब्रह्म आहे!" स्वामींचे कोड्यात टाकणारे बोलणे लोकांना अगम्य वाटत असे.<br />
<br />
गावकर्यांचा लेखी अडाणी आणि विक्षिप्त असलेल्या शेषाद्री स्वामींना आयुर्वेदाचे तसेच वनौषधींचे सखोल ज्ञान होते. याच ज्ञानाच्या जोरावर अस्थिपंजर झालेल्या बाल रमण महर्षींवर उपचार करायला त्यांनी सुरूवात केली. स्वतःचे शून्य उत्पन्न असलेल्या आणि भिक्षेवर निर्वाह करत असलेल्या स्वामींवर परस्वाधीन असलेल्या बालयोग्याची जबाबदारी आलेली होती. त्याचे पालन पोषण कसे करायचे हा प्रश्नच होता. समाधीस्थ असलेला तो कुमार जिवंत आहे का हे पाहण्यासाठी गावातली टवाळ मुले त्याला त्रास देत असत. क्वचित प्रसंगी दगड किंवा वीट देखील फेकून मारत असत. शेषाद्रींनी आपला रूद्रावतार दाखवल्यावरच हा प्रकार बंद झाला. शेषाद्रींनी त्या कालखंडात तळहातावरच्या फोडाप्रमाणे महर्षींची काळजी घेतली.<br />
<br />
समाधीस्थ असलेल्या देहाच्या अन्नपाण्याच्या गरजा अत्यंत मर्यादित असतात. शेषाद्रींना हे माहित होते. अरूणाचलाला रोज पंचामृताचा अभिषेक होत असे. महादेवाच्या पिंडीच्या मागच्या बाजूस असलेल्या एका पन्हाळीतून हे पंचामृत खाली पडत असे. हे पंचामृतच आपण तयार केलेल्या द्रोणात गोळा करून दिवसातून दोन तीन वेळा तेच समाधीस्थ असलेल्या बालकाला ते भरवत असत. देहधारणेसाठी ते पुरेसे ठरत असे. स्वामींनी केलेले उपचार आणि दैवी कृपा यांच्या जोरावर महर्षी या अवस्थेतून कालांतराने बाहेर आले. निर्विकल्प समाधीच्या पलीकडे असलेल्या 'सहज समाधी' अवस्थेत त्यांचे ईश्वरी कार्यही सुरू झाले.<br />
<br />
महर्षींच्या अध्यात्मिक अधिकाराची जाणीव असल्याने शेषाद्री स्वामींनी कधीही त्यांचे गुरूपद घेण्याचा प्रयत्न केला नाही. वयाने मोठे असल्याने ते महर्षींचा उल्लेख माझा लहान भाऊ असाच करत असत. रमणाश्रमात आलेल्या यात्रेकरूंनी, खास करून मद्रास सारख्या शहरी भागातून आलेल्या उच्चशिक्षीत लोकांनी ध्यानधारणा करणे किंवा महर्षींकडून शंकानिरसन करून घेणे सोडून आश्रमाचे व्यवस्थापन किंवा सामाजीक, राजकीय विषयावर टीकाटिप्पणी सुरू केली की शेषाद्री स्वामी अस्वस्थ होत असत. स्पष्टवक्ते असल्याने ते अशा लोकांची कानउघाडणी करत असत. एका उच्च्पदस्थ आणि गर्भश्रीमंत व्यक्तीला ते म्हणाले होते, 'हे पहा, हा माझा भाऊ रमण. याला हजार रूपये पगार आहे. मला शंभर रूपये पगार आहे. इतक्या दूरवर आला आहात तर भलत्याच गोष्टीत लक्ष न घालता एक रूपयाची तरी कमाई कराल. की जसे आलात तसेच खंक अवस्थेत परत जाणार आहात?"<br />
<br />
रमण महर्षींची आई उतार वयात अरूणाचलाच्या आश्रयाला आल्यानंतर "मी शेषाद्री स्वामी. मी संन्यासी आहे. या आश्रमात मात्र रमण नावाचा एक प्रापंचिक राहतो" अशी रमण महर्षींची फिरकी घ्यायला ते कमी करत नसत. महर्षींबरोबर सलगीच्या नात्याने आणि अनौपचारिकपणे बोलण्याइतका अधिकार विरळ्याच व्यक्तींचा होता. शेषाद्री स्वामी त्यापैकीच एक होते. महर्षीही नेहेमी स्मितहास्य करून स्वामींच्या हजरजबाबीपणाला आणि विनोदबुद्धीला दात देत असत. रमणाश्रमाला लागूनच शेषाद्री स्वामींचा मठ आणि त्यांची समाधी आहे. रमणाश्रमाला भेट देण्याची संधी मिळाली, तर शेषाद्री स्वामींच्या समाधीचे दर्शन न चुकता घ्या असे नम्रपणे सुचवून तसेच रमण महर्षी, शेषाद्री स्वामीं आणि सद्गुरू श्री गुरव सरांना वंदन करून लेखाची सांगता करतो.</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-18380023881291814612020-04-27T03:53:00.000-07:002021-05-11T07:16:42.365-07:00विभाग ४ - ध्यान आणि योग - प्रकरण १3 - योगिक प्रक्रिया <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
या प्रकरणात भगवान रमण महर्षींचे योगिक प्रक्रियेविषयीचे मार्गदर्शन आपण जाणून घेणार आहोत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
ढोबळमानाने पाहता आत्मा किंवा ईश्वरी सत्तेपासून आपण विभक्त झाल्याचे (वियोग) जाणवत असल्यामुळे देह आणि मनाला वळण लावण्यासाठी नानाविध पद्धतींचा अवलंब करून आत्मतत्वाशी किंवा ईश्वरी सत्तेशी पुन्हा एकदा संलग्न होणे किंवा 'योग' साधणे हे योगमार्गी साधकांचे ध्येय असते. अंदाजे २००० वर्षांपूर्वी महर्षी पतंजलींनी रचलेल्या योगसूत्रांवर आधारित योगपद्धती 'राजयोग' या नावाने प्रसिद्ध आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे आठ टप्पे असलेला अष्टांगयोग तसा सर्वज्ञातच आहे. या पैकी कित्येक टप्प्यांचा इतर साधनपद्धतींमधेही अंतर्भाव होत असला, तरी हठयोग आणि प्राणायामामुळे राजयोगाला त्याची वेगळी ओळख प्राप्त झालेली आहे. हठयोग साधत असताना देहशुद्धीविषयक अतिरंजित कल्पना साधकाला पछाडून टाकत असल्याने योगविषयक प्रश्नांची उत्तरे देताना भगवान श्री रमण महर्षी हठयोगाविषयी नापसंती व्यक्त करत असत. अध्यात्मिक प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी मनावर ताबा मिळवणे ही एकमेव गोष्ट अत्यंत आवश्यक आहे हे महर्षींंच्या उपदेशामागचे मुख्य सूत्र होते. शारिरीक आरोग्य प्राप्ती किंवा देहशुद्धीवर फाजील भर देत असलेल्या साधनपद्धतींचा अवलंब करण्यासाठी ते आपल्या अनुयायांना कधीच प्रोत्साहन देत नसत. प्राणायामाबद्दल मात्र त्यांचे मत अनुकूल होते. महर्षी सांगत असत की इतर पद्धतींनी मनःसंयम साधता येणे ज्यांना अवघड वाटते, अशा साधकांसाठी प्राणायामाची मदत घेणे उपयुक्त ठरू शकते. मात्र एकंदर पाहता प्राणायाम ही साधनेच्या अगदी प्रारंभिक टप्प्यातली, मर्यादित उपयुक्तता असलेली तसेच अनिवार्य नसलेली साधनपद्धती आहे असेच महर्षींचे मत होते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
(नैतिकता, ध्यान तसेच समाधीबद्दलची महर्षींची मते पारंपारिक राजयोग्यांपेक्षा वेगळी होती, त्यांचा उहापोह या प्रकरणात केलेला नाही.)</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
राजयोगाव्यतिरिक्त कुंडलिनी योग ही आणखी एक साधनपद्धती प्रसिद्ध आहे. शरीरात असलेल्या वेगवेगळ्या चक्रांवर ध्यान करून कुंडलिनी शक्तीला चेतवण्याचा प्रयत्न करणे हा कुंडलिनी योगाच्या साधकांचा मार्ग आहे. मूलाधार चक्रापासून सुरूवात करत मणक्यात असलेल्या सुषुम्ना नाडीतून कुंडलिनी शक्तीला उर्ध्वगामी करत मस्तकात स्थित असलेल्या सहस्त्रार चक्रापर्यंत नेणे हे साधकाचे ईप्सित असते. कुंडलिनी शक्ती सहस्त्रार चक्रापर्यंत पोचली की साधकाला आत्मसाक्षात्कार घडतो अशी कुंडलिनी योगाची धारणा आहे. महर्षींना कुंडलिनी शक्ती तसेच चक्रे अस्तित्वात आहेत हे मान्य होते. महर्षी मात्र असे प्रतिपादन करत असत की सहस्त्रार चक्रापर्यंत कुंडलिनी शक्ती पोचल्याने आत्मसाक्षात्कार घडत नाही. सहस्त्रार चक्राला ओलांडून अमृतनाडीमधून (अमृत नाडीलाच परा नाडी किंवा जीवन नाडी ही नावे दिलेली आहेत) कुंडलिनी शक्ती छातीत उजव्या हाताच्या बाजूला असलेल्या हृदयचक्रापर्यंत पोचली की आत्मसाक्षात्कार घडतो असे महर्षींचे मत होते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
(टीपः हृदय या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. इथे उल्लेख केलेले चक्र हा शारिरीक अवयव नाही. शारिरीक अवयव डाव्या बाजूला असतो. हृदयचक्र हा एक चैतन्य स्त्रोत आहे. महर्षी या चक्राविषयी अगदी सुलभ असे स्पष्टीकरण देत असत. कुठल्याही व्यक्तीला आपण अंतःकरणापासून अभिव्यक्त होतो आहोत असे दर्शवायचे असेल, किंवा एखादी गोष्ट आपल्या अंतःकरणात खोलवर परिणाम करून गेलेली आहे असे दर्शवायचे असेल, तर नकळत तिचा हात छातीच्या उजव्या बाजूकडे जातो. एखादी गोष्ट छातीठोकपणे सांगतो असे म्हणताना आपली मूठ छातीवर उजव्या बाजूलाच आपटली जाते. आत्मतत्व जरी स्थानबद्ध किंवा कालबद्ध नसले, तरी त्या तत्वाचे प्रत्येक व्यक्तीला जन्मजात जाणवत असलेले किंवा सहजस्फूर्तिने कळणारे अधिष्ठान हृदयचक्रच आहे. असो.)</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
कुंडलिनी योग अनावश्यक तसेच संभाव्यतः धोकादायक असल्याने आपल्या अनुयायांना या मार्गाचा अवलंब करण्याचा उपदेश महर्षी कधीच देत नसत. आत्मविचाराने तसेच भक्ती आणि समर्पणभावाने कुंडलिनी शक्ती साधकाच्या नकळत अंतिम टप्प्यापर्यंत पोचत असल्याने त्या दृष्टीने अन्य साधनपद्धतींचा अवलंब करणे अनावश्यक आहे या मतावर महर्षी ठाम होते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
कर्मयोग ही आणखी एक साधनपद्धती हिंदू जनमानसात प्रचलित आहे. निस्वार्थ भावनेने गरजूंची सेवा करून तसेच कर्मफलावर आपला अधिकार नाही हे माहित असल्याने पूर्वनिर्धारित फलाकांक्षेचा अट्टाहास न धरता (फळाची अपेक्षाच न धरता नव्हे!) आपल्याच चित्तशुद्धीसाठी परोपकार करून आपली अध्यात्मिक उन्नती साधणे असे या योगाचे स्वरूप आहे. भगवद्वीतेत देखील या योगाची महती सांगितलेली आहे. महर्षी मात्र शक्यतो आपल्या भक्तांना या मार्गाचा अवलंब करण्यापासून परावृत्त करत असत. सत्कृत्ये करू पाहणारा 'मी' तसेच माझ्या मदतीची गरज असलेले असहाय्य 'इतरेजन' निरंतर अस्तित्वात आहेत या गृहीतकावर हा मार्ग आधारलेला असल्याने तथाकथित 'मी' बलवान होण्याची तसेच साधक द्वैतभावात कायमचा अडकून पडण्याची शक्यता या मार्गाचा अवलंब करत असताना बळावते. ज्ञान, भक्ती किंवा राजयोग या तिन्हीपैकी कुठल्याही मार्गाचा अवलंब करण्यासाठी एखादा साधक असमर्थ आहे असे दिसले, तर महर्षी त्याला/ तिला चित्तशुद्धी साधण्यासाठी कर्मयोगाची उपासना करण्यासाठी प्रोत्साहन देत असत. एखाद्या व्यक्तीचा पिंड ज्ञानमार्ग किंवा भक्ती/ समर्पणभावासाठी अनुकूल नाही, तसेच वृद्धत्व किंवा शारिरिक दुर्बलतेमुळे राजयोगाचा अवलंब करण्यासाठी देखील ती सक्षम नाही असे महर्षींच्या ध्यानात आले, तर अशा एखाद्या विरळ्या साधकासाठीच त्यांनी कर्मयोग राखून ठेवलेला होता. 'प्रयत्नांती परमेश्वर' या न्यायाने कर्ममार्गाचा अवलंब करताना चित्तशुद्धी होत जाते. त्या योगे हळूहळू अहंता आणि वासना रहित निर्भेळ आनंदाचा अनुभव मिळायला सुरूवात होते. असे घडले की साधक आपोआप आत्मविचार किंवा भक्ती/ समर्पणासाठी पात्र होत जातो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
कर्मयोग यथास्थितपणे साधायचा असेल तर 'मी' इतरेजनांवर उपकार करतो आहे अशी भावना लेशमात्रही न ठेवता आपण करत असलेल्या सत्कृत्यांचे आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर असलेले अवांछित परिणाम तसेच सत्कृत्यांमधून होणारी अपेक्षित/ अनपेक्षित फलप्राप्ती याविषयी तटस्थ राहून कर्ममार्गाचे आचरण करावे लागते असे महर्षी ठामपणे सांगत असत. 'मी कर्ता आहे' ही भावना हळूहळू लोप पावल्याने उपरनिर्दिष्ट दोन्ही गोष्टी साध्य होतील हे महर्षींना मान्य असले तरी एकंदर पाहता कर्मयोग या विचारसरणीला ते मनःपूर्वक पाठिंबा देत नसत असेच दिसून येते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः योग या शब्दाचा अर्थ होतो 'जोडले जाणे'. मला नेहेमी प्रश्न पडतो की काय जोडले जाते आणि ते कशाशी जोडले जाते?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: अगदी बरोबर. योगात आधी विभक्तपणा असणे आणि नंतर एखादी गोष्ट (उदा. जीव) आधी पृथकतेने नांदत असलेल्या अन्य गोष्टीशी संलग्न होणे (उदा. शिव) या धारणेचा अंतर्भाव असतो. तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. तो असा की साधकाने नेमक्या कोणत्या दोन विभक्त गोष्टींचा 'योग' साधण्यासाठी साधना करावी? तुम्ही साधक आहात आणि कुठल्यातरी वेगळ्या गोष्टीशी तुम्हाला संलग्न व्हायचे आहे; हे गृहीतक मानून तुम्ही पुढे जात असाल तर तुमच्यापेक्षा वेगळी, विभक्त आणि पृथकतेने नांदणारी अशी एखादी गोष्ट अस्तित्वात असायला हवी. तुमचे स्वरूप मात्र तुमच्या अगदी निकट असते आणि तुम्हाला सतत त्याची सजग नसली तरी कळात नकळत जाणीवही असते. त्याचा अंतर्यामी शोध घ्या आणि त्यात विलीन होऊन जा. तुमचे स्वरूपच अनंताला व्यापून टाकणारे आहे अशी प्रचिती तुम्हाला येईल, मग विभक्त असण्याची जाणीव असेलच कुणाला? त्यामुळे योग साधण्याचा प्रश्नच उरणार नाही.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः प्राणायामाचे तीन टप्पे असतात - श्वास घेणे, श्वास सोडणे आणि श्वास रोखून धरणे. श्वासाचे या प्रकारे नियमन कसे करावे?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: देहतादात्म्याचा पूर्णपणे त्याग करणे हेच खरे श्वास बाहेर सोडणे (रेचक), "मी कोण आहे" या सनातन प्रश्नाचे उत्तर शोधत अंतर्यामी लीन होऊन जाणे हेच खरे श्वास घेणे (पूरक) तसेच 'तत्वमसि' भावाने आपल्या सच्चिदानंद स्वरूपात स्थिर होऊन जाणे हेच श्वास रोधून धरणे (कुंभक) आहे. हाच खरा प्राणायाम आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः शक्ती जागृत करण्यासाठी योगमार्गाने प्रयत्न करत असलेल्या साधकांमधेच कुंडलिनी शक्तीची जागृती घडून येते, की (नवविधा) भक्ती आणि प्रेमाच्या मार्गाचा अवलंब करत असलेल्या साधकांना देखील ते साध्य करता येते?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: कुंडलिनी शक्ती कोणाकडे नसते? तिचे खरे स्वरूप लक्षात आल्यावर तिलाच 'अखंडाकार वृत्ती' किंवा 'अहं स्फुरणा' असे म्हणतात. तुम्ही कुठल्याही मार्गाचा अवलंब केला तरी कुंडलिनी शक्ती किंवा जगदंबा सतत तुमच्या सोबत असते. फरक असेलच तर तो तुम्ही तिला कुठले नाव देता यात असतो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्न: ज्ञानी व्यक्ती फक्त तिच्याच मार्गाचे अनुसरण करत असलेल्या साधकांना मदत करू शकते की योगासारख्या अन्य मार्गांचा अवलंब करत असलेल्या साधकांनाही ती मदत करू शकते?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: 'पिंडे पिंडे मतिर्भिन्नः' या न्यायाने अध्यात्मिक साधकांनी कुठल्याही मार्गाचा अवलंब करायचे ठरवले तरी ज्ञानसिद्ध व्यक्ती सगळ्यांनाच मदत करू शकते. या बाबतीत शंकेला जागाच नाही! एक दाखला दिल्याने हे स्पष्ट होईल. समजा एखादा पर्वत आहे. त्या पर्वताच्या शिखरावर चढाई करण्याचे अनेक मार्ग आहेत. ज्ञानी ज्या मार्गाने शिखरावर पोचला त्याच मार्गाने लोकांनी यावे असे तो सांगेल, तर काहींना ते रूचेल. काही जणांना ते अवघड वाटेल तर काहींना ते मुळीच रूचणार नाही. ज्ञानी स्वतः ज्या मार्गाने गेला त्या आणि त्याच एकमेव मार्गाने मार्गक्रमण करायचा आग्रह ज्यांना तो मार्ग रूचत नाही अशा साधकांपाशी धरला, तर त्यांना पर्वतारोहण करणे अशक्यप्राय होऊन जाईल. साहजिकच नानाविध मार्गांनी मार्गक्रमण करत असलेल्या साधकांना, मग तो मार्ग कुठलाही असो, ज्ञानी मात्र नक्की मदत करू शकतो. त्याचे कारण असे की अर्धा रस्ता पार करून आलेल्या वाटसरूंना इतर मार्गातल्या गुणदोषांची आणि खाचखळग्यांची इत्यंभूत माहिती नसली, तरी शिखरावर आसनस्थ झालेल्या ज्ञान्याच्या नजरेच्या टप्प्यात चहूबाजूंनी मार्गस्थ झालेले साधक सहजगत्या येत राहतात. त्यामुळे वाटेत फसगत होऊ नये या दृष्टीने चकवे चुकवण्यासाठी किंवा दुखापत होऊ नये या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी यथायोग्य मार्गदर्शन करण्याची क्षमता ज्ञानी व्यक्तीमधे असते. पर्वताचे शिखर किंवा सगळ्या साधकांचे ध्येयदेखील 'एकच' तर असते!</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः भगवान नेहेमी कुठल्या आसनात बसलेले असतात?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: कुठल्या आसनात? (स्मितहास्य करून) हृदयात स्थित असणे या आसनात. ज्या आसनात चित्तवृत्ती प्रफुल्लित राहिल आणि जे सुखावह वाटेल असेच माझे आसन आहे. यालाच सुखासन असे म्हणतात. हृदयस्थ आणि सहजसिद्ध असलेले हे आसन शांतीस्वरूप आहे. ते मन सतत प्रसन्न ठेवते. (मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण). या आसनात स्थित झालेल्या व्यक्तीला अन्य कुठल्याही आसनाची गरज पडत नाही.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः अर्जुनाला युद्धाला सामोरे जाण्यासाठी प्रवृत्त केलेले असल्याने भगवद्वीतेत कर्मयोगावर भर दिलेला दिसतो. सतत कर्तव्यतत्पर राहून तसेच्ग कित्येक आव्हाने परतवून लावत अत्यंत अवघड गोष्टी साध्य करून श्रीकृष्णाने स्वत:च कर्मयोगाचा एक जिवंत आदर्श सगळ्यांपुढे उभा केलेला दिसतो.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: भगवंताच्या उपदेशाची सुरूवातच देह हे तुमचे खरे स्वरूप नाही आणि त्यामुळेच कुठल्याही कर्माचे कर्तृत्व तुमच्याकडे येत नाही असे सांगून होते हे अवश्य लक्षात घ्यायला हवे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः या उपदेशाचा अर्थ काय होतो?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: याचा असा अर्थ होतो की मी कर्ता आहे हा भाव न ठेवताच प्रत्येकाने आपले विहित कर्म केले पाहिजे. अहंता शून्यवत असलेल्या अवस्थेतही कर्म सहजतेने घडतच राहते. विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठीच प्रत्येक व्यक्तीचे देहस्वरूपात प्राकट्य झालेले असते; आणि ती व्यक्ती स्वत:ला कर्ता मानत असो अथवा नसो तिच्या जीवनामागचा मूळ उद्देश प्रारब्धवशात साध्य करून घेतला जातो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः मग कर्मयोगाचा अर्थ काय आहे? कर्मफलाचा त्याग करणे की कर्ताभावाचा त्याग करणे?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: कर्मयोगाचा खरा अर्थ असा आहे की हा योग साधत असताना साधक आपल्या हातून घडत असलेल्या कर्माचे कर्तृत्व स्वतःवर ओढवून घेत नाही. सगळी कृत्ये (त्याच्या स्वधर्मानुसार) आपोआप घडत जातात.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः कर्म करताना फलप्राप्तीविषयी उदासीन असणे असा त्याचा अर्थ होतो का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: कर्म करत असताना कर्ताभाव जागृत असेल तरच कर्मफळाविषयीचा प्रश्न उपस्थित होतो. सगळे अध्यात्मिक ग्रंथ एकमुखाने सांगतात की मी कर्ता आहे या भावनेचाच तुम्ही समूळ त्याग करायला हवा.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः मग कर्मयोगाचा अर्थ 'कर्तृत्व बुद्धी रहित कर्म' असा होतो का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: होय. अगदी बरोबर आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः गीता शिकवते की साधकाने अथ ते इति सक्रिय आणि कर्तव्यतत्पर जीवन जगायला हवे.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: होय, बरोबर आहे. मात्र ते कर्म कर्तृत्वभावना रहित असेल तरच तो कर्मयोग ठरतो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः मला कर्मयोग साधायचा आहे. मी इतरेजनांना मदत कशी करू शकेन?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: तुम्ही ज्यांना मदत करावी असे 'इतरेजन' कोण आहेत? मुळातच हा 'मी' कोण आहे जो इतरेजनांना मदत करणार आहे? आधी 'मी' कोण आहे या गोष्टीचा नीट उलगडा करून घ्या. मी खात्रीने सांगतो की त्याने बाकी सगळ्या समस्यांचे निराकरण होऊन जाईल.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर तसेच खूप मोठे बलिदान दिल्यानंतर स्वराज्य मिळाले तर स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या व्यक्तीला हर्ष वाटला किंवा ती बाब अभिमानास्पद वाटली तर ते (पारमार्थिक दृष्ट्या) योग्यच ठरणार नाही का.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: कुठलेही काम करत असताना त्या ओघात ईश्वरी शक्तीला स्वतं:ला समर्पित करता येणे साधकासाठी क्रमप्राप्त आहे. ईश्वरी सत्तेचा क्षणभरही विसर पडू न देता तिच्या सामर्थ्याची जाणीव साधकाने मनात सतत जपली पाहिजे. ही भूमिका असेल तर हर्षित होण्याचा प्रश्न येतोच कुठे? साधकाने तर त्याच्या हातून घडत असलेल्या कर्माच्या परिणामांविषयी देखील मुळीच क्षिती बाळगू नये. असे असेल तरच त्याच्या हातून घडलेले कर्म नि:संगपणे आणि निस्वार्थ भावनेने घडले आहे असे म्हणता येईल.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
पुरवणी:<br style="box-sizing: border-box;" />भगवान श्री रमण महर्षीं प्रामुख्याने आत्मविचार आणि भक्तीभावपूर्ण समर्पण या दोन गोष्टींवर भर देत असत. ते नेहेमी 'भक्ती ही ज्ञानमाता आहे' असे सांगत असत. भक्ती आणि ज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे स्पष्टपणे दाखवून देणारे स्वामी स्वरूपानंद यांचे एक कवनः</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
वेदांती तो बोले सृष्टि मिथ्या ऐसे<br style="box-sizing: border-box;" />भक्ता ती चि दिसे हरि-रूप</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
वेदांती ओळखे मिथ्या मायाभास<br style="box-sizing: border-box;" />हरिचा विलास भक्त म्हणे</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
दोहींचा भावार्थ सारखा तत्वता<br style="box-sizing: border-box;" />एक चि हरि-सत्ता सर्वा ठायी</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; overflow-wrap: break-word;">
भक्त तो चि ज्ञानी ज्ञानी तो चि भक्त<br style="box-sizing: border-box;" />जाणावा सिद्धांत स्वामी म्हणे</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; overflow-wrap: break-word;">
<br style="box-sizing: border-box;" />- प. पू. स्वामी स्वरूपानंद (पावस)</div>
</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-54976905557219245442020-04-19T02:03:00.003-07:002021-05-11T07:16:40.001-07:00विभाग ४ - ध्यान आणि योग - प्रकरण १२ - दैनंदिन व्यावहारिक जीवन <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
विभाग ४ - ध्यान आणि योग - प्रकरण १२ - दैनंदिन व्यावहारिक जीवन<br />
<br />
या प्रकरणात अध्यात्मिक साधकांच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनाविषयीचे भगवान रमण महर्षींचे मार्गदर्शन आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.<br />
<br />
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:<br />
<br />
हिंदू परंपरेत अध्यात्मिक साधकांसाठी आश्रम व्यवस्थेची महती सांगितली गेलेली आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमांवर आधारित असलेल्या आश्रम व्यवस्थेतून जनमानसात एक समज रूढ होत गेला; की अध्यात्मिक साधक/ साधिका गांभिर्याने आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला/ तिला प्रापंचिक जीवनाचा त्याग करून ध्यानधारणेकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी कठोर ब्रह्मचर्याचे पालन करावे लागणारे, विरक्त, खडतर आणि तप:पूत जीवनच व्यतित करावे लागेल. रमणाश्रमाला भेट देणारे अभ्यागत महर्षींना नेहेमी या अनुषंगाने प्रश्न विचारत असत. महर्षीं त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना आश्रम व्यवस्थेचे समर्थन करण्यासाठी ठामपणे नकारच देत असत.<br />
<br />
आपल्या भक्तांना व्यावहारिक जीवनशैलीचा त्याग करून किंवा प्रापंचिक जबाबदार्यांना तिलांजली देत व्रतस्थ जीवन व्यतित करण्याची परवानगी महर्षींकडून कधीच मिळत नसे. लौकिक दृष्ट्या कुठल्याही परिस्थितीत असलेल्या साधकांसाठी आत्मसाक्षात्कार तितक्याच सुलभतेने साध्य होण्याजोगा आहे असे ते ठामपणे आणि सातत्याने साधकांच्या मनावर बिंबवत असत. महर्षी त्यांच्या अनुयायांना नेहेमी असा उपदेश देत असत की आपले कर्तव्य तत्परतेने पार पाडत असताना किंवा नित्य नैमित्तिक कर्मे करताना प्रारब्धानुसार देहाद्वारे ती घडत आहेत; मात्र त्यांचे कर्तृत्व ओढवून घेणारा किंवा त्यांची जबाबदारी स्वीकारणारा व्यक्तिगत 'मी' अस्तित्वात नाही असे सजग भान जागृत ठेवण्याने जो अध्यात्मिक लाभ होईल, तो प्रापंचिक जीवनाचा त्याग केल्याने किंवा नाहक देह कष्टवण्याने कधीच मिळणार नाही.<br />
<br />
अध्यात्मिक प्रगती साधण्याच्या दृष्टीने मनाची प्रवृत्ती सर्वाधिक महत्वाची असून स्थळ, काळ किंवा परिस्थिती या तुलनेने गौण गोष्टी आहेत असे महर्षी ठामपणे सांगत असत. नोकरी व्यवसायात किंवा स्थळ, काळ आणि परिस्थितीत बदल केल्याने आपली अध्यात्मिक प्रगती होईल असे कुणी सुचवले तर महर्षींना ते मान्य होत नसे. या बाबतीत किरकोळ बदल करण्यासाठी परवानगी देताना देखील ते सहजासहजी राजी होत नसत. दैनंदिन आचरणाचा विचार केला तर आहाराविषयक सवयीत सुधारणा करणे या एकमेव बदलाला मात्र महर्षी नेहेमी अनुमोदन देत असत. आपण ग्रहण केलेल्या अन्नाचा मनात उद्भवणार्या विचारांवर गुणात्मक तसेच संख्यात्मक परिणाम परिणाम होतो हा हिंदू धर्मात महत्वाचा मानला गेलेला सिद्धांत महर्षींना मान्य होता. (सात्विक अन्नग्रहण केल्याने चित्तशुद्धी होते. मन आणि बुद्धी सुसंवादी झाल्याने स्थैर्य, समाधान आणि आनंद अनुभवता येतो. राजस अन्नग्रहण केल्याने चंचलपणा वाढतो. मन अति सक्रिय झाल्याने तसेच मनाची सतत चलबिचल झाल्याने चित्ताचा क्षोभ होतो. तामसिक अन्नग्रहण केल्याने चित्ताचे मालिन्य, बेदरकारपणा तसेच अमानुष वृत्ती अशा दुर्गुणांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळॅ सारासार विचार करण्याची तसेच योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी होते). कुठलीही अध्यात्मिक साधना करताना शाकाहारी अन्नाचे संयत प्रमाणात सेवन करणे अत्यंत लाभदायक आहे असे महर्षी सुचवत असत.<br />
<br />
प्रश्नः नोकरीचा राजीनामा द्यावा आणि सतत श्री भगवानांच्या सान्निध्यात रहावे अशी प्रबळ ईच्छा मला नेहेमी होत असते.<br />
रमण महर्षी: भगवान सतत तुमच्या सोबतच आहेत. ते तुमच्या अंतर्यामीच आहेत. खरे सांगायचे तर तुम्ही स्वत:च भगवान आहात. हा साक्षात्कार होण्यासाठी नोकरीचा राजीनामा देण्याची किंवा घरदार सोडून पळून जाण्याची मुळीच गरज नाही. वैराग्य या संकल्पनेचा अर्थ घर सोडणे, प्रापंचिक नात्यांना तिलांजली देणे किंवा वरपांगी वस्त्रप्रावरणांमधे बदल करणे असा होत नाही. माया, ममत्व आणि वासनांचा त्याग केल्यानेच अंगी खरेखुरे वैराग्य बाणवता येते. जी ईश्वरी सत्ता सगळ्या जगाचा भार वाहते, तुम्ही स्वतःला तिच्या स्वाधीन केलेत, तर नोकरीचा राजीनामा देण्याची तुम्हाला गरजच वाटणार नाही. वासनांचा त्याग केलेली व्यक्ती खरोखरच विश्वात्मक देवाशी इतकी समरस होऊन जाते, की सगळ्या अस्तित्वाला आपल्या कवेत घेईल इतका तिच्या प्रेमाचा परिघ व्यापक होतो. देवाच्या निस्सीम भक्ताचे वर्णन करताना तो विरक्त, त्यागी किंवा साक्षीभावाने राहणारा आहे या सारख्या रूक्ष संकल्पना थिट्या पडतात. ज्याच्या/ जिच्या प्रेमभावनेचा आणि करूणेचा जगाला व्यापून दशांगुळे उरेल इतका विस्तार झालेला असतो तोच खरा ईश्वर भक्त ही संकल्पनाच अधिक संयुक्तिक आहे. अशी व्यक्ती प्रापंचिक नात्यांमधे गुंतून पडलेली नाही असे भासत असले; तरी वास्तविक पाहता जात, पंथ, धर्म, वंश या सारख्या सीमांना ओलांडून "जीवो ब्रह्मैव नापरः" या न्यायाने अशा व्यक्तीने फक्त मानव समाजच नव्हे तर सगळ्या पशुपक्ष्यांनाही आपले सगेसोयरे मानलेले असते. आपल्या घरादाराचा आणि वस्त्रप्रावरणांचा त्याग करून एखादी व्यक्ती जर खर्या अर्थाने संन्यस्त झालेली असेल, तर आपल्या प्रेमाचा आणि करूणेचा परिघ व्यापक झाल्यानेच ती संन्यस्त झालेली असते . प्रापंचिक नातेसंबंधांमधील ताणतणावांचा किंवा कर्मकटकटींचा उबग आल्याने नव्हे! चित्ताची अशी उन्नत अवस्था साधलेल्या कित्येक भक्तांना आपल्या प्रापंचिक जीवनापासून पलायन करावे असे देखील वाटत नाही. असा भक्त वरपांगी प्रपंचातच रमलेला दिसला, तरी पिकलेले फळ झाडावरून अलगद खाली पडावे तशी त्याची प्रापंचिक वृत्ती मात्र अलगद गळून पडलेली असते. जोवर हे घडत नाही तोवर आपल्या प्रपंचाचा किंवा नोकरी व्यवसायाचा त्याग करणे ही एक प्रकारची आत्मवंचनाच ठरेल.<br />
<br />
प्रश्नः आपले व्यावहारिक कर्तव्य पार पाडण्यात व्यग्र असताना समाधी अवस्थेचा आनंद लुटणे शक्य असते का?<br />
रमण महर्षी: 'मी कर्म करतो' हा कर्ताभावच त्यात सगळ्यात मोठा अडथळा आहे. स्वत:ला प्रश्न विचारा, "कर्म कोण करतो आहे?" आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचे स्मरण करा. इतकेच साध्य करता आले तरी तुमचे काम आपोआप आणि सुरळित सुरू राहूनही त्यातून कर्मबंध निर्माण होणार नाही. संकल्प आणि विकल्प या दोन्हीं गोष्टींना थारा देऊ नका, कारण संकल्पविकल्पात्मक प्रयत्नच कर्मबंध निर्माण होण्याचे मूळ कारण असतात. तुमच्या प्रारब्धात जे असेल ते घडत राहील. तुमच्या प्रारब्धात काम करणे नसेल, तर तुम्ही कितीही शोधाशोध केली तरी तुम्हाला काम मिळणार नाही. प्रारब्धवशात तुमच्याकडून एखादे काम व्हायचे असेल, तर तुम्ही ते टाळण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला तेच काम हाती घेण्यासाठी बाध्य केले जाईल. ते काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न तुमच्या हातून करवून घेतले जातील. काय करावे आणि करू नये हे तुमच्या मर्जीने घडत नसल्याने तो भार ईश्वरावर सोडून तुम्ही स्वस्थचित्त राहिलात तर तुमच्या हातून कित्येक कृत्ये घडताना दिसली तरी तुमची सहज स्थिती (सहज समाधी) भंग होणार नाही.<br />
<br />
प्रश्नः एखाद्याने निरंतर आपल्या स्वरूपाचे स्मरण ठेवणे साध्य केले, तर अशा व्यक्तीकडून घडलेले प्रत्येक कृत्य योग्यच असते का?<br />
रमण महर्षी: खचितच तसे असते. मात्र अशा व्यक्तीला आपण केलेले कृत्य बरोबर आहे की चूक याची फिकीर नसते. अशा व्यक्तीने केलेले प्रत्येक कृत्य हे (तिच्या माध्यमातून) परमेश्वरानेच केलेले असते आणि त्यामुळे ते योग्यच असते.<br />
<br />
प्रश्नः आत्मविचार करण्यासाठी एकांताची आवश्यकता असते का?<br />
रमण महर्षी: एकांत सगळीकडेच आहे. एकांत सतत तुमच्या सोबत असतो. मी उल्लेख करत असलेल्या एकांताचा शोध बाह्य जगतात न घेता तो अंतर्यामी घेण्याचे काम मात्र प्रत्येकाला स्वतःच करावे लागते. एकांत माणसाच्या मनातच दडलेला आहे. बाहेरच्या जगात कितीही कोलाहल सुरू असला तरी एखाद्याने चित्ताची प्रसन्नता भंग होऊ दिली नाही, तर अशी व्यक्ती एकांतातच असते. उलटपक्षी सर्वसंगपरित्याग करून जंगलात जाऊन बसलेल्या एखाद्या व्यक्तीचा आपल्या विचारांवर ताबा नसल्याने तिचे चित्त अस्थिर असेल, तर ती व्यक्ती एकांतात आहे असे म्हणता येत नाही. एकांत ही मनाचीच एक प्रवृत्ती आहे. विकार आणि वासनांनी लडबडलेली व्यक्ती कुठेही असली तरी तिला एकांत मिळवता येत नाही. अंगी वैराग्य बांणवलेला साधक जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी तो कायम एकांतातच असतो.<br />
<br />
प्रश्नः सतत या ना त्या कामात गुंतवून ठेवत असलेली प्रापंचिक कर्तव्ये निभावून नेत असतानाच आम्हाला नैष्कर्म्य स्थिती आणि मानसिक शांती कशी मिळवता येईल?<br />
रमण महर्षी: (पारमार्थिक) शहाणपण मिळवलेली व्यक्ती काम करते आहे असे फक्त इतरांना दिसत असते, त्या व्यक्तीला मात्र तशी जाणीव नसते. असे असल्याने इतरेजनांना ज्ञानी व्यक्ती कधी कष्टाचे डोंगर उपसताना किंवा कधी अवघड गोष्टी साध्य करताना दिसत असली, तरी प्रत्यक्षात ती काहीच करत नसते. अशा व्यक्तीच्या हातून घडणारे कार्यकलाप तिच्या नैष्कर्म्य स्थिती किंवा मन:शांतीमधे अडसर निर्माण करू शकत नाहीत. ज्ञान्याला हे माहित असते की कर्ता करविता तो नसून त्याच्या निव्वळ उपस्थितीत सगळे कार्य घडून येते आहे, तो मात्र सदैव पूर्णपणे निर्लेप आणि निश्चळ अवस्थेतच आहे. अवतीभोवती घडत असलेल्या घडामोडींबद्दलची ज्ञान्याची भूमिका किंवा आंतरिक स्थिती मौन आणि साक्षीभावाचीच असते.<br />
<br />
प्रश्नः पाश्चात्य जीवनशैलीचा अवलंब करत असलेल्या साधकांना वृत्ती अंतर्मुख करणे अधिक कष्टप्रद असते का?<br />
रमण महर्षी: होय, तसे आहे खरे. पाश्चात्य जीवनशैलीचा अवलंब करत असलेली व्यक्ती रजोगुणी असते. अशा व्यक्तीचा स्वभाव बहुधा बहिर्मुखी असतो. आपण आपल्या स्वरूपाचे सतत स्मरण ठेवले, अंतर्यामी शांत राहिलो, तर मग बाहेरच्या जगात आपण हवे तितके कार्यरत राहू शकतो. रंगमंचावर स्त्री पात्र साकार करत असलेला अभिनेता आपण पुरूष आहोत हे विसरून जातो का? तद्वतच जगाच्या या रंगमंचावर आपल्याला स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार आपापली भूमिका वठवावी लागते. आपापल्या भूमिका वठवत असताना आपली मूळ ओळख विसरून त्या भूमिकांशी तादात्म्य न पावणे हाच अध्यात्मिक प्रगतीचा राजमार्ग आहे.<br />
<br />
प्रश्नः पारमार्थिक प्रगती साधण्यातील चालढकल दूर करण्यात इतरेजनांना आपल्याला मदत कशी करता येईल ?<br />
रमण महर्षी: तुम्ही स्वत: हे साध्य केलेले आहे का? तुमच्या सगळा प्रश्नांना आणि उर्जेला स्वरूपबोधाकडे वळवा. तुमच्या अंतर्यामी शक्ती जागृत झाली, तर तिचा परिणाम तुम्ही म्हणता त्या इतरेजनांवर आपोआप होतो.<br />
<br />
प्रश्नः आपण ब्रह्मचर्य पालनाला मान्यता देता का?<br />
रमण महर्षी: खरा ब्रह्मचारी तोच असतो ज्याची ब्राह्मी स्थिती कधीच भंग होत नाही. अशा व्यक्तीच्या बाबतीत विकार आणि वासनांचा पगडा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.<br />
<br />
प्रश्नः योगी अरविंदांच्या आश्रमात विवाहीत जोडप्यांना आश्रमात वास्तव्य करायचे असेल तर ब्रह्मचर्याचे पालन केलेच पाहिजे असा कडक नियम आहे.<br />
रमण महर्षी: त्याचा काय उपयोग आहे? ज्या वासना मनात जागृत आहेत, त्यांचे लोकांना सक्तीने दमन करायला भाग पाडण्याने काय साध्य होणार आहे?<br />
<br />
प्रश्नः मी क्षणिक वासनांना बळी पडून बरीच पापकर्मे केली आहेत.<br />
रमण महर्षी: आपण असे गृहीत धरू या की हे खरे आहे. तुम्ही जर सतत मनातल्या मनात त्याच त्या गोष्टींची उजळणी करत बसणे थांबवले, तर त्यांचे उपद्रव मूल्य आपोआप शून्य होऊन जाईल. आत्मस्वरूपामधे कुठल्याही पापकर्माची जाणीव नसते. लक्षात घ्या की वासनांचा त्याग हा आतून करावा लागतो. आपल्या वर्तनात वरपांगी बदल करण्याने फारसा लाभ होत नाही.<br />
<br />
प्रश्नः आहाराविषयी आपले काय मत आहे?<br />
रमण महर्षी: अन्नाचा मनावर परिणाम होतो. कुठल्याही प्रकारची योगसाधना करायची असेल तर शाकाहाराचा स्वीकार करणे अतिशय हितकारक आहे. सात्विक शाकाहारी अन्नग्रहण केल्याने चित्तशुद्धी होण्यात आणि मन स्थिर होण्यात मदत होते.<br />
<br />
प्रश्नः आहारात मांसाहाराचा समावेश करणारी व्यक्ती आत्मसाक्षात्कारी होऊ शकते का?<br />
रमण महर्षी: होय, ते अशक्य नाही. तुम्ही स्वतः मात्र हळूहळू मांसाहाराचा त्याग करत सात्विक शाकाहारी अन्नग्रहण करण्याची सवय करून घ्या. या बाबतीत मला एक महत्वाची बाब अवश्य नमूद करायची आहे, ती अशी की एकदा ज्ञानप्राप्ती झाली की मग तुम्ही काय खाता याने फारसा फरक पडत नाही. ज्ञानाग्निचा वणवा इतका प्रदिप्त असतो की तुम्ही त्यात कुठलेही इंधन घातले तरी त्याने तिळमात्रही फरक पडत नाही.<br />
<br />
प्रश्नः (साधकांनी) मद्यपान आणि मांसाशनाचा पूर्णपणे त्याग करण्याची शिफारस आपण करता का?<br />
रमण महर्षी: साधनेच्या प्रारंभिक अवस्थेत या गोष्टींचा पूर्णपणे त्याग करणेच साधकांच्या हिताचे आहे. गतानुगतिकपणे काही सवयी आपल्या अंगी अगदी हाडीमाशी मुरलेल्या असतात. जिभेचे चोचले पुरवण्याची चटक लागल्यानेच त्या सवयी सोडताना त्रास होतो, त्यांची आपल्या देहाला खरोखरची आवश्यकता असल्याने नव्हे!<br />
<br />
प्रश्नः ढोबळमानाने पाहता अध्यात्मिक साधकांनी सरसकट पाळावेत असे आचरणविषयक नियम काय आहेत?<br />
रमण महर्षी: संयत आहार, संयत निद्रा आणि संयत संभाषण.<br />
<br />
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
नको निराहार नको सेवू फार<br style="box-sizing: border-box;" />सदा मिताहार असो द्यावा</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
नको अति झोप नको जागरण<br style="box-sizing: border-box;" />असावे प्रमाण निद्रेमाजी</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
नको बोलू फार नको धरू मौन<br style="box-sizing: border-box;" />करावे भाषण परिमित</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
संयमी जीवन बाणता सहज<br style="box-sizing: border-box;" />स्वामी म्हणे तुज योग-सिद्धी</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
<br /></div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; overflow-wrap: break-word;">
- प. पू. स्वामी स्वरूपानंद (पावस)</div>
</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-39470770302010300752020-04-10T04:56:00.000-07:002021-05-11T07:16:35.906-07:00विभाग ४ - ध्यान आणि योग - प्रकरण ११ - मंत्र, जप आणि नामस्मरण<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
या प्रकरणात मंत्र, जप तसेच नामस्मरणाविषयीचे भगवान श्री रमण महर्षींचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत.<br />
<br />
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:<br />
<br />
दीक्षा देत असताना सद्गुरूंनी शिष्याला प्रदान केलेल्या एखादा शब्दाला किंवा श्लोकालाच मंत्राचे स्वरूप प्राप्त होते. सद्गुरूंना घडलेल्या साक्षात्कारातून किंवा त्यांनी केलेल्या ध्यानधारणेतून त्यांच्याजवळ अध्यात्मिक शक्तीचा जो संचय झालेला असतो, त्यापैकी काही भाग मंत्रस्वरूपात शिष्याकडे संक्रमित केला जातो. शिष्याने सातत्याने त्या मंत्राचा जप करण्याकडे लक्ष दिले, तर सद्गुरूंची शक्ती अशा प्रकारे कार्यरत होते; जेणेकरून शिष्याला आत्मसाक्षात्काराचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रगती करताना ती सातत्याने मदत करत राहते. रमण महर्षींना या मार्गाची वैधता मान्य असली तरी त्यांनी स्वत: औपचारिक पद्धतीने दीक्षा देण्याची उदाहरणे अपवादात्मकच आहेत. महर्षींनी दीक्षा देताना मंत्रोपदेश केल्याचेही दिसून येत नाही. त्याचवेळी एक गोष्ट लक्षात घ्यावीच लागेल की नामस्मरणाचा उल्लेख मात्र महर्षी अत्यंत आदरपूर्वक करत असत. भक्ती आणि समर्पणाचा मार्ग स्वीकारलेल्या साधकांसाठी नामस्मरण हे अत्यंत उपकारक असे साधन आहे असे आग्रही प्रतिपादन महर्षी करत असत.<br />
<br />
समर्पणाच्या मार्गावर या विश्वाचे संचालन करणारी सगळी जबाबदारी वाहणारी एक अव्याख्य अशी उच्चतर शक्ती आहे, तसेच व्यक्तिगत 'मी' ला जगाच्या व्यापारात नगण्य स्थान आहे हे भान निरंतर ठेवावे लागते. साधकांच्या जीवनात अशा वृत्तीची जोपासना व्हावी या दृष्टीने जप अत्यंत परिणामकारक ठरतो असे प्रतिपादन महर्षी करत असत. व्यक्तिगत 'मी' चे तसेच इंद्रियगोचर बाह्य जगताविषयीचे भान हरपून त्या ऐवजी ईश्वरी शक्तीचे अनुसंधान घडत रहावे या दृष्टीने जप आणि नामस्मरणाचे महत्व अनन्यसाधारणच आहे.<br />
<br />
सुरूवातीच्या काळात नामस्मरणाचे स्वरूप ध्यानस्थ होण्यासाठी किंवा एकाग्रता साधण्यासाठी प्रयत्नपूर्वक चालवलेला अभ्यास असे असते. नामस्मरणाचा सातत्याने सराव केल्याने कालांतराने साधकाला कळत नकळात अशी एक स्थिती प्राप्त होते जिथे प्रयत्न न करताच नामस्मरण सतत आणि आपोआप होत राहते. ही स्थिती प्राप्त करण्यासाठी ज्या दैवताचे नामस्मरण सुरू असते त्या इष्टदैवताला सर्वभावे शरण जावे लागते. निव्वळ एकाग्रतेने ती साध्य करता येत नाही. महर्षींचे असे मत होते की परिणामकारक पद्धतीने नामस्मरण करायचे असेल तर आपल्या दैवताला मनोभावे आणि आंतरिक तळमळीने साद घालणे तसेच अनन्य भावाने त्या दैवताच्या पायी शरणागत होणे अनिवार्य आहे. अनन्य भावाने शरणागती साधली की मग इष्टदेवतेचे नाम त्या साधकाची साथ कधीच सोडत नाही.<br />
<br />
नामस्मरणाच्या प्रगत अवस्थांबद्दल बोलत असताना महर्षींनी वर्णन केलेल्या संकल्पनांमधे गूढरम्यतेचे वलय स्पष्टपणे दिसून येत असे. ईश्वराचे नाम आणि साधकाचे आत्मस्वरूप एकच गोष्ट आहेत असे महर्षी सांगत असत; तसेच त्या पुढे जात आत्मसाक्षात्कार घडल्यानंतर साधकाच्या हृदयात (अंतर्यामी) साधकाचे इष्टदैवतच स्वत:चा जप करत राहते आणि साधकाला कुठलेही सायास पडत नाहीत असेही महर्षी सांगत असत (उदा. राम हमारा जप करे, हम बैठे आराम - संत कबीर दासजी). जपाचे साधन 'स्व' विषयीच्या जागृतीत (स्वसंवेद्यता) विलीन होईल तेव्हाच ही स्थिती प्रात होते असा निर्वाळा महर्षी देत असत. नामस्मरण ते स्वसंवेज्ञता असे अवस्थांतर घडणे किती आवश्यक आहे हे सांगताना चौदाव्या शतकातला कार्यकाल असलेल्या महाराष्ट्रातल्या संत नामदेवांच्या एका वचनाचा ते आदराने उल्लेख करत असत. त्या वचनाचा असा अर्थ होतो - "'मी' च्या सत्य स्वरूपाची ओळख पटली तरच नामाच्या सर्वव्यापकतेचा बोध होणे संभवते. जोवर 'मी' विषयीचा यथार्थ बोध होत नाही, तोवर नामाच्या सर्वव्यापी सत्तेची अनुभूती यावी हे संभवतच नाही". संत नामदेवांचे नामस्मरणाची महती सांगणारे एक पुस्तक १९३७ साली महर्षींच्या वाचनात आले. महर्षींच्या पलंगाजवळ असलेल्या पुस्तकांच्या छोट्या कपाटावर सहज हाती येईल अशा जागी त्या पुस्तकाची एक प्रत महर्षींनी ठेवली. ही प्रत आयुष्याच्या शेवटच्या १३ वर्षांच्या कालखंडात महर्षींनी तिथून कधीच हलवली नाही. जप किंवा नामस्मरणाविषयी आश्रमात आलेल्या अभ्यागतांनी प्रश्न विचारले, तर महर्षी नेहेमी त्या पुस्तकातली वचने वाचून दाखवत असत. महर्षींनी कित्येक वेळा या पुस्तकाचे मुक्तकंठाने गुणगान केल्याने तसेच या पुस्तकातले सातत्याने दाखले दिल्याने महर्षी त्यातल्या आशयाशी पूर्णपणे सहमत होते असे म्हणावे तर ते वास्तवाला धरूनच होईल.<br />
<br />
प्रश्नः लोक (निर्गुण निराकार) देवाला नानाविध नावे देतात आणि असे सांगतात की अमुक एक नाम अत्यंत पवित्र आहे. ते असे म्हणतात की नामाची पुनरूक्ती केल्याने साधकाला दैवी वरदान मिळून त्याची अध्यात्मिक प्रगती होते. हे खरे कसे असू शकेल?<br />
रमण महर्षी: यात शंका घेण्याजोगे काय आहे? तुमचेही एक नाव आहे, ज्याला तुम्ही प्रतिसाद देता. मात्र हे अवश्य लक्षात घ्या की जन्माला येताना हे नाव तुमच्या देहावर लिहीलेले नव्हते. तुमच्या देहाने आजवर कुणालाही असे सांगितलेले नाही की अमुक तमुक हे माझे नाव आहे. तरीही तुमचे नामकरण झालेले आहे. त्या नावाशी तुमची ओळख जोडली गेलेली असल्याने तुम्ही त्याला प्रतिसाद देखील देता आहात. याचाच अर्थ असा होतो की त्या नावाचे असे काही ना काही महत्व खचितच आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तुमचे नाव हा निव्वळ कल्पनाविलास आहे असे म्हणता येणार नाही. तद्वतच देवाच्या नावात सामर्थ्य आहे आणि नामस्मरणही परिणामकारक आहे. नामाची पुनरूक्ती केल्याने नाम ज्या गोष्टीचे (इष्टदैवत) महात्म्य दर्शवते तिचे स्मरण साधले जाते. त्यामुळे अध्यात्मिक लाभ होतो हे वेगळे सांगायला नको.<br />
<br />
प्रश्नः (अल्पशिक्षीत असल्याने) मला अध्यात्मशास्त्राची फारशी माहिती नाही. आत्मविचाराची साधनपद्धती मला खूप कठिण वाटते. स्त्री असल्याने आणि त्यातून सात मुलांची आई असल्याने माझ्यावर घरकामाचे मोठे ओझे आहे. प्रपंचातच सगळा वेळ जात असल्याने मला ध्यानधारणेसाठी उसंत मिळत नाही. माझी भगवानांना विनंती आहे की त्यांनी मला साधी सुलभ अशी एखादी साधना सुचवावी.<br />
रमण महर्षी: आत्मसाक्षात्कार घडावा या साठी कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करणे किंवा शास्त्रवचनांचे ज्ञान असण्याची गरज नाही. आपले रूप न्याहाळण्यासाठी आपल्याला फक्त एक आरसा पुरेसा असतो, तसेच आत्मसाक्षात्काराचे देखील आहे. विद्वानांना देखील शेवटी जन्मभर गोळा केलेल्या सगळ्या पुस्तकी ज्ञानाचे गाठोडे ते 'अनात्मस्वरूप' आहे हा बोध झाल्यावर अडगळीत टाकून द्यावे लागते. प्रापंचिक कामे करण्याने किंवा मुलाबाळांची काळजी वाहण्याने अध्यात्मिक प्रगतीत विघ्नच यावे असा कुठलाही नियम नाही. "मी कोण आहे" ही साधना शिकवत असताना मी सल्ला देतो त्याप्रमाणे तुम्ही इतर कुठलीही साधना न करता फक्त (जाणीवेच्या उगमस्थानाकडे जमेल तेव्हा जमेल तितके अवधान देत) 'मी आहे' 'मी आहे' असे सतत पुटपुटत राहिलात तरी ते पुरेसे आहे. तेलाची अखंड धार पडावी तसे सातत्याने हे स्मरण करत राहिलात तर तुम्ही आपोआप साक्षात्कारी स्थितीपर्यंत पोचाल. प्रपंचातले कुठलेही काम हातावेगळे करत असताना, अगदी उठता बसता प्रत्येक क्षणी हे स्मरण सतत होत राहिले पाहिजे. 'मी आहे' ही जाणीव (अहंस्फुरणा किंवा शुद्ध चैतन्य) हेच देवाचे खरे नाव आहे. सगळ्या मंत्रांपैकी हा प्रथम क्रमांकाचा आणि सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. प्रणवाची महती देखील या मंत्रापुढे दुय्यम स्वरूपाची आहे.<br />
<br />
प्रश्नः वाचेने स्पष्ट उच्चार करत (प्रणवाचा किंवा एखाद्या मंत्राचा) जप केल्याने काहीच लाभ मिळत नाही का?<br />
रमण महर्षी: स्पष्ट उच्चार करत केलेल्या जपाने काहीच लाभ होणार नाही असे कोण म्हणेल? असा जप खात्रीपूर्वक चित्तशुद्धी करण्याच्या कामी येईल. सातत्याने जप साधना करत राहिल्यास तो प्रयत्न एका प्रगल्भ अवस्थेपर्यंत पोचतो आणि कमी अधिक काळाने का होईना साधकाला योग्य मार्गावर आणून सोडतो. अशी पक्की खात्री बाळगा की भले असो की बुरे, तुम्ही जे काही करता ते वाया कधीच जात नाही. मात्र प्रत्येक साधकाचा पिंड तसेच तो परिपक्वतेच्या कुठल्या अवस्थेत आहे हे लक्षात घेत त्याला कर्म, अकर्म इत्यादिंचे भेद तसेच तो करत असलेल्या साधनपद्धतीमधले गुण आणि दोष सद्गुरूंना त्याला स्पष्ट शब्दात सांगावे लागतात.<br />
<br />
प्रश्नः कुठल्याही व्यक्तीने सहजच जाता येता एखादा पवित्र मंत्र निवडला आणि त्याचा जप सुरू केला तर त्याचा काही फायदा होतो का?<br />
रमण महर्षी: नाही. एक तर त्या व्यक्तीची तशी पात्रता असायला हवी आणि तिला सुपात्र सद्गुरूंकडून मंत्रदीक्षा मिळायला हवी.<br />
<br />
राजा आणि प्रधानाच्या एका गोष्टीमधून हा मुद्दा स्पष्ट होईल. एकदा एक राजा अचानक आधी न कळवता त्याच्या प्रधानाच्या घरी सदिच्छा भेटीसाठी गेला. तिथे गेल्यावर त्याला असे सांगण्यात आले की प्रधान जप करण्यात व्यग्र असल्याने राजाला थोडा वेळ प्रतिक्षा करावी लागेल. थोड्या वेळाने प्रधानाची भेट झाल्यावर राजाने कुतुहलाने प्रधानाला विचारले की तो नेमक्या कुठल्या मंत्राचा जप करत होता. प्रधानाने उत्तर दिले, की तो सगळ्यात पवित्र अशा गायत्री मंत्राचा जप करत होता. ते ऐकून गायत्री मंत्राची दीक्षा द्यावी अशी राजाने प्रधानाला गळ घातली. प्रधानाने मात्र विनम्रपणे नकार देत असे सुचवले की मंत्र दीक्षा देण्याची पात्रता प्रधानाच्या अंगी नव्हती. राजाने ते मान्य केले. तो विचार मनात सतत घोळत राहिल्याने राजाने एका विद्वान व्यक्तीकडून गायत्री मंत्राचे उच्चारण शिकून घेतले. प्रधानासोबतच्या पुढच्या भेटीतच राजाने गायत्री मंत्राचे पठण करून दाखवत प्रधानाला विचारले की एखादी चूक होत असेल तर प्रधानाने ती नि:संकोचपणे दाखवून द्यावी. प्रधानाने उत्तर दिले की मंत्रोच्चारण तर अगदी बिनचूक आहे, मात्र राजाने आपल्या मनाने मंत्र जप आरंभणे उचित नाही. राजाला ते पटले नाही. त्याने खोदून खोदून विचारले तरीही प्रधानाने उत्तर देताना टाळाटाळ केली.<br />
<br />
उतावीळ झालेल्या राजाने उत्तर मिळायलाच हवे असा दबाव टाकल्यावर प्रधानाने एक युक्ती केली. त्याने जवळ उभ्या असलेल्या शिपायाला आज्ञा दिली, की शिपायाने राजाच्या मुसक्या आवळाव्या आणि त्याची रवानगी तुरूंगात करावी. शिपाई जागचा हलला नाही. शिपायाचे ते वर्तन पाहून प्रधान पुनःपुन्हा अधिकाधिक जोराने तीच आज्ञा देत राहिला, मात्र शिपायाने तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. हा प्रकार असह्य झाल्याने राजाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. संतापाच्या भरात राजाने शिपायाला आज्ञा दिली की प्रधानाच्या मुसक्या आवळाव्या आणि त्याची रवानगी तुरूंगात करावी. शिपायाने तत्क्षणी प्रधानाला जेरबंद केले.<br />
<br />
प्रधान जोरजोरात हसायला लागला. त्याने राजाला विचारले की तुम्हाला हवे ते स्पष्टीकरण मिळाले का? राजा बुचकळ्यात पडला. त्याने विचारले की प्रधांनजींना नेमके काय सांगायचे आहे. प्रधानाने उत्तर दिले, "आज्ञा तंतोतंत तीच होती आणि आज्ञेचे पालन करणारी व्यक्तीदेखील तीच होती. मात्र आज्ञा देत असलेल्या व्यक्तीच्या अधिकारात फरक होता. हे राजन, मी आज्ञा दिली, तेव्हा ती पूर्णपणे निष्फळ ठरली. मात्र तीच आज्ञा आपण दिलीत, तेव्हा तत्क्षणी तिचे पालन केले गेले. मंत्रदीक्षेच्या बाबतीत देखील हाच नियम लागू होतो."<br />
<br />
पुरवणी:<br />
भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवंतांच्या विभूतींविषयीचे विवेचन आहे. भगवद्गीता १०.२५ या श्लोकात 'यज्ञानां जपयज्ञोSस्मि' - सर्व प्रकारच्या यज्ञांमधे जपयज्ञ ही माझी विभूती आहे असा स्पष्ट उल्लेख आहे.<br />
<br />
नाथपंथी ध्यानयोग (लेखक:- प. पू. श्री. दादा आंबेकर - नाशिकचे नाथपंथी गुरूदेव श्री गजानन महाराज यांचे शिष्य, प्रकाशकः सोहम प्रकाशन, सातारा) या पुस्तकात सोहम साधनेतील मंत्रजप तसेच नामस्मरणाची महती सांगणारी तसेच सविस्तर माहिती देणारी पाच प्रकरणे आहेत. जिज्ञासूंसाठी हा सगळा भाग मुळातून वाचण्यासारखा आहे. विस्तारभयास्तव पुस्तकातला नाममहात्म्याविषयीचा संतजनांनी मोजक्याच शब्दात दिलेला अभिप्राय नमूद करून लेखाची सांगता करतो.<br />
<br />
सद्गुरूंना साक्षात्कार झाल्यावर ते ब्रह्मरूप होतात. त्यामुळे त्यांनी दिलेल्या नामात अगाध शक्ती असते. त्यांना संकल्पशक्तीने शिष्याला जे सामर्थ्य द्यायचे असते ते देता येण्यासाठी आधार किंवा वाहक या स्वरूपात ते नामाचा उपयोग करतात. अशा नामाला 'सबीज' नाम असे म्हणतात (उदा. जपे हरिनाम बीज। तोचि वर्णामाजी द्विज॥ तुका म्हणे वर्णधर्म। अवघे आहे सम ब्रह्म ॥ - संत तुकाराम)<br />
<br />
नामेचि सिद्धि, नामेची सिद्धी|<br />
व्यभिचार बुद्धि, न पावता ||<br />
- संत तुकाराम<br />
<br />
अठरा पुराणांच्या पोटी |<br />
नामावीण नाही गोष्टी ||<br />
- संत नामदेव<br />
<br />
सार सार सार, विठोबा, नाम तुझे सार|<br />
म्हणोनि शूळपाणि जपताहे निरंतर ||<br />
- संत ज्ञानदेव</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-3750027193698748602020-04-10T04:51:00.000-07:002021-05-11T07:17:49.899-07:00विभाग ४ - ध्यान आणि योग - प्रकरण १० - ध्यान आणि एकाग्रता <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण १० - ध्यान आणि एकाग्रता<br />
<br />
या प्रकरणात ध्यान आणि ध्यानधारणेसाठी आवश्यक असणारी एकाग्रता या दोन गोष्टींविषयीचा भगवान श्री रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.<br />
<br />
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:<br />
<br />
रमण महर्षींचे असे मत होते, की जागृती, निद्रा आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमधे ज्यात सातत्य राखता येते तेच ध्यान सर्वश्रेष्ठ असते. असे सातत्य येण्यासाठी 'मी ध्यान करतो आहे' असा विचारतरंगदेखील मनात उमटू नये इतकी उत्कटता ध्यानधारणेत असावी लागते.<br />
<br />
योगाविषयी महर्षींचे मत थोडक्यात असे सांगता येईल - नानाविध विभ्रमांच मूळ कारण असलेल्या इंद्रियगोचर ज्ञानाचा पगडा क्षीण होत गेला, त्या पलीकडच्या अनुभूतीची गोडी लागली, आणि त्या योगे सतत उसळून येत असलेली अहंता आणि विषयांचा लळा लागलेल्या मनावर पूर्ण ताबा मिळाला, की साधकाच्या अंतःकरणात 'शब्देविण संवादु' अशा अनाहत नादाची आणि दिव्य अशा तापहीन प्रकाशाची अनुभूती येते. योगाची खरी शक्ती हीच आहे.<br />
<br />
द्वैताचा अंतर्भाव असलेल्या एखाद्या ध्यान किंवा उपासनापद्धतीकडे कल असलेल्या आणि आत्मविचाराकडे ओढा नसलेल्या साधकांची श्रद्धा डळमळू नये, त्यांचा बुद्धिभेद होऊ नये या दृष्टीने रमण महर्षी अशा साधकांना त्यांनी निवडलेल्या मार्गावरून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत असत. ते साधकांना आश्वस्त करत असत की त्यांनी निवडलेला मार्ग देखील त्यांना आत्मसाक्षात्कारापर्यंत घेउन जाईल. दिशाहीन असण्यापेक्षा कुठलीही ध्यान/ उपासना पद्धती स्वीकारणे श्रेयस्कर असते, कारण ती शेवटी आत्मविचारापर्यंतच पोचते असे महर्षींचे ठाम मत होते.<br />
<br />
प्रश्नः वैषयिक सुखांपेक्षा ध्यानात अधिक सुख मिळते. असे असूनही मन ध्यानाकडे आकृष्ट न होता विषयांकडेच ओढले जाते. असे का घडते?<br />
रमण महर्षी: सुखसंवेदना आणि वेदना या मनाच्याच दोन अवस्था आहेत. आपला मूळ स्वभाव मात्र सच्चिदानंद स्वरूप आहे. देह आणि मनाशी तादात्म्य साधल्याने तेच आपले खरे स्वरूप आहे असा भ्रम झाल्याने आपल्याला मूळ स्वरूपाचा विसर पडलेला आहे. ही हरवलेली ओळखच सगळ्या हालअपेष्टांना जन्म देते. स्वतःचीच ओळख हरवलेल्या या परिस्थितीत ती परत मिळवण्यासाठी आपल्याला काय करता येईल? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. मनाची ही प्रवृत्ती खूप पुरातन असते. कित्येक जन्म लोटले तरी विचारांच्या तंद्रीत हरवलेल्या माणसाने हातात धरलेल्या पुस्तकाची पाने एक एक करून उलटावी तशी ती मागील पानावरून पुढे सुरू राहते. काळ लोटेल तशी ही प्रवृत्ती अधिकाधिक खोलवर रूजत जाते आणि मजबूत होत जाते. मूळ स्वरूपाने स्पष्टपणे प्रकट व्हावे, त्याची प्रचिती यावी या दृष्टीने मनाच्या या प्रवृत्तीचा येनकेनप्रकारेण अंत करावा लागतो.<br />
<br />
प्रश्नः भगवान, मी जेव्हा जेव्हा ध्यान करतो तेव्हा मला मस्तकात आगीचे लोळ उठल्यासारखे वाटते. तिकडे दुर्लक्ष करून अट्टाहासाने तसेच ध्यान करत राहिले, तर माझ्या सगळ्या शरीराची लाहीलाही होते. यावर काय उपाय आहे?<br />
रमण महर्षी: मेंदूचा वापर करून एकाग्रता साधली तर जळजळ होण्याची अनुभूती येते आणि पुढे असह्य डोकेदुखी मागे लागते. अंतःकरणापासून (उपास्य देवतेशी) साधलेली एकतानताच शीतलता प्रदान करणारी आणि उत्साहवर्धक असते. गात्रे शिथील केलीत तर तुमच्या ध्यानात सहजता येईल. सौम्यपणे तसेच कुठलाही तणाव न घेता सतत घुसखोरी करणारे विचारतरंग हळुवारपणे दूर सारत मनाला स्थिर करत रहा. तुम्ही लवकरच त्यात यशस्वी व्हाल.<br />
<br />
प्रश्नः ध्यान करत असताना झोप लागू नये या साठी मी काय करायला हवे?<br />
रमण महर्षी: तुम्ही झोप येऊ नहे असा प्रयत्न करत असाल तर ध्यान साधताना तुम्ही बौद्धिक विचार करत आहात असा त्याचा अर्थ होतो. ध्यान करताना बौद्धिक विचार करणे थांबवता येणे महत्वाचे आहे. ध्यान करत असताना तुम्ही नकळत निद्रादेवीच्या आधीन झालात तर तुमचे ध्यान निद्रावस्थेत असताना तसेच जागे होत असतानाही सुरूच राहील. तरीही, अखंड सुरू राहिलेला तो एक प्रकारचा विचारच असल्याने जागृत आणि सजग अवस्थेत विचाराचा गोंगाट मागे पडून अंतिम सहजस्थिती प्राप्त करता यावी या दृष्टीने शेवटी अशा योगनिद्रेपासूनही मुक्ती मिळवावी लागते. निद्रा आणि जागृती ही निव्वळ तुमच्या विचारांच्या गोंगाटापासून मुक्त असलेल्या स्वरूपाच्या शुभ्र पडद्यावर उमटणारी चित्रे आहेत. तुम्ही दखल घेतली नाहीत तरी ती तशीच ये जा करत राहतील.<br />
<br />
प्रश्नः मी कशावर ध्यान करावे?<br />
रमण महर्षी: अशी कुठलीही गोष्ट जी तुम्हाला भावते आणि तुम्ही अन्य गोष्टींपेक्षा तिला सहजतेने प्राधान्य देऊ शकाल.<br />
<br />
प्रश्नः शिव, विष्णु आणि गायत्री हे तितकेच प्रभावी आहेत असे म्हणतात. मी कशावर ध्यान करावे?<br />
रमण महर्षी: कुणीही एक ज्यावर तुमचे सर्वाधिक प्रेम आहे. या सगळ्यांचा प्रभाव समतुल्यच आहे. मात्र एकाच इष्टदैवताशी एकनिष्ठ रहाणे तुमच्या हिताचे ठरेल.<br />
<br />
पुरवणी:<br />
ध्यान कसे करावे तसेच ध्यानधारणेसाठी आवश्यक असलेली एकाग्रता कशी साधावी या दृष्टीने भगवद्गीतेतील सहाव्या अध्यायातील ६.१० ते ६.३२ हे श्लोक तसेच या श्लोकांवरचे संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत केलेले विस्तृत भाष्य अत्यंत मोलाचे आहे. हे भाष्य शब्दशः न घेता त्यातील भावार्थ समजावून घेणे देखील पुरेसे ठरते. भगवद्गीता तसेच ज्ञानेश्वरी आंतरजालावर सहज उपलब्ध असल्याने तसेच ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय यूट्यूबवर श्री. राजेंद्र वैशंपायान यांच्या स्वरात असलेल्या ऑडिओ बुकच्या स्वरूपात सहजगत्या उपलब्ध असल्याने त्याचा इथे समावेश केलेला नाही. </div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-88581461813835564972020-03-24T22:16:00.000-07:002021-05-11T07:18:39.759-07:00विभाग ३ - सद्गुरू - प्रकरण ९ - मौन आणि सत्संग महात्म्य<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
या प्रकरणात आंतरिक मौन तसेच सत्संगाचे महात्म्य या विषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण जाणून घेणार आहोत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
रमण महर्षी साधकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आनंदाने आणि सहजस्फूर्तपणे शाब्दिक उपदेश देत असत. शाब्दिक उपदेश देत असले तरी महर्षी न चुकता एका गोष्टीकडे लक्ष वेधून घेत असत की त्यांची मौनाद्वारे दिली जाणारी दीक्षाच शाब्दिक उपदेशांच्या तुलनेत कित्येक पटीने सामर्थ्यवान आणि थेटपणे परिणाम घडवून आणणारी अशी उपदेश करण्याचीच एक अनोखी पद्धत होती. महर्षींचा 'मौन उपदेश' त्यांच्या देहातून सतत उत्सर्जित होत असलेल्या एका अत्यंत प्रभावशाली अध्यात्मिक शक्तीच्या स्वरूपात दिला जात असे. या मौन दीक्षेचे सामर्थ्य इतके अलोट होते, की महर्षी तिला आपल्या उपदेशाचा सर्वोच्च प्रभावशाली आणि सगळ्यात थेट असा मार्ग मानत असत. मनःसंयम कसा साध्य करावा या विषयी शाब्दिक उपदेशाचा भडिमार न करता ते अगदी सहजगत्या अत्यंत निबीड मौनस्वरूपात असलेल्या एका शक्तीचे उत्सर्जन करत असत. या शक्तीच्या प्रभावामुळे त्यांच्या सान्निध्यात आलेल्या कित्येक साधकांना, अगदी मुक्या प्राण्यांना देखील मनःशांतीची थेट अनुभूती मिळत असे. या शक्तीशी एकतानता साधायला शिकलेल्या कित्येक साधकांनी असे नमूद करून ठेवलेले आहे की त्यांना विनासायास लाभलेली असीम शांती तसेच आपण पूर्णपणे 'स्वस्थ' असल्याची अनुभूती या स्वरूपात महर्षींच्या मौन दीक्षेची प्रचिती येत असे. काही उन्नत अवस्थेतल्या आणि परिपक्व साधकांमधे ही प्रचिती प्रगाढ आणि स्थिर होत गेल्याने त्यांना थेट 'पहावे आपणासी आपण' अशी अनुभूती येत आत्मलाभही घडत असे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
भारतात मौन दीक्षेची एक प्राचीन अशी परंपरा आहे. साक्षात शिवस्वरूप असलेल्या विख्यात गुरू दक्षिणामूर्तिंकडून अशी दीक्षा दिली जात असे. दक्षिणामूर्तिंनी अत्यंत व्युत्पन्न आणि विरक्त असूनही वैचारिक गोंधळात अडकलेल्या चार सनत्कुमारांना मौन दीक्षेद्वारे आत्मलाभ घडवून दिल्याची कथा सर्वज्ञात आहेच. महर्षी नेहेमी दक्षिणामूर्तिंचा अत्यंत आदरपूर्वक उल्लेख करत असत. दीक्षा या विषय निघाला की त्यांच्या संभाषणात दक्षिणामूर्तिंविषयी उल्लेख हमखास येत असत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
आपले ध्यान आत्मस्वरूपावर किंवा रमण सद्गुरूंच्या बाह्य रूपावर केंद्रित केलेल्या कुठल्याही साधकाला या मौन दीक्षारूपी शक्तीचा प्रत्यय घेता येतो. यात स्थळ, काळ आणि परिस्थितीचा अडसर कधीच येत नाही. गुरूकृपेकडे अवधान देण्याच्या क्रियेलाच महर्षी 'सत्संग' असे म्हणत असत. सत्संग या शब्दाचा शाब्दिक अर्थही (मनाने) सद्गुरूंच्या संगतीत राहणे असाच होतो. रमण महर्षी अगदी मनःपूर्वक सत्संग साधनेला अनुमोदन देत असत. ते नि:संदिग्धपणे असे प्रतिपादन करत असत की आत्मानुभूतीचा थेट अनुभव घेण्यासाठीचा सत्संग हा एक अत्यंत सहज आणि सोपा असा जणू राजमार्गच आहे. पारंपारिक दृष्ट्या आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीच्या सहवासात राहणे असा सत्संगाचा अर्थ घेतला गेलेला असला तरी रमण महर्षी मात्र सत्संगाची व्याख्या खूपच विस्तृत अर्थाने घेत असत असे स्पष्टपणे दिसून येते. महर्षी सांगत असत की मन सद्गुरूंच्या किंवा ईश्वराच्या ठायी जडून राहणे हा सत्संगाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, त्यामुळे महर्षी अशी खात्री देत असत की देहधारी सद्गुरूंच्या किंवा एखाद्या बाह्य प्रतिकाच्या सान्निध्यात असल्यानेच सत्संग घडतो असे नव्हे; तर स्थळ, काळ आणि वेळ यांची तमा न बाळगता मनोभावे कुठेही आणि कधीही सद्गुरूंचे स्मरण केलेत, तर तुम्ही सत्संगच साधत असता अशी खात्री बाळगा.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः (वयाच्या सतराव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करून अरूणाचल पर्वतावर वास्तव्य केलेल्या रमण महर्षींनी शेवटचा श्वास तिथेच घेतला. अत्यंत साधे आणि संयत जीवन जगत ते तिथेच राहिले.) भगवान देशोदेशींचा प्रवास करून प्रवचने देत व्यापक अर्थाने मानव समाजाला सत्याचा उपदेश का करत नाहीत?</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
रमण महर्षी: मी तसे करत नाही असे आपल्याला का बरे वाटते आहे? व्यासपीठावर उभे ठाकणे आणि उपस्थितांवर प्रवचनबाजीचा भडिमार करणे अशा पद्धतीने ही शिकवण देता येईला का? खरा उपदेश मौन राहूनच देता येतो, कारण त्यात ज्ञानाचे साधे सोपे असे मनोगत थेटपणे अंत:करणापर्यंत पोचवले जाते. एखाद्या व्यक्तीने चांगली तासभर प्रवचनबाजी ऐकली, आणि तिच्या जीवनाच्या प्रवाहाची दिशा बदलेल असा कुठलाही प्रभाव न पडताच ती तेथून निघून गेली, तर या प्रकाराला आपण काय म्हणाल? उलटपक्षी एखाद्या व्यक्तीने चार मोजकेच क्षण एखाद्या पवित्र सत्पुरूषाच्या उपस्थितीत सत्संगात घालवले, आणि तिच्या दृष्टीकोनात आमूलाग्र बदल होऊन ती तिथून मार्गस्थ झाली ... या दोन्हीत तुलना केली असता अधिक श्रेयस्कर काय आहे? ज्याचा कुठलाच प्रभाव पडत नाही असा पांडित्यपूर्ण उपदेश जोरजोरात करावा की मौन बाळगत आंतरिक शक्तीच्या सामर्थ्याला योग्य दिशेने मार्गस्थ करत रहावे?</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
तुम्ही हे अवश्य लक्षात घ्या, की वाणीचा उगम कसा होतो? सुरूवात नेहेमी अमूर्त अशा ज्ञानापासून होते. त्यातून अहंभाव निर्माण होतो, अहंभाव स्थूल स्वरूपातल्या विचारांना जन्म देतो आणि हे विचारच शब्दरूपात वाचेद्वारे प्रकट होतात. त्यामुळे उच्चारला गेलेला शब्द हा नेहेमीच उगमस्थानी असलेल्या अमूर्त ज्ञानाचा पणतू असतो. शब्दांचा देखील काही प्रमाणात का असेना प्रभाव पडताना दिसतो. तेव्हा आता तुम्ही स्वतःच या गोष्टीचा विचार करा की मौनातून दिला गेलेला उपदेश हा शाब्दिक उपदेशाच्या तुलनेत किती पटींनी प्रभावशाली असेल!</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः मौन इतके सामर्थ्यवान कसे असू शकेल?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीकडून अध्यात्मिक प्रभाव असलेल्या लहरी प्रक्षेपित केल्या जातात, त्यामुळे सत्प्रवृत्त असलेले लोक अशा व्यक्तीकडे आपोआप आकृष्ट होतात. तरीही बाह्यतः मात्र अशी व्यक्ती एखाद्या गुफेत पूर्णपणे मौन अवस्थेत बसलेली दिसू शकते. 'अध्यात्मिक सत्य' या विषयीची प्रवचने आपण हवी तितकी ऐकू शकतो, पण ती ऐकूनही मूळ विषयाला गवसणी घालण्याचा दृष्टीने त्यांचा फारसा उपयोग होत नाही. उलट आपल्या वैचारिक गोंधळात मात्र भर पडते आहे असे लक्षात आल्यावर आपण हात हलवत परत जातो. या उलट आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात आल्याने अशा व्यक्तीने एखादा शब्द देखील उच्चारला नाही तरी मूळ विषयाचे आकलन कित्येक पटीने चांगले होते. आत्मज्ञानी व्यक्तीला कधीच बाहेर पडून लोकानुनय करावा लागत नाही. गरज असेल तेव्हा इतर सत्पात्र व्यक्तींच्या माध्यमातून तिला आवश्यक ते कार्य करवून घेता येते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
गुरू शिष्याला जी शांतता प्रदान करतात, तिच्या योगे आत्मज्ञानाच्या प्रकाशात सारे काही लख्ख उजळून निघते. माया समूळ बेचिराख होऊन शेवटी विशुद्ध ज्ञानच शिल्लक उरते. आत्मसाक्षात्कारी सद्गुरूंची आणि सत्पात्र शिष्याची निव्वळ नजरानजर जरी झाली, तर मग तिथून पुढे बापुडवाण्या शब्दांचे काही कामच उरत नाही.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्न: भगवान दीक्षा प्रदान करतात का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: मौन ही सर्वोत्तम आणि सगळ्यात सामर्थ्यवान दीक्षा आहे. तीच श्री दक्षिणामूर्ति देत असत. स्पर्श, दृष्टी इत्यादि प्रकारांनी दिलेली दीक्षा तुलनेने खालच्या पातळीवरची असते. मौन दीक्षेने साधकांच्या अंतःकरणात आमूलाग्र बदल घडून येतो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
शिष्यगण जेव्हा दीक्षेसाठी प्रार्थना करत, तेव्हा श्री दक्षिणामूर्ति मौन बाळगत असत. दीक्षा देण्याचा हा सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे. त्यात इतर सगळ्या प्रकारांचा समावेश होतो. इतर दीक्षा पद्धतींमधे दाता आणि याचक असे नाते असणे अनिवार्य असते. आधी दात्याने काही द्यावे लागते आणि मग त्याचा याचकाकडून स्वीकार केला जावा लागतो. देणारा आणि घेणारा असे दोघे अस्तित्वात असले तरच एकाने दुसर्याकडे कृपादृष्टी वळवणे, किंवा एकाने दुसर्याला स्पर्श करणे संभवते, नाही का? मौन दीक्षाच सर्वार्थाने परिपूर्ण असते; कृपादृष्टी, स्पर्श, उपदेश अशा सगळ्या गोष्टींचा तिच्यात समावेश होतोच. मौन दीक्षा साधकाला सर्वार्थाने निर्मळ करते आणि तो आपल्या (सच्चिदानंद) स्वरूपात स्थिर होतो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः स्वामी विवेकानंद म्हणतात की अध्यात्मिक गुरू खूप मोठ्या प्रमाणावर अध्यात्मिकतेचे शिष्याकडे हस्तांतरण करू शकतात.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: अध्यात्म ही अशी एखादी वस्तू आहे का जी हस्तांतरित करता यावी? हस्तांतरणाचा खरा अन्वयार्थ असा असू शकतो की शिष्यातल्या अज्ञानाचा निरास करणे. त्याच्या मूळ स्वरूपावर असलेले आवरण दूर करणे. हे कार्य सद्गुरू करतात. मात्र या हस्तांतरणाचा अर्थ असा मात्र खचितच होत नाही की शिष्य ही एक वेगळीच व्यक्ती होती, आणि मग तिचे रूपांतरण होत ती कुणी वेगळीच अलौकिक व्यक्ती झाली.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः (आपण जिचा उल्लेख करता ती) नि:शब्द शक्ती आपले कार्य कसे करते?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: भाषा ही निव्वळ एका व्यक्तीचे विचार इतर व्यक्तींपर्यंत पोचवण्याचे संवादाचे माध्यम आहे. मनात विचार उद्भवतात तेव्हाच ती कामी येते. 'मी आहे' हा विचार सर्वात आधी प्रकटतो आणि मग त्याच्या अनुषंगाने बाकीची विचारशृंखला जन्माला येते. त्यामुळे 'मी आहे' हा विचारच सगळ्या संवादांमागचे मूळ कारण असतो. बौद्धिक विचार न करता एखादी व्यक्ती जेव्हा सच्चिदानंद स्वरूपात स्थिर राहते तेव्हा तिचे इतरेजनांविषयीचे आकलन विश्वव्यापी शांततेच्या माध्यमातून व्हायला सुरूवात होते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
मौनाला सतत काही सांगायचे असते, काही अभिव्यक्त करायचे असते. निरंतर प्रवाही असलेल्या मौनाच्या संततधारेत बोलण्याने व्यत्यय येतो. मी या क्षणी उच्चारत असलेले शब्द देखील मौन संवादातला अडसर बनत आहेत. एक उदाहरण देतो - एखाद्या तारेतून विद्युतप्रवाह खेळत असतो. या प्रवाहात अडथळा निर्माण केला, तर तो पंख्याचा स्वरूपात फिरायला लागतो किंवा दिव्याच्या स्वरूपात प्रकाशमान होतो. तारेत मात्र तो निरंतर विद्युत उर्जेच्या शुद्ध स्वरूपातच गतिमान असतो. तद्वतच मौन हा भाषेचा सतत वाहता असलेला प्रवाह असतो, तो शब्दांनी अवरूद्ध होतो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
कित्येक वर्षे सतत संवाद साधून आणि वितंडवाद घालूनही जे आकळत नाही, सतत हुलकावण्या देत राहते, तेच (अध्यात्मिक सत्य किंवा स्वरूप) मौन अवस्थेत किंवा अंतर्बाह्य मौन असलेल्या सत्पुरूषाच्या पुढ्यात उभे राहिल्यावर क्षणार्धात उमगून जाते. दक्षिणामूर्ति आणि चार सनत्कुमार हे याचे उत्तम उदाहरण आहेत. मौन ही सर्वश्रेष्ठ आणि सर्वोच्च सामर्थ्य असलेली भाषा आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
पुरवणी:<br style="box-sizing: border-box;" />संजीवनी गाथेत प. पू. स्वामी स्वरूपानंदांनी आंतरिक मौनाचे वर्णन असे केले आहे:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
कैचा भक्त कैचा देव |<br style="box-sizing: border-box;" />हरिरूप झाले सर्व ||</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
देव-भक्ता पडे मिठी |<br style="box-sizing: border-box;" />अंतर्बाह्य जगजेठी ||</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
सर्वा ठायी सर्वा घटी|<br style="box-sizing: border-box;" />हरि नांदे पाठी पोटी||</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
एक झाले मी-तू पण |<br style="box-sizing: border-box;" />स्वामी म्हणे भले मौन ||</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
रमण महर्षींनी मुक्तकंठाने गौरवलेला सत्संग साधायचा असेल, तर साधकाची भावदशा कशी असावी याचे वर्णन स्वामीजी असे करतातः</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; overflow-wrap: break-word;">
चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, कल्पांती हि खिन्न होऊ नये<br style="box-sizing: border-box;" />अंतरी असावा अखंड उल्हास, आपत्तीचा त्रास मानू नये<br style="box-sizing: border-box;" />संसारी रहावे अलिप्त उदास, मोहे माया-पाश जोडू नये<br style="box-sizing: border-box;" />स्वामी म्हणे व्हावा ईश्वरी विश्वास, संतांचा सहवास सोडू नये<br style="box-sizing: border-box;" />-- प. पू. स्वामी स्वरूपानंद (संजीवनी गाथा)</div>
</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-89514832775347655152020-03-06T22:34:00.004-08:002021-05-11T07:17:53.919-07:00विभाग ३ - सद्गुरू - प्रकरण ८ - गुरुतत्व <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
या प्रकरणात अध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या असलेल्या तसेच अध्यात्मिक साधकांच्या जीवनात निर्णायक भूमिका निभावत आलेल्या गुरूतत्वाविषयी भगवान श्री रमण महर्षींचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
रमण महर्षी नेहेमी सांगत असत की ईश्वर, सद्गुरू आणि आत्मा यात कुठलाही भेद नाही (ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने, व्योमवद् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः). ते असा निर्वाळा देत असत की वाघाच्या जबड्यात सापडलेले सावज जसे कधीच पलायन करू शकत नाही, तद्वतच एखाद्या भाग्यवंतावर सद्गुरूंचा कृपाकटाक्ष पडला की मग कुठल्याही परिस्थितीत सद्वुरू त्याला अंतराय देत नाहीत. भक्ताचे इहपरलोकी रक्षण करण्याची जबाबदारी ते आपल्या शिरावर घेतात. असे असले तरी साधकानेही न चुकता आणि एकाग्र निष्ठेने गुरूपदिष्ट मार्गाचे अनुसरण करावेच लागते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
आपल्याकडे गुरूपद नाही आणि आपले कुणीही शिष्य असा महर्षींचा दृष्टीकोन असला तरी शिष्यवर्गाच्या दृष्टीने मात्र ते करूणेचा आणि कृपेचा अथांग सागरच होते. एखादा शिष्य छोट्या आकाराचे भांडे घेऊन जाईल, तर एखाद्यात सगळ्या सागरालाच रिचवण्याची क्षमता असेल. हे लक्षात घेता ज्याची जितकी क्षमता आहे तितके कृपादान त्याच्या पदरी पडेल असेच म्हणावे लागेल. सागराने कृपणता दाखवली अशी तक्रार करणे हा खरे तर एक प्रकारचा नादानपणाच नाही का?</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
चित्ताचा क्षोभ तात्पुरता का होईना निवळण्यासाठी संतांच्या सहवासात राहणे हा एक हमखास परिणामकारक ठरणारा उपाय आहे. समाधी साधनात संत निष्णात झालेले असतात, नव्हे तीच त्यांची विनासायास आणि अखंड टिकून राहणारी सहजस्थिती झालेली असते. अशा सत्पुरूषांविषयी जिव्हाळा वाटणे आणि त्यांच्या सान्निध्यात राहणे ज्यांना आवडायला लागते, असे शिष्यदेखील शनै: शनै: त्यांच्या समाधीस्थ जगण्याची सवय अंगी बाणवायला लागतात.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
महर्षी नेहेमी असे सांगत असत की गुरू अंतर्यामी आहे आणि बाहेरही आहे. त्यामुळे गुरूकृपा दोन प्रकारे काम करते. बाहेर असलेले गुरू उपदेश देण्याचे तसेच त्यांच्या सामर्थ्याने शिष्याला आत्मनिष्ठ होण्यासाठी सक्षम बनवण्याचे कार्य करतात. अंतर्यामी असलेले गुरूतत्व जागृत झाले, की ते शिष्याच्या मनाला त्याच्या उगमस्थानाकडे परत वळवतात, तिथेच स्थिर करतात आणि शेवटी सच्चिदानंद निजस्वरूपात मनोलय घडवून आणतात.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
रमण महर्षींच्या उपदेशातले एक मूलभूत तत्व असे आहे की आत्मलाभ व्हावा अशी ईच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला गुरू लाभणे अनिवार्य आहे. सद्गुरू मनुष्य देहधारीच असणे मात्र अनिवार्य नाही. (रमण महर्षींसारख्या दुर्मिळ उदाहरणांमधे गुरू मनुष्य देहधारी नसतात. शिवस्वरूप मानला गेलेला अरूणाचल पर्वत महर्षींना गुरूस्थानी होता). रमण महर्षी नेहेमी असे निदर्शनास आणून देत असत की आत्मलाभ व्हावा अशी आत्यंतिक तळमळ ज्याच्या ठायी नाही अशा शिष्याला आत्मसाक्षात्कार घडवण्याचे सामर्थ्य कुठल्याही सद्गुरूंपाशी नसते. एखाद्या साधकाने/ साधिकेने गांभिर्याने आणि आंतरिक तळमळीने आत्मशोध सुरू केला, की गुरुकृपेचा आणि गुरूंच्या सामर्थ्याचा ओघ आपोआप त्याच्या/ तिच्या दिशेने प्रवाहित होतो. मात्र साधकाने/ साधिकेने कुठलाही प्रयत्न केला नाही, तर सद्गुरू देखील असहाय्य ठरतात.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः गुरूकृपा कशी असते? गुरूकृपेने आत्मसाक्षात्कर कसा घडून येतो?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: गुरू आणि आत्मस्वरूप एकच असते. आपल्याला जे काही मिळाले आहे त्यात समाधान न वाटल्याने एखाद्याचे मन उद्विग्न होते. अशी व्यक्ती आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाची करूणा भाकायला लागते. मनोभावे केलेल्या प्रार्थनेत असलेल्या अंगभूत सामर्थ्यामुळे अशा व्यक्तीची हळूहळू चित्तशुद्धी व्हायला लागते. ओघानेच पुढच्या टप्प्यावर अशा साधकाची प्रार्थना ईश्वरी साक्षात्काराच्या तळमळीत परिणत होते. आपल्या ऐहिक वासनातृप्तीकरता न राहता अशा भक्ताची प्रार्थना अहेतुकपणे आणि फक्त ईश्वरी कृपा संपादन करण्यासाठी होत जाते. हे साध्य झाले की ईश्वरी कृपा हळूहळू प्रकट व्हायला लागते. ईश्वरच मानवी देहाच्या स्वरूपात अशा शिष्याच्या संपर्कात येतो. आपल्या सहवासात त्याची चित्तशुद्धी घडवून आणतो आणि अंती त्याला आपल्या सत्यस्वरूपापर्यंत घेऊन जातो. भक्ताचे मन सामर्थ्यवान होते आणि त्याची अंतर्मुख होण्याची क्षमता वाढायला लागते. अंतर्यामी असलेले गुरूतत्व अशा वेळी मनाला त्याच्या उगमाकडे खेचून घेते आणि मन शांतवावे या साठी मदत करते. हीच गुरूकृपेची महती आहे. खरे तर ईश्वर, गुरू आणि आत्मा यात कुठलाही भेद मुळातच नसतो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः (साधकाने) सद्गुरूंचा शोध कसा घ्यावा?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: अनादि अनंत असलेला परमेश्वरच त्याच्यावर प्रीती जडलेल्या भक्ताविषयी करूणा वाटल्याने कृपावंत होत (गुरूस्वरूपात) भक्ताची प्रगल्भता लक्षात घेत त्यानुसार भक्तासमोर प्रकट होतो. आपण स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत अशी भक्ताची धारणा असल्याने दोन देहधारी व्यक्तींमधल्या इतर नातेसंबंधांप्रमाणेच गुरू शिष्य या नात्याची त्याला अपेक्षा असते. पण मूर्तिमंत ईश्वर किंवा आत्मस्वरूपच असलेले सद्गुरू 'आतून' काम करायला लागतात. ते शिष्याला त्याने अवलंबलेल्या मार्गातल्या चुकांची जाणीव करून देतात. त्याला सन्मार्गावर आणण्यासाठी मार्गदर्शन करतात, तसेच त्याला अंतर्यामी स्वरूप साक्षात्कार होईपर्यंत त्याची पाठ सोडत नाहीत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः खरे सद्गुरू कोणत्या गुणांवरून ओळखता येतात?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: अविचल असणारी आत्मनिष्ठा, 'जीव हेच ब्रह्म' आहे या दृष्टीने सगळ्या भूतमात्रांकडे पाहणे (सर्वत्र समबुद्धयः) तसेच स्थळ, काळ आणि परिस्थिती कशीही असली तरी त्यामुळे न ढळणारे धैर्य आणि स्थितप्रज्ञता.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः नानाविध मार्गांचा उपदेश करणारे कित्येक अध्यात्मिक गुरू या जगात आहेत. एखाद्याने आपले सद्गुरू कोण हे कसे ठरवावे?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: तुमच्या जेव्हा लक्षात येते की अमुक एक सद्गुरूंच्या सान्निध्यात असताना आपल्याला विनासायास मनःशांती मिळते तेव्हा त्या सद्गुरूंचा स्वीकार करा.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः ते काय उपदेश करतात हे देखील लक्षात घ्यायला नको का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: (ज्याला आत्मज्ञानाव्यतिरिक्त काहीही नको आहे अशा) एखाद्या प्रबळ मुमुक्षा असलेल्या सच्च्या साधकाला तुम्ही अमुक करा आणि तमुक करा असे सांगतात ते खरे सद्गुरूच नव्हेत. असा साधक आधीच आपल्या क्रियाकलापांमुळे पिडीत आणि व्यथित झालेला असल्याने त्याला मन:शांती आणि विश्रांत अवस्थेची नितांत गरज असते. वेगळ्या शब्दात सांगायचे तर त्याला नैष्कर्म्य स्थितीची ओढ असते. तो आधीच करत असलेल्या ढीगभर कर्मकटकटींमधे भर घालत किंवा त्यात बदल करून त्या ऐवजी काही पर्यायी क्रियाकलाप करायला त्याने उद्युक्त व्हावे असे जर सद्गुरू सांगतील, तर अशाने त्या साधकाला काय फायदा होणार आहे?</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
(कर्ता भावाने केलेले) कर्म ही निर्मितीची प्रक्रिया असते. ती आपल्या अंतरी असलेल्या मूळच्या निर्भेळ आनंदाचा विनाश करणारीच ठरते. त्यामुळे क्रियाकलापांची वकिली करणारा मार्गदर्शक हा सद्गुरू नसून तो आत्मघाताला प्रवृत्त करणारा गुन्हेगारच ठरतो. अशा परिस्थितीत उत्पत्तीचे कारण असलेले ब्रह्मदेव किंवा साक्षात यमराजच वेषांतर करून सद्गुरूंच्या रूपात तुम्हाला चकवा देत आहेत असेच म्हणावे लागेल. असे तथाकथित सद्वुरू साधकाला मुक्त तर करूच शकणार नाहीत, उलट (त्यांच्या उपदेशाचे पालन केल्याने) साधकाच्या गळ्याभोवतीचा कर्मबंधाचा फास आणखी आवळला जाईल.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः मी माझे सद्गुरू कसे शोधू?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: उत्कटपणे ध्यान साधना करा (सद्गुरूकृपेची घटना आपोआप घडेल, सद्गुरूंची ओळख आतून पटेल).</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः सद्गुरूकृपा झाल्याची चिन्हे किंव लक्षणे काय असतात?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: गुरूकृपेबद्दल तर्क किंवा बौद्धिक विचार करता यावा किंवा शब्दात व्यक्त करता यावी अशी ती बाबच नाही. ती विचारांच्या आणि शब्दांच्या पल्याडची गोष्ट आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः तसे असेल, तर गुरूकृपेने शिष्याला त्याच्या मूळ स्वरूपाची ओळख होते किंवा आत्मलाभ घडून येतो असे का म्हणतात?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: एखाद्या मदोन्मत्त गजराजाच्या स्वप्नात सिंह यावा आणि त्याने दचकून जागे व्हावे असा तो प्रकार आहे. स्वप्नात का होईना आपल्या नजरेसमोर सिंह उभा ठाकल्यावर हत्ती एकदम सावध होतो आणि त्याला जाग येते, तसेच सद्गुरूंचा अत्यंत सामर्थ्यशाली कृपाकटाक्ष पडल्यावर अज्ञानाच्या अंधःकारात खितपत पडलेल्या आणि गाढ झोपी गेलेल्या शिष्याला जाग येते आणि आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचे दर्शन घडल्याने त्याला खरे ज्ञान प्राप्त होते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः जे. कृष्णमूर्ति असे म्हणतात की कुठल्याही गुरूंची आवश्यकता नसते.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: हा निष्कर्ष त्यांनी कुठल्या आधारावर काढला? आत्मसाक्षात्कारानंतर जर कुणी असे म्हणत असेल तर ते कदाचित योग्य ठरेल, पण त्या आधी खचितच नाही.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः योगी अरविंद आणि इतर काही जण असे म्हणतात की तुम्हाला कधीच कुणी गुरू नव्हते.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: तुम्ही गुरू कुणाला म्हणता या गोष्टीवर तुम्ही काढलेले निष्कर्ष अवलंबून असतात. गुरू देहधारीच असावेत याची गरज नसते. सद्गुरू दत्तात्रेयांना चोवीस गुरू होते, ज्यात पृथ्वी, जल इ. पंचमहाभूतांचाही समावेश होता. या न्यायाने या जगातली प्रत्येक गोष्ट त्यांना गुरूस्थानी होती.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
गुरू असण्याची नितांत आवश्यकता असते. उपनिषदे म्हणतात, की इंद्रियगोचर भवसागरातून आणि बौद्धिक विचारांच्या जंगलातून एखाद्याला फक्त गुरूच बाहेर काढू शकतात. त्या मुळे गुरू तर आवश्यकच आहेत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः मला असे म्हणायचे आहे की महर्षींना देहधारी गुरू कधीच नव्हते.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: अन्य वेळी माझे देहधारी गुरू असतीलही. (या जन्मीचे म्हणाल तर) मी अरूणाचलाच्या स्तुतीपर कवने रचलेली नाहीत का? गुरू, ईश्वर आणि आत्मा एकच तर आहेत. प्रत्येक साधकची गरज लक्षात घेत ईश्वर मनुष्य स्वरूपात किंवा अन्य स्वरूपात प्रकट होत मनोभावे प्रार्थना करणार्या भक्ताला आत्मलाभ होण्यासाठी मदत करतच असतो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः एका सद्गुरूंशी एकनिष्ठ असताना तुम्ही अन्य गुरूंचा आदर करू शकता का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: गुरू एकच आहेत. ते निव्वळ देहधारी नसून चैतन्यस्वरूप आहेत. तुमच्यातले दोष दूर होत नाहीत तोवर त्यांच्या सामर्थ्याच्या आधाराची आवश्यकता असतेच असते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः काही थोर विभूतींना गुरू नसूनही ज्ञानप्राप्ती कशी झाली?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: काही अत्यंत विरळ्याच आणि अतिशय परिपक्व अशा साधकांच्या समोर ईश्वर निराकार असलेल्या ज्ञानप्रकाशाच्या स्वरूपात लकाकतो आणि तत्क्षणी ते त्यांच्या सत्यस्वरूपाचे ज्ञान करून घेतात.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः मी आपल्या चरणी कायमचा लीन झालेलो आहे. आम्ही ज्याचे अनुकरण करावे असा काही उपदेश भगवान आम्हाला देतील काय? अन्यथा इथून ६०० मैलांवर वास्तव्य करावे लागत असताना आपली मदत आम्हाला कशी मिळू शकेल?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: खरे सद्गुरू अंतर्यामी आहेत (ज्यांचे तुमच्या अस्तिस्त्वाशी तादात्म्य आहे).</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः हे समजण्यासाठी देखील मला सद्गुरूंची गरज आहे.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: ते अंतर्यामी उपस्थित आहेतच.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः मला समोर दिसतील असे गुरू हवे आहेत.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: समोर दिसणारे गुरूच तुम्हाला हे सांगत आहेत की गुरू अंतर्यामी देखील उपस्थित आहेत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः एखाद्या शिष्याला कालांतराने लक्षात आले की आपले गुरू पुरेसे पात्र किंवा सक्षम नाहीत, तर त्यांच्यावर आंधळी श्रद्धा ठेवलेल्या शिष्याची पुढची गती कशी असेल?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: ती प्रत्येक शिष्याच्या गुणवत्तेप्रमाणे वेगवेगळी असते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः एखाद्याला एकापेक्षा अधिक अध्यात्मिक गुरू असावेत का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: गुरू कोण आहेत? शेवटी ते तुमचे आत्मस्वरूपच तर आहेत. साधकाच्या मनाचा अध्यात्मिक विकास होत असताना मधे ज्या अवस्था येतात त्या प्रमाणे बाह्य गुरू या स्वरूपात आत्माच तर प्रकट होत असतो. असे म्हणतात की सगळ्या साधकांना वंदनीय आणि अत्यंत प्रिय असलेल्या प्राचीन काळातल्या दत्तगुरूंना तर चोवीसपेक्षाही अधिक गुरू होते. आपण एखाद्याकडून एखादी गोष्ट शिकतो तेव्हा तो आपल्याला गुरूस्थानीच असतो. दत्तगुरूंचेच उदाहरण घेतले तर सहज लक्षात येईल की गुरूतत्व निर्जीव वस्तुंमधेदेखील असू शकते, कारण गुरू आणि आत्मतत्व यात एकात्मताच असते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः एखाद्याने प्रामाणिक प्रयत्न केले तर तेच पुरेसे ठरून तो जन्म आणि मरणाच्या चक्रातून सुटेल अशा जीवनमुक्त अवस्थेप्रत पोचू शकतो, की आत्मसाक्षात्कार घडावा या साठी ईश्वरी कृपेचीच गरज असते?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: आत्मसाक्षात्कारासाठी ईश्वरी कृपा देखील आवश्यक असते, नव्हे ईश्वरी कृपाच आत्मसाक्षात्कार घडवू शकते. पण अशी कृपा सच्चे भक्त किंवा श्रेष्ठ योगीजनांनाच प्राप्त होते. मुक्तीकडे घेऊन जात असलेल्या मार्गावर चालत असताना ज्याने अथकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे, केवळ अशा उच्च कोटीच्या साधकांनाच ईश्वरी कृपा प्राप्त होते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
पुरवणी:<br style="box-sizing: border-box;" />महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध अध्यात्मिक परंपरेत श्री दत्त संप्रदाय आणि श्री नाथ संप्रदायाचे मोलाचे योगदान आहे. सद्गुरूंचे तसेच गुरूदीक्षेचे अनन्यसाधारण महत्व असल्याने या संप्रदायांना गुरू संप्रदाय असे देखील संबोधले जाते. निवृत्तीनाथांसारख्या थोर सद्गुरूंविषयीचे आपले मनोगत व्यक्त करत असताना ज्ञानेश्वर माऊलींच्या<br style="box-sizing: border-box;" />'अमृताते ही पैजा जिंके' असा सार्थ गौरव प्राप्त केलेल्या शब्दवैभवाचा ओघ असा काही दुथडी भरून वाहतो, की त्याला तोडच नाही! गुरूकृपेची महती वर्णन करताना प्रतिपाद्य विषय बाजूला पडतो, पण गुरूकृपा हा विषयच असा आहे की भरभरून बोलल्याविना राहवत नाही असे कबूल करत आपल्या हातून वारंवार बोलल्या जात असलेल्या 'अवांतराबद्दल' माऊलींनी सद्गुरूंची आणि श्रोत्यांची माफी देखील मागितलेली आहे! माऊलींनी लिहीलेले 'अवांतर' हा मराठी साहित्यातले एक अनमोल लेणे ठरला आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
पावसच्या स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या गुरूपरंपरेचे महात्म्य सांगत असताना सद्गुरू चरणांची उपासना केल्याने आपले जीवन कृतार्थ झाले आहे असा नि:संदिग्ध शब्दात निर्वाळा दिलेला आहे. त्यानेच या लेखाची सांगता करतो:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; overflow-wrap: break-word;">
आदिनाथ सिद्ध । आदिगुरु थोर । त्यासी नमस्कार । भक्तिभावे ।।<br style="box-sizing: border-box;" />तयाचे पासून । शिवशक्ति बीज । लाधले सहज । मत्स्येंद्राते ।।<br style="box-sizing: border-box;" />मत्स्येंद्राने दिले । गोरक्षालागोन । गोरक्षे गहिनी । धन्य केला ।।<br style="box-sizing: border-box;" />गहिनीनाथे बोध । केला निवृत्तीसी । निवृत्ती उपदेशी । ज्ञानदेवा ।।<br style="box-sizing: border-box;" />ज्ञानदेव शिष्य । देव चुडामणि । पुढे झाले मुनी । गुंडाख्यादि ।।<br style="box-sizing: border-box;" />रामचंद्र महा । देव रामचंद्र । प्रसिद्ध मुनींद्र । विश्वनाथ ।।<br style="box-sizing: border-box;" />योगसार ऐसे । परंपरा प्राप्त । सद्गुरु गणनाथ । देई मज ।।<br style="box-sizing: border-box;" />स्वामी म्हणे झाले । कृतार्थ जीवन । सद्गुरु चरण । उपासिता ।।</div>
</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-27445285682215379702020-02-28T21:57:00.004-08:002021-05-11T07:17:56.286-07:00विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती - प्रकरण ७ - भक्ती आणि समर्पण <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
भक्ती आणि समर्पणभावविषयक भगवान श्री रमण महर्षींचा उपदेशाचा आपण या प्रकरणात गोषवारा घेणार आहोत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
डेव्हिड गॉडमन यांचा प्रस्तावनेतील सारांश असा आहे:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
जगभरच्या धार्मिक परंपरांमधे व्यक्तिगत 'मी' च्या पलीकडे जाण्यासाठीचा एक उपाय या दृष्टीने परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाण्याविषयीचे प्रतिपादन केलेले दिसते. श्री रमण महर्षींना या मार्गाची वैधता पूर्णपणे मान्य होती आणि ते नेहेमी असे म्हणत असत की शरणागती ही साधनाप्रणाली देखील आत्मविचाराइतकीच परिणामकारक आहे. परंपरेने समर्पणाच्या मार्गाची सांगड नेहेमी उपास्य आणि उपासक अशा द्वैतभावावर आधारलेल्या भक्तीभाव आणि उपासनापद्धतींशी घातलेली दिसते. श्री रमण महर्षींंच्या दृष्टीने पाहताना मात्र अशा उपासनापद्धतींना नेहेमीच दुय्यम स्थान दिलेले दिसते. खरी शरणागती ईश्वराची उपासना करताना अंगीकारलेल्या उपास्य आणि उपासक या नात्यापलीकडे जाते हे दाखवण्यावर महर्षींचा भर असल्याचे दिसते, कारण आपण उपास्यापेक्षा वेगळे आहोत अशी कल्पना करून घेतलेल्या उपासकाचे स्वायत्त अस्तित्वच जेव्हा विलीन होऊन जाते तेव्हाच शरणागती सुफळ संपूर्ण होते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
शरणागती हे ईप्सित साध्य होण्यासाठी श्री रमण महर्षी दोन वेगवेगळ्या साधनापद्धतींची शिफारस करत असत:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
१. 'मी आहे' या अहंस्फुरणेशी आपण ईश्वरापेक्षा पृथकतेने नांदतो आहोत अशा भ्रमात असलेला तथाकथित 'मी' नाहीसा होईपर्यंत सतत अनुसंधान राखणे</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
२. आपल्या आयुष्याविषयीचे सारे उत्तरदायित्व ईश्वरचरणी किंवा निजस्वरूपाच्या ठायी पूर्णपणे समर्पित करणे. आत्मसमर्पण परिणामकारक ठरावे या साठी साधकाला स्वत:चे संकल्प विकल्प आणि वासना नसणे तसेच ईश्वरी सत्तेपासून वेगळे असलेले संकल्प पूर्तीस नेण्याची क्षमता बाळगणारे स्वतंत्र व्यक्तिमत्व अस्तित्वात असल्याचा भ्रम पूर्णपणे नाहीसा होणे अनिवार्य असते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
वरील पैकी पहिली पद्धत भक्तीचा मुखवटा धारण केलेला 'आत्मविचार'च आहे हे स्पष्टपणे दिसून येते. रमण महर्षी नेहेमी आत्मविचार आणि समर्पणभाव यांची तुलना करताना एक तर असे सांगत की एकाच प्रक्रियेला दिलेली ही दोन वेगवेगळी नावे आहेत, किंवा आत्मसाक्षात्कारी स्थिती प्राप्त करण्याचे फक्त हे दोनच परिणामकारक मार्ग आहेत. रमण महर्षींनी त्यांच्या भक्तांना भक्तीमार्गी उपासना करण्यापासून कधीच परावृत्त केले नाही, मात्र ते सातत्याने असे निदर्शनास आणून देत असत की ईश्वराबरोबरचे कुठलेही नाते (अंश, भक्त, उपासक, दास, सखी इत्यादि) हे काल्पनिक आहे कारण वास्तवात फक्त ईश्वरच अस्तित्वात आहे. महर्षी सांगत असत की आपल्या खरोखरच्या स्वरूपात स्थित राहणे, आपण आणि ईश्वर यातले द्वैतात्मक नाते संपुष्टात येईल इतके त्या चैतन्याशी तदाकार होऊन किंवा समरस होऊन जाणे हीच खरी भक्ती आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
रमण महर्षी स्वतः प्रांजळपणे हे मान्य करत असत की या दोन्ही पद्धतींनी अहंतेचे पूर्णपणे आणि तत्क्षणी विसर्जन करणे हे ध्येय बहुतेक सगळ्याच साधकांसाठी अशक्य कोटीतली बाब आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेत महर्षी अशा अनुयायांना ज्याने भक्तीभाव दृढ होईल आणि मनावर ताबा मिळवता येईल अशा काही प्राथमिक इयत्तेतल्या साधनपद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला देत असत. या पैकी बहुतांशी साधनपद्धतींमधे ईश्वर (इष्टदैवत) किंवा सद्गुरूंशी सतत नामस्मरण करत अनुसंधान राखणे किंवा त्यांचे सगुण रूप आठवून मानसपूजेच्या स्वरूपात त्यांचे ध्यान करण्याचा अंतर्भाव असे. महर्षी भक्तांना असा निर्वाळा देत असत की नियमीतपणे प्रेम आणि भक्तीने ओतप्रोत होऊन कुठलेही साधन केले तरी त्या योगे टिपकागदाने एखादे द्रव्य टिपून घ्यावे तसे साधकाचे मन विनासायास उपास्यदेवतेत विलीन व्हायला लागेल. हे एकदा साध्य झाले की अनन्य भावाने शरणागत होण्यापर्यंतचा प्रवास सुकर होऊन जाईल.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
पुरवणी: स्वामी स्वरूपानंद (पावस) कृत अमृतधारेतील एक वेचा -</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
मी-माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी, तरिच तत्वता क्षणात हाता येते सहज-समाधि |<br style="box-sizing: border-box;" />सहज-समाधी संतत साधी न लगे साधन अन्य, सुटुनी आधि-व्याधि-उपाधि होते जीवन धन्य |<br style="box-sizing: border-box;" />'मी' 'मी' म्हणसी परी जाणसी काय खरा 'मी' कोण? असे 'काय' मी 'मन', 'बुद्धी' वा 'प्राण' पहा निरखोन</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः अनन्य शरणागती कशी असते?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: एखादी व्यक्ती अनन्य भावाने शरणागत झाली तर मग ज्याने शंका उपस्थित कराव्या किंवा ज्याच्या बाबतीत काळजी करावी असे मागे कुणीच उरत नाही. एक तर 'मी आहे' या सगळ्या विचारांच्या मूळ उगमस्थानाला पकडून ठेवणे किंवा कुठलीशी अट न ठेवता ईश्वरी शक्तीला सर्वभावे शरण जाण्याने विचारांचा पगडा नष्ट होत जातो. आत्मसाक्षात्कार घडावा हे फक्त या दोन मार्गांनीच घडू शकते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः अनन्य किंवा संपूर्ण शरणागती मधे साधकाला मुक्तीची किंवा ईश्वरप्राप्तीची देखील वासना शिल्लक न राहणे अनिवार्य आहे का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: अनन्य शरणागतीमधे तुमची स्वत:ची अशी कुठली वासना असू नये हे अनिवार्यच आहे. परमेश्वर तुम्हाला जे काही देतो त्यातच संतुष्ट असणे क्रमप्राप्त आहे. या संतुष्ट असण्याचा किंवा समाधानी वृत्तीचा दुसरा पैलू हा आहे की साधकावरचा व्यक्तिगत वासनांचा पगडा पूर्णपणे नाहीसा झालेला असतो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः मला शरणागती सोपी वाटते. मला त्या मार्गाचा स्वीकार करायचा आहे.<br style="box-sizing: border-box;" />रमणं महर्षी: तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, तुम्हाला त्या 'एकात' स्वतःला विसर्जित करावे लागेल. तुम्ही जेव्हा 'तूच (ईश्वर) सर्व काही आहेस' आणि 'फक्त तुझाच (ईश्वराचा) आदेश पाळला जाईल' ('दाय विल बी डन') अशी स्थिती प्राप्त कराल तेव्हाच शरणागती पूर्णत्वाला जाते. ही स्थिती ज्ञानापेक्षा वेगळी नसते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
'सोहम' ची सुरूवात द्वैतातून होते तर शरणागती अद्वैतावर आधारलेली आहे. पण सत्य हेच आहे की अंततः जो 'तत्वमसि' बोध उरतो त्यात द्वैत आणि अद्वैत दोन्ही अस्ताला गेलेले असतात. शरणागती वरपांगी सोपी वाटते, कारण लोक तिचा असा अर्थ लावतात की फक्त एकदा 'मी शरणागत आहे' असे शब्द उच्चारले आणि आपला सारा भार देवावर टाकून मोकळे झाले की मग आपल्याला हवी तशी मनमानी करता येईल. वस्तुस्थिती मात्र या पेक्षा वेगळीच आहे, ती अशी की तुम्ही शरणागती पत्करली की मग तुम्हाला व्यक्तिगत आवड नावड असू शकत नाही. तुमचे संकल्प विकल्प पूर्णपणे लयाला जागात आणि त्यांची जागा ईश्वरेच्छा (ईश्वरी आदेश) घेते. या मार्गाने अहंतेचा अंत घडवता आला तर त्या योगे साधकला जी आंतरिक स्थिती प्राप्त होते तीअध्यात्मिक ज्ञानप्राप्तीपेक्षा कणमात्रही वेगळी नसते. याचाच मतितार्थ असा, की तुम्ही कुठल्याही मार्गाने गेलात तरी शेवटी तुम्हाला ज्ञानाकडे किंवा या एकात्मभावाकडेच येणे भाग पडते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः कृपाप्रसादाने साधकाला अशी क्षमता लवकर प्राप्त करण्यात मदत मिळते का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: तुम्ही ते देवावर (सद्गुरूंवर किंवा ईष्टदेवतेवर) सोडा. तुम्ही सर्वभावे कुठल्याही अटी न घालता शरण जा. पुढील दोनपैकी एक गोष्ट करावीच लागेल - एक तर आपली क्षमता मर्यादित आहे आणि आपल्याला ईश्वरी कृपेची गरज आहे हे मनोमन मान्य करून शरणागत व्हा, किंवा सगळ्या पाप, ताप आणि दैन्यामागच्या मूळ कारणाचा छ्डा लावत त्याच्या उगमस्थानाकडे जा आणि आपल्या सच्चिदानंद निजस्वरूपात लीन होऊन जा. या पैकी कुठल्याही मार्गाने गेलात तर तुमची दुर्दशा कायमची संपून जाईल. खात्री बाळगा की शरणागत झालेल्या भक्ताचा भार वाहणे ईश्वराने सोडून द्यावे असे कधीच घडू शकत नाही.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः आम्ही प्रापंचिक बुद्धी असलेली सामान्य माणसे असल्याने या ना त्या कारणाने आम्ही व्यथित होत राहतो, आणि या दु:खद परिस्थितीवर कशी मात करावी हे आमच्या लक्षात येत नाही. आम्ही देवाची कितीही करूणा भाकली तरी त्या योगे आमच्या समस्यांचे समाधान प्राप्त होत नाही. अशा वेळी आम्ही काय करावे?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवा.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः आम्ही शरण जातो, तरीही आम्हाला कुठलीच मदत मिळत नाही.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: मी समजू शकतो. पण तुम्ही जर खरोखर शरणागत झालेले असाल तर 'ईश्वरेच्छा बलियसी' अशा दृढभावनेने तुम्हाला जगता आले पाहिजे आणि तुम्हाला आनंददायी किंवा सोयीच्या वाटत नाहीत अशा गोष्टींबद्दलचा तुमचा तक्रारीचा सूर निवळला पाहिजे. तुम्ही वरवर पाहता त्या पेक्षा सगळ्या गोष्टी आणि घटना वेगळेच वळण घेत आहेत असे देखील कित्येक वेळा कालांतराने का होईना तुमच्या ध्यानात येईल. दु:खार्त भावनाच कित्येक वेळा इष्टापत्ती ठरते कारण तीच ईश्वरभक्ती दृढ होण्यात परिणत होते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः शरणागती ही अशक्यप्राय गोष्ट आहे.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: मान्य आहे. सुरूवातीलाच संपूर्ण शरणागत होणे अशक्य आहे, मात्र अंशतः का होईना शरणागत होणे हे खचितच आपल्या आवाक्यातले आहे. कालांतराने भक्तीभावच संपूर्ण शरणागतीकडे घेऊन जातो. असे पहा की शरणागती अशक्यप्राय आहे असे हेकेखोरपणे गृहीत धरून चालले, तर मग आपल्याकडे उपाय तरी काय उरतो? अशाने मनःशांतीदेखील कायमची दुरावते. फक्त समर्पणानेच ती प्राप्त करता येते. लक्षात घ्या की तुम्ही आपल्याच सामर्थ्याने मनःशांती प्राप्त करण्यात नेहेमीच असहाय्य ठरत आलेले आहात.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः सर्वव्यापी असलेल्या ईश्वराचे दर्शन कसे घेता येईल?<br style="box-sizing: border-box;" />रमंण महर्षी: ईश्वराचे दर्शन घेणे आणि ईश्वर होऊन जाणे एकच आहे. ईश्वर एकांशाने अस्तित्वात आहे. ईश्वरापेक्षा वेगळे असे इथे काहीच नाही जे त्याने व्यापून टाकावे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः माझा ओढा भक्तीमार्गाकडे आहे. हा ओढा आणखी वाढत रहावा असे मला वाटते. त्या पुढे साक्षात्कार किंवा मुक्ती माझ्या खिजगणतीतही नाहीत. माझा भक्तीभाव दृढ व्हावा असा आशिर्वाद द्या.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: अत्यंत उत्कट असा भक्तीभाव असेल, तर तुमची ईच्छा असो वा नसो, साक्षात्कार म्हणा किंवा मुक्ती म्हणा, ती तुमच्यावर अक्षरशः लादली जाते. तुमचा भाव इतका दृढ आणि उत्कट करा, की त्या भक्तीसागरात तुमचे मन विरघळून जावे. मन कापरासारखे असते. एकदा कापूर जळून गेला, की मागे कुठलेच अवशेष उरत नाहीत. मनाचा दृढनिश्चय झाला आणि ते मागे कणमात्रही अवशेष न ठेवता निजानंदी विलीन झाले, तर त्यालाच तर आत्मसाक्षात्कार असे म्हणतात.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः अध्यात्मिक साधकाने सतत ईश्वराच्या स्तुतीपर गीत गायन करण्यात तल्लीन होत जगात वावरण्याने याच जन्मात त्याला आपले ईप्सित साध्य करता येईल का? साधकाने स्थैर्य लाभण्यासाठी एकाच ठिकाणी वास्तव्य करणे आवश्यक आहे का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: जेव्हाजेव्हा मन विचलीत व्हायला लागेल, तेव्हा नित्याचे व्यवहार पार पाडत असतानाच अंतर्यामी मात्र मनाला एकाच गोष्टीवर केंद्रित ठेवण्याचा अभ्यास करणे खचितच चांगले आहे. मनाला इतस्ततः भटकायला मोकळे सोडून निव्वळ जडदेहाला हट्टाग्रहाने एकाच ठिकाणी स्थिर आसनात बसायला भाग पाडण्याने काय साध्य होणार आहे?</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः अहेतुक भक्ती करणे सामान्य जनांना शक्य आहे का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: होय, ते शक्य आहे. अमुक एक गोष्ट मिळावी या हेतूने केलेली भक्ती ही ईश्वर भक्ती नसून ती प्राप्य वस्तूचीच भक्ती ठरते. शिवस्वरूप होण्याची अभिप्सा ज्याच्या मनी आहे अशा साधकासाठी ईश्वरी उपासना करताना त्या योगे आपल्याला अमुक एक गोष्ट हवी आहे अशा प्रकारच्या वासनेला पूरक असा एकही विचार तरंग मनात उमटू नये यासाठी पूर्वाभ्यास करणे अनिवार्य आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
[एका आगंतुकाने त्याचा प्रश्न लिहून आणलेली चिठ्ठी रमण महर्षींना दिली]</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीने पूर्णपणे आणि अनन्यभावाने आपल्याला ईश्वराचाच काय तो आश्रय आहे असा निश्चय केला आणि ईश्वराव्यतिरिक्त अन्य कुठलाही विचार देखील मनात उमटू दिला नाही, तर अशा व्यक्तीचे सारे मनोरथ (ईश्वरकृपेने) पूर्ण होतात. याचा अर्थ असा होतो का, की एकाच ठिकाणी स्थिर आसनात बसून रहावे, सदासर्वकाळ फक्त ईश्वरी चिंतन करावे, अन्य विचारांचा त्याग करावा - ज्यात देहधारणेसाठी आवश्यक असलेल्या अन्न, जल इत्यादिंच्या विचारांचा देखील त्याग करायला हवा का? याचाच अर्थ असा देखील होतो का, की साधक आजारी पडला तर त्याने औषध किंवा उपचार यांचा विचार न करता आपले निरामय असणे किंवा रोगग्रस्त असणे हे देखील पूर्णपणे प्रारब्धावर किंवा ईश्वरावर सोडून द्यावे? मी भगवद्गीता अध्याय २ श्लोक ७१ च्या अनुषंगाने हा प्रश्न विचारतो आहे. थोडक्यात बोलायचे झाले तर सारे काही ईश्वरावर सोडून द्यावे, की आपण देखील थोडेफार प्रयत्न करावे? भगवानांनी कृपा करून शरणागतीविषयीच्या या शंकेचे निरसन करावे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
संदर्भः भगवद्गीत २.७१ - निष्कामत्वे जगी वावरे जो नि:स्पृह निरूपाधी, निरहंकारी निर्मम नर तो परम शांती संपादी (स्वामी स्वरूपानंद कृत भावार्थ गीता)<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: [चिठ्ठी वाचून झाल्यावर महर्षींनी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच संबोधित केले]<br style="box-sizing: border-box;" />अनन्य शरणागतीचा अर्थ कुठल्याही विचाराने लिप्त न होणे असा होतो या बद्दल शंकाच नाही. पण याचा अर्थ देहधारणेसाठी आवश्यक असलेल्या अन्न किंवा जल याबद्दलच्या विचारांचा देखील अव्हेर करावा असा होतो का? खचितच नाही. तुम्ही असे विचारता आहात, "ईश्वरी कृपेने न मागताच मला जर काही मिळाले, तर तेच अन्न मी ग्रहण करावे का? की त्या साठी थोडे प्रयत्न देखील करणे आवश्यक आहे?" ठीक आहे. आता क्षणभर असे गृहीत धरू या की आपल्यासाठी आवश्यक ते अन्न आपोआप पुढ्यात येते आहे. पण तसे घडले, तरी त्याचा घास कुणी घ्यायचा? आता त्या पुढे एक पाऊल जात असे समजा की अगदी कुणीतरी तुम्हाला घास भरवला, तो गिळण्यासाठीचे सायास तरी तुम्हीच करणार आहात ना? तो प्रयत्नच ठरत नाही का? तुम्ही पुढे असे विचारता, "मी आजारी पडतो तर औषध घ्यावे की आपल्या प्रकृतीची सारी काळजी देवावर सोडून तसेच निमूटपणे बसून रहावे?" शंकराचार्यांनी साधना पंचकम मधे लिहीले आहे, की क्षुधा नामक आजार झाला तर भिक्षेत मिळालेल्या अन्नाचे औषधवत ग्रहण करावे. पण यातही संन्यासाने भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी बाहेर पडण्याचे तरी किमान प्रयत्न करणे गृहीतच धरलेले आहे. जर सगळ्यानीच असे ठरवले की आम्ही डोळे मिटून ध्यानस्थ बसून राहू आणि पुढ्यात येईल तेच अन्न ग्रहण करू, तर जगाचे रहाटगाडगे सुरू राहील तरी कसे? त्यामुळे आपल्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक ते विहित कर्म जसे आपले (मानव समाजाचे) पूर्वज पार पाडत आलेले आहेत तसेच काळानुसार बदलत्या स्वरूपात जे आपल्या पुढे कर्तब्य या स्वरूपात आले आहे, ते प्रत्येकाने जबाबदारीने पार पाडायलाच हवे. फक्त ते पार पाडताना 'मी कर्म करतो आहे' या विचारापासून मात्र साधकाने मुक्त असायला हवे. 'मी अमुक एक गोष्ट आपल्या सामर्थ्याने करतो आहे' अशी भावना मनात येणे हेच बंधन आहे. त्यामुळेच कर्तेपणाच्या भावनेच्या आधीन होऊ नये अशी एखादी साधनपद्धती शोधणे आणि तिचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
आजारी पडल्यावर औषध घ्यावे का किंवा भूक लागली असता अन्नग्रहण करावे का या सारख्या शंका उपस्थित करण्यापेक्षा कर्ताभाव लोपावा या साठी साधना करणेच श्रेयस्कर आहे. अशा शंका उपस्थित कराल तर त्यांना अंत नसतो. कारण उच्छवासानंतर श्वास घ्यावा का, वेदना झाल्यावर कण्हावे का या सारख्या शंका देखील तुम्हाला पडू शकतात. तुम्ही ईश्वर म्हणा किंवा कर्मगती म्हणा किंवा प्रारब्ध म्हणा, कुणी एक अनामिक शक्ती प्रत्येक व्यक्तीची जडणघडण लक्षात घेत या जगातल्या सगळ्या कार्यकलापांचे सूत्रसंचालन करत राहील. या दिव्य शक्तीवर सारी जबाबदारी सोपवली, तर सगळ्या गोष्टी स्वयंचलित यंत्राप्रमाणे सुरळित सुरू राहतील.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
आपण रोज जमीनीवरून चालतो. तसे करत असताना प्रत्येक पावलावर आपण आता कुठला पाय आधी उचलावा, तो खाली कधी टेकवावा असा विचार करत बसतो का? चालणे आपोआप होते, नाही का? तीच गोष्ट श्वास घेण्याबद्दलही खरी आहे. आपल्याला श्वासोच्छवास करण्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागत नाहीत. या जीवनाचीही तीच कथा आहे. आपली मर्जी आहे म्हणून आपण एखादी गोष्ट सोडू शकतो का, किंवा मन मानेल तसे वागू शकतो का? निसर्गतःच अशा कित्येक गोष्टी अव्याहतपणे सुरू असतात ज्यांच्याविषयी आपल्याला सजग असे भानही नसते. ईश्वराला पूर्णपणे शरण जाणे याचा अर्थ असा आहे नानाविध मन:कल्पनांनी विचलीत न होता मन ईश्वराच्या स्मरणात स्थिर करणे. हा निदीध्यास दृढ होत गेला की विचारांचा पगडा आपोआप कमी होत जातो. मन, वाचा आणि देहाद्वारे केले गेलेले प्रत्येक कर्म जर ईश्वरी अनुसंधानात मिसळून गेले, तर आपल्या जीवनाचा सारा भार ईश्वरावर आपोआप पडतो. अशा भक्तांच्या योगक्षेमाची चिंताही ईश्वरच वाहतो.</div>
</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-63213029745359780882020-02-21T19:33:00.000-08:002021-05-11T07:18:44.593-07:00विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती - प्रकरण ६ - आत्मविचार (काही गैरसमज आणि त्यांचे निराकरण) <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
या प्रकरणात आत्मविचारासंबंधीचे काही गैरसमज तसेच त्यांचे निराकरण यांचा समावेश आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांशः</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
'अद्वैत वेदांत' या भारतीय दर्शनशास्त्रातील सैद्धांतिक प्रणालीचा आजमितीला अंदाजे एका सहस्त्रकापेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी सातत्याने उत्कर्षच होत आलेला आहे. रमण महर्षींनी वेळोवेळी ज्या तात्विक सिद्धांतांचे प्रतिपादन केले, त्यांचे अद्वैत वेदांताच्या अनुयायांनी अंगीकारलेल्या भूमिकेशी कमालीचे साधर्म्य असल्याचे दिसते. रमण महर्षी आणि अद्वैत वेदांताचे उपासक यांच्या वैचारिक भूमिकेत बहुतांशी सर्वच बाबतीत एकवाक्यता असल्याचे दिसत असले, तरी तदनुषंगिक बाबी आचरणात आणण्याविषयीच्या त्यांच्या भूमिका मात्र पूर्णपणे वेगळ्या असल्याचे दिसून येते. अद्वैत मताचे गुरूजन बहुधा 'स्वरूप' ही एकमेव वस्तुस्थिती आहे असे मनावर वारंवार ठसवण्यावर आधारित असलेल्या ध्यानपद्धतींचा पुरस्कार करत असले, तरी रमण महर्षींनी मात्र आत्मविचाराचेच ठामपणे प्रतिपादन केलेले दिसते. 'मी ब्रह्म आहे' किंवा 'तो (ईश्वर) मीच आहे' अशी ठाम खात्री देत असलेल्या विधानांचा मंत्रासारखा वापर करणे किंवा क्वचितप्रसंगी अशा महावाक्यांविषयी चिंतन मनन करणे आणि त्यातला गर्भितार्थ अनुभवण्याचा प्रयत्न करणे या पेक्षा आत्मविचार ही वेगळी साधनाप्रणाली आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
आत्मविचाराची सुरूवात 'मी कोण आहे?' या प्रश्नाने होत असल्याने अद्वैतमताचे पारंपारिक अनुयायी असे गृहीत धरताना दिसतात की 'अहं ब्रह्मास्मि' हे या प्रश्नाचे उत्तर आहे. काही अद्वैत मताचे साधक आपल्या मनाला या वैचारिक उत्तराची सतत घोकंपट्टी करण्यात गुंतवून टाकत असल्याचेही दिसते. महर्षी मात्र या खटाटोपाबद्दल स्पष्टपणे असहमती दाखवताना असे स्पष्टीकरण देत असत की 'मी कोण आहे' या प्रश्नाचे तार्किक उत्तर शोधण्यात किंवा एखाद्या तर्कनिष्पत्तीच्या स्वरूपात गवसलेल्या उत्तराची यांत्रिक घोकंपट्टी करण्यात सतत गुंतलेले मन त्याच्या उगमस्थानी बुडून जाण्याची आणि त्याचा लय होण्याची अशा खटाटोपात शक्यताच उरत नाही. याच कारणामुळे 'मी कोण आहे?" या प्रश्नाचा मंत्रवत उपयोग करण्याबद्दलही ते ठामपणे असहमती दाखवत असत. त्यांचे असे ठाम मत होते की या दोन्ही चुकीच्या दृष्टीकोनांमुळे आत्मविचारामागचा मूळ हेतूच साधकाच्या हातून निसटून जातो. महर्षी असे सांगत असत की 'मी कोण आहे' हा प्रश्न मनाचे विश्लेषण करून त्याच्या स्वरूपाविषयी बौद्धिक निष्कर्ष काढण्यासाठी दिलेले आमंत्रण नाही, तसेच तो एखादा सूत्रस्वरूपात गोवलेला मंत्रही नाही. साधकाच्या हाती असलेले ते एक सहज सुलभ साधन आहे, जे बाह्य वस्तुंविषयीचे विचार, वासना आणि आकलन यात गुंतलेल्या चित्ताच्या अवधानाला तेथून परावृत्त करून विचारक किंवा अनुभोक्त्याकडे परत वळवण्यात मोलाची मदत करते. 'मी कोण आहे' या प्रश्नाचे खरे उत्तर मनाच्या अंतरंगात किंवा मनाद्वारे शोधता येत नाही, कारण त्याचे एकमेव खरे उत्तर हे उन्मनी स्थितीची अनुभूतीच आहे असे रमण महर्षींचे ठाम मत होते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
आत्मविचाराविषयीचा आणखी एक सर्वदूर पसरलेला गैरसमज हिंदूंच्या एका धारणेवर आधारलेला आहे, तो असा की आपल्याला अनुभवता येत असलेल्या सगळ्या विचारांचा आणि अनुभवांचा जाणीवपूर्वक बुद्धीने अव्हेर करत गेल्यास त्याची परिणती आत्मसाक्षात्कारात होते. वेदांत परंपरेत या साधनेला 'नेति नेति' असे म्हणतात. नेति नेति करणारा साधक 'मी मन नाही', 'मी देह नाही' अशा प्रकारे एक एक गोष्टीचा बौद्धिक पातळीवर अव्हेर करत जातो, या ओघातच आत्मस्वरूप आपोआप आपल्याला प्रकट करेल अशी त्याची/ तिची अपेक्षा असते. काही हिंदू ग्रंथांमधे नेति नेतिलाच 'आत्मविचार' असे नाव दिलेले आहे, त्यामुळे रमण महर्षींनी प्रतिपादन केलेला आत्मविचार आणि नेति नेति यात कित्येकांची गल्लत होताना दिसते. रमण महर्षींचे नेति नेति सारख्या काही पारंपारिक पद्धतींबद्दलचे मत पूर्णपणे प्रतिकूल होते. ते त्यांच्या अनुयायांना अशा पद्धतींचा अवलंब करण्यापासून परावृत्त करत असत. महर्षी वेळोवेळी हे बजावून सांगत असत की साधकाने हव्या तितक्या बौद्धिक कसरती केल्या तरी मनापलीकडचा प्रांत अवगत करून घेण्यासाठी त्यांचा तिळमात्रही उपयोग होण्याची सुतराम शक्यता नाही.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः ध्यान आत्मविचारापेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणावे का?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: ध्यानात मनोनिर्मित प्रतिमांचा अंतर्भाव असतो, तर आत्मविचार हा (सगळ्या आभासांमागे दडलेल्या) वास्तविकतेचा शोध असतो. ध्यान ही वस्तुनिष्ठ तर आत्मविचार ही व्यक्तिनिष्ठ बाब आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः या (ध्यान, अध्यात्म वगैरे) विषयाच्या बाबतीत आपला वैज्ञानिक दृष्टीकोण असायला हवा.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: वास्तविक नसलेल्या (मिथ्या, अशाश्वत) गोष्टींचा त्याग करणे आणि वास्तविकतेचा (सत्य, शाश्वत) शोध घेणे पूर्णपणे वैज्ञानिकच आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः मला असे सुचवायचे होते की सर्वप्रथम मन, मग बुद्धी, त्यानंतर अहंकार असे क्रमश:च नष्ट होत जात असतील.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: निजस्वरूप ही एकच गोष्ट वास्तविक सत्य आहे. त्या व्यतिरिक्त सारे आभासी आहे. तुमचे मन किंवा बुद्धी तुमच्यापेक्षा पृथकत्वाने नांदू शकत नाहीत. बायबल सांगते, "निश्चळ व्हा, आणि मी देव आहे अशी प्रचिती अनुभवा". ("बी स्टिल अँड नो दॅट आय अॅम गॉड"). आत्मा हाच परमात्मा आहे हे अनुभवण्यासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे - निश्चळ असणे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः मला 'मी' विषयीचे भान (आत्मभान) असते. असे असूनही माझ्या मागची पीडा काही संपत नाही.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: तुमचे 'मी' विषयीचे भान शुद्ध आत्मभान नाही. शरीर आणि ज्ञानेद्रियांशी स्वरूपाचे तादात्म्य आहे या भूमिकेतून घेतलेल्या अनुभवांची त्यात भेसळ आहे. आपण अनुभवत असलेली सारी पीडा कुणाला आहे याचा शोध घ्या. 'मी आहे' या जाणीवेभोवती सारा खेळ चाललेला आहे. या जाणीवेतच चित्त स्थिर करा. तसे केल्याने इतर विचारांचा फापटपसारा क्षीण होत जाईल.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः (जग मिथ्या आहे असे ठामपणे मानून आत्मविचाराने अंतर्यामी शोध घेत असताना) या गोष्टीची खात्री काय की आजवर अज्ञात असलेली कुठलीशी अनिर्वचनिय गोष्ट अंतर्यामी माझ्या स्वागतासाठी तयार असेल?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: एखादा साधक पुरेशा पक्व अवस्थेला पोचला की त्याची तशी आपोआपच खात्री होते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः असा अध्यात्मिक विकास मला कसा साध्य होईल?.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: शास्त्रात याची अनेकविध उत्तरे दिलेली आहेत. मी इतकेच म्हणेन की अन्य कुठल्याही मार्गाने आधी जर काही प्रगती झालेली असेल, तर आत्मविचाराने अधिक वेगाने परिपक्वता प्राप्त होत जाते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः हा विचारांचा एक वर्तुळाकार भोवरा झाला. मी जर पक्व असेन तर मी आत्मविचारासाठी पात्र असेन आणि अशी पात्रता प्राप्त करण्यासाठी मला आत्मविचारच करावा लागेल.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: मनाचा स्वभावच असा आहे की त्याच्यापुढे सतत अशा अनेक शंका आणि अडचणी उभ्या ठाकतील. मनाला स्वत:चे समाधान करून घेण्यासाठी कुठल्या ना कुठल्या सैद्धांतिक प्रणालीची नेहेमीच गरज असते. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की ज्याला गांभिर्याने आणि तळमळीने ईश्वराचा शोध घ्यायचा आहे किंवा आपल्या निजस्वरूपाचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे अशा साधकाची आंतरिक तळमळच त्या दृष्टीने पुरेशी असते. अशा पक्व साधकाला कुठल्याही सैंद्धांतिक मीमांसेची अजिबात आवश्यकता नसते.</div>
</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-81553715951700211712020-02-14T22:08:00.003-08:002021-05-11T07:16:16.334-07:00विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती - प्रकरण 5 - आत्मविचार (साधना संहिता) <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
या प्रकरणात आपण आत्मविचाराची साधना संहिता पाहणार आहोत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
भगवान रमण महर्षी आत्मविचार साधनापद्धतीच्या पहिल्या इयत्तेतल्या विद्यार्थ्यांना आपले सारे अवधान अंतर्यामी असलेल्या 'मी' या जाणीवेवर केंद्रित करण्याचा आणि शक्य तितका वेळ त्या जाणीवेला पकडून ठेवण्याचा सल्ला देत असत. ते पुढे असे सांगत असत की आत्मविचार करत असताना अन्य विचारांमुळे चित्त विचलीत होणे साहजिक असले, तरी आपले चित्त विचलीत झाले आहे हे लक्षात आल्यावर अवधान पुन्हा एकदा 'मी' या जाणीवेवर केंद्रित करणे आवश्यक आहे. या साधनापद्धतीला सहाय्यभूत ठरतील अशा काही गोष्टी ते सुचवत असत - आपण स्वतःलाच 'मी कोण आहे' हा प्रश्न विचारणे किंवा आपण कळत नकळत सगळ्या कार्यकलापांच्या केंद्रस्थानी मानलेला 'मी' नेमका कुठून जन्माला आलेला आहे याचा शोध घेणे इत्यादि. या सगळ्या प्रयत्नांमागचा अंतिम हेतू मात्र एकच आहे - शरीर आणि मनाद्वारे केल्या जात असलेल्या कार्यकलापांची जबाबदारी आपल्यावर आहे असे समजून चाललेल्या तथाकथित 'मी' विषयी निरंतर सजग असणे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
या साधनेच्या प्राथमिक टप्प्यामधे अहंस्फुरणेविषयीचे अवधान ठेवणे ही एक मानसिक क्रिया असली, तरी तीच हळूहळू स्थिर विचार किंवा अनुभूतीचे रूप घेत जाते. साधना परिपक्व होत जाईल तसा 'मी' विषयीचा बौद्धिक विचार हळूहळू व्यक्तिनिष्ठ स्वरूपात प्रत्यक्षात अनुभवता येणार्या सच्चिदानंद स्वरूपासाठी मार्ग प्रशस्त करत जातो आणि पुढे नानाविध विचारांचे आवर्त तसेच बाह्य वस्तुंच्या संपर्कात येणे किंवा त्यांच्याशी तादात्म्य पावणे थांबायला लागले की व्यक्तित्वदर्शक 'मी' पूर्णपणे अंतर्धान पावतो. मागे उरते ती फक्त शुद्ध अस्तित्वाची प्रचिती, जी अनुभवताना स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे चलनवलन तात्पुरत्या स्वरूपात का होईना पूर्णपणे थांबते. सच्चिदानंद स्वरूपाची प्रचिती सुरूवातीच्या काळात अधूनमधून झलक दाखवल्यासारखी येत असली, तरी सातत्याने साधना करत राहिल्यास तिचा अनुभव घेणे आणि त्या प्रचितीत स्थिर होणे चढत्या भाजणीने सहजसाध्य होत जाते.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
आत्मविचार पुढे अशा एका उन्नत अवस्थेत परिणत होतो जिथे विनासायास सच्चिदानंद स्वरूपाची प्रगाढ अनुभूती येते. अनूभूती प्रगाढ होत असताना प्रयत्नाने काही साध्य करू पाहणार्या 'मी' चा तात्पुरता लय झाल्याने त्या कालावधीत व्यक्तिगत प्रयत्न करणे अशक्यप्राय होऊन जाते. असे असूनही व्यक्तिगत 'मी' ची जाणीव वारंवार प्रबळ होऊन डोके वर काढत असल्याने प्रयत्नपूर्वक केलेल्या साधनेची ही सर्वोच्च अवस्था असली तरी ती आत्मसाक्षात्कारी स्थिती नसते. स्वरूप स्थितीची प्रचिती वारंवार आणि अधिकाधिक सातत्याने आली की ज्या वासनांच्या माध्यमातून व्यक्तिगत 'मी' ची जाणीव जन्माला येते, त्या वासनांना ती हळूहळू क्षीण आणि नष्ट करत जाते. वासनांचा चित्तावर असलेला पगडा अत्यंत क्षीण झाला की स्वरूपात असलेली आंतरिक शक्ती (गुरूकृपा) उरल्यासुरल्या वासनांचा असा काही समूळ नि:पात करते की व्यक्तिगत अहंतेचा फणा पुन्हा कधीच डोके वर काढत नाही. हीच अंतिम आणि अपरिवर्तनीय अशी आत्मसाक्षात्कारी स्थिती आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आत्मविचार हा मनाला एकाग्र करण्याचा व्यायाम नाही, तसेच विचारांचे दमन करण्याच्या हेतूने आत्मविचार साध्य करता येत नाही.आत्मविचारात फक्त मन जेथून उसळी घेते त्या उगमस्थानाविषयी सजग होण्याची आंतरिक तळमळ असते. आत्मविचार ही एक अत्यंत ह़ळुवार आणि सौम्य साधना आहे. मनावर ताबा मिळवण्यासाठीच्या दमनकारी पठडीतल्या ती पद्धतींना पूर्णपणे बाजूला ठेवते. या पद्धतीत साधकाने केलेल्या प्रयत्नांची परिणती अशा प्रकारे स्वरूपाचा बोध होत नाही, उलट स्वरूपबोधात साधकच कळत नकळत विलीन होऊन जातो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
रमण महर्षींनी स्वतः एका उच्च कोटीच्या साधकाला असा अभिप्राय दिलेला आहे -<br style="box-sizing: border-box;" />ध्यान करू नका - फक्त आपले अस्तित्व अनुभवा. '<br style="box-sizing: border-box;" />मी अमुक आहे' असा विचार करू नका - फक्त आपले अस्तित्व अनुभवा.<br style="box-sizing: border-box;" />हे अस्तित्व कसे अनुभवायचे हा विचार देखील करू नका - तुम्ही तेच आहात! (तत्वमसि)</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
आत्मविचाराकडे ठराविक वेळी ठराविक ठिकाणी एखादे आसन सिद्ध करून साधण्याची ध्यानपद्धती अशा प्रकारे बघणे बरोबर ठरणार नाही. साधक कुठलेही काम करत असला तरी तो जागृत असताना क्षणोक्षणी एकीकडे सतत आत्मविचार सुरू राहणे अत्यंत मोलाचे आहे. रमण महर्षींना सतत कार्यरत राहण्यात आत्मविचाराने व्यत्यय येतो हा आक्षेप मुळीच मान्य नव्हता आणि ते ठामपणे असे प्रतिपादन करत असत की थोडाफार सराव केला तर कुठल्याही परिस्थितीत आत्मविचार सुरू ठेवता येतो. कधीकधी ते असे म्हणत असत की नित्यनेमाने ठराविक पद्धतीने केलेली साधना (परिपक्वतेच्या दृष्टीने) अगदीच बाल्यावस्थेत असलेल्या साधकांसाठी सुरूवातीच्या काळात उपयुक्त ठरू शकते, मात्र ठराविक आसनात बसून बळजबरीने दीर्घ काळ साधना करण्यासाठी ते कधीच परवानगी देत नसत. त्यांच्या शिष्यांपैकी एखाद्याने सांसारिक जीवनाचा त्याग करून ध्यानधारणेसाठी वाहून घेण्याची ईच्छा व्यक्त केली, तर एखादाच विरळा अपवाद वगळता महर्षी तशी परवानगी द्यायला ठामपणे नकार देत असत.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः काही योगीजन असे म्हणतात की एखाद्याला सत्याचा शोध घ्यायचा असेल तर त्याला/ तिला प्रापंचिक जीवनाचा त्याग करून जंगलासारख्या निर्जन ठिकाणी घोर तपश्चर्या करावी लागते.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: (अध्यात्मिक साधकाने) कर्तव्यपरायण जीवनाचा त्याग करण्याची मुळीच गरज नसते. नित्यनेमाने एखाद दुसरा तास आत्मविचाराची साधना केली तर नंतर तुम्ही आपली सारी नित्य, नैमित्तिक कर्मे करू शकता तसेच आपल्या सगळ्या व्यावहारिक जबाबदार्या पार पाडू शकता. तुम्हाला योग्य पद्धतीने ध्यान करणे साध्य झाले तर तुमच्या चित्तात उगम पावलेला विशुद्ध चैतन्याचा प्रवाह तुम्ही कार्यरत असतानाही सतत वाहताच राहील. एकच संकल्पना दोन वेगवेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त व्हावी असे काहीसे तुमच्या बाबतीत घडेल; तुम्ही ध्यानधारणा करताना जे सूत्र पकडले आहे तेच तुमच्या हातून घडलेल्या प्रत्येक कृतीतून अभिव्यक्त होईल.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः असे केल्याने त्याचा (व्यावहारिक जीवनात) नेमका काय परिणाम होईल?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: तुम्ही ही साधना करत जाल, तसे तुमच्या ध्यानात येईल की तेच लोक, त्याच घटना आणि त्याच वस्तु सभोवती असल्या, तरी त्यांच्याकडे बघण्याच्या तुमच्या दृष्टीकोणात हळुहळू बदल होतो आहे. तुमच्या हातून घडलेल्या प्रत्येक कृतीतून तुमच्या ध्यानमग्नतेची साक्ष आपोआप दिसून येईल.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः याचा अर्थ असा होतो का की आपण मी आधी विचारलेल्या प्रश्नात उल्लेख केलेल्या योगीजनांशी असहमत आहात?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: व्यक्तिगत स्वार्थ, जो माणसाला प्रापंचिक बंधनात गुंतवतो त्याचा साधकाने त्याग करायला हवा. भ्रामक अहंता, खोटी अस्मिता आणि तथाकथित स्वतंत्र व्यक्तित्वापासून मुक्त होणे याच खरा त्याग आहे.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः प्रापंचिक जीवन जगत असताना असे निस्वार्थ होणे कसे शक्य आहे?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: विहित कर्मे करणे आणि अध्यात्मिक ज्ञानप्राप्ती कधीच परस्परविरोधी नसतात.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः याचा अर्थ असा घ्यावा का, की आपल्या आजवर चालत आलेल्या आपल्या व्यावसायिक तसेच व्यक्तिगत जीवनातल्या सगळ्या उपक्रमांना तसेच पुढे सुरू ठेवले तरी त्याच वेळी एखाद्याला आत्मसाक्षात्कारही घडू शकतो?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: का नाही? पण या बाबतीत साधकाला असा अनुभव येणार नाही की त्याच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी त्याच त्या जुन्या व्यक्तिमत्वाकडून घडत आहेत. साधकाच्या जाणीवेत जोवर ती कोत्या मनोवृत्तीच्या खुज्या व्यक्तिमत्वाच्या पलीकडे जाऊन शाश्वत निजस्वरूपात स्थिरावत नाही तोवर क्रमशः परिवर्तन होतच राहील.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः आजच्या धकाधकीच्या जीवनात एखाद्याच्या जीवनात कार्यबाहुल्य असेल, तर त्याच्याकडे ध्यानधारणा करण्यासाठी अत्यल्प वेळच शिल्लक राहील.<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: आत्मविचाराच्या साधनेत ध्यानधारणेसाठी वेगळा वेळ राखून ठेवण्याची गरज फक्त नवजात शिशुसारख्या अत्यंत बाल्यावस्थेत असलेल्या साधकांनाच पडते. या मार्गावर प्रगती करायला लागलेल्या साधकाला अंतर्यामी कृतार्थतेची भावना तसेच विलक्षण आनंदाची अनुभूती मिळायला लागते. असा साधक कार्यरत असण्याने किंवा विश्रांत अवस्थेत असण्याने त्याला आलेल्या अनुभूतीत फरक पडत नाही. असा साधक आपल्या कर्मेंद्रियांचा आणि ज्ञानेंद्रियांचा यथायोग्य वापर करत समाजात वावरताना दिसला, तरी तो अंतर्यामी मात्र एकांतात आणि स्थिरचित्त राहण्यासाठी सक्षम होत जातो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः याचा अर्थ असा होतो ना, की आपण योगमार्गाची शिकवण देत नाही?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: एखाद्या गुराख्याने दंडुक्याच्या सहाय्याने बैलाला पिटाळावे, तसे योगी आपल्या मनाला ध्येयाप्रत बळजबरीने नेण्याचा प्रयत्न करतात. या मार्गावर मात्र साधक आपल्या हाताने लुसलुशीत चारा भरवत लाडीगोडी लावत बैलाला त्याच्या गोठ्यापर्यंत घेऊन जातो.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
प्रश्नः हे कसे साध्य व्हावे?<br style="box-sizing: border-box;" />रमण महर्षी: तुम्हाला स्वतःलाच प्रश्न विचारावा लागेल - 'मी कोण आहे?' हा आत्मविचारच शेवटी तुमच्या अंतर्यामी अशा एका विलक्षण गोष्टीचा शोध लागण्यात परिणत होईल, जी मनाच्या आवरणामागे दडलेली आहे. या एका महाप्रश्नाची उकल करा, मी खात्रीने सांगतो की तुमच्या अन्य सगळ्या समस्यांचे आपोआप निराकरण होईल.</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
पुरवणी- महर्षींच्या शिकवणीशी विलक्षण साधर्म्य असलेले काव्यः</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px; overflow-wrap: break-word;">
मनाचे की, पार्था | असे एक भले | तया आवडले| जे जे काही ||<br style="box-sizing: border-box;" />तेथे चि ते पाहे | सोकावोनि राहे | अनायासे लाहे | तद्रूपता ||<br style="box-sizing: border-box;" />म्हणोनि तयाते | कौतुके साचार | दावी वारंवार | आत्मसुख ||</div>
<div style="background-color: white; box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; overflow-wrap: break-word;">
स्त्रोत - स्वामी स्वरूपानंद (पावस) कृत अभंग ज्ञानेश्वरी नित्यपाठ</div>
</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-23797102765428471262020-02-14T22:02:00.000-08:002021-05-11T07:15:45.759-07:00विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती - प्रकरण ४ - आत्मविचार (सैद्धांतिक)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
आत्मविचार आणि शरणागती - प्रकरण ४ - आत्मविचार (सैद्धांतिक)<br />
<br />
या प्रकरणात आत्मविचार या रमण महर्षींनी पुनरूज्जीवीत केलेल्या आणि पाश्चात्य देशातील साधकांना भुरळ पाडलेल्या साधनपद्धतीचा सैद्धांतिक अंगाने विचार केलेला आहे.<br />
<br />
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:<br />
<br />
रमण महर्षी ठामपणे असे प्रतिपादन करत असत, की देह आणि मन या द्वारे कार्य करणारा व्यक्तिगत 'मी' अस्तित्वात आहे या धारणेचा त्याग करता आला तर आत्मसाक्षात्कार घडून येण्यासाठी तेवढेच पुरेसे आहे. त्यांच्या काही उच्च कोटीच्या भक्तांना हे पटकन उमजत असे आणि सहजगत्या अवगत होत असे. मात्र काही ना काही पद्धतीची अध्यात्मिक साधना केल्याशिवाय जन्मोजन्मीच्या आणि खोलवर रूजलेल्या व्यक्तिगत 'मी' या धारणेपासून मुक्ती मिळवणे बहुसंख्य भक्तांना जवळजवळ अशक्यप्राय वाटत असे. काहींना ते भयप्रदही वाटत असे. महर्षींना अशा भक्तांच्या समस्यांविषयी सखोल जाण असल्याने तसेच त्यांच्याविषयी करूणा वाटत असल्याने आत्मभान वाढवता येईल अशी एखादी अध्यात्मिक साधनापद्धती सुचवा असा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला जात असे, तेव्हा 'आत्मविचार' या तंत्राचा अवलंब करण्याची शिफारस ते करत असत.आत्मविचार ही अध्यात्मिक साधना त्यांच्या अत्यंत व्यवहारसुसंगत असलेल्या तत्वज्ञानाची जणू कोनशिलाच होती. या पुढे आपण आत्मविचाराविषयीचे नानाविध सैद्धांतिक पैलू थोडक्यात समजून घेणार आहोत.<br />
<br />
सर्वप्रथम मनाच्या स्वरूपाविषयी महर्षींचा दृष्टीकोन लक्षात घेणे आवश्यक आहे, कारण मनाचे असे स्वायत्त अस्तित्व नाही या सत्याचा प्रत्यक्ष अनुभूतीतून शोध लावणे हेच आत्मविचारामागचे एकमेव ध्येय असते. रमण महर्षींच्या मते देह किंवा मनाद्वारे सजगपणे केल्या गेलेल्या प्रत्येक कृतीमधून 'मी' असा कुणीतरी त्या कृतीचा कर्ता आहे हे गृहीतकच ध्वनित होत असते. मी विचार करतो, माझ्या लक्षात आले किंवा मी अमूक एक कृत्य करेन या सगळ्या कार्यकलापात 'मी' हा एकमेव घटक समान आहे. हा 'मी' असे समजून चालतो की आपल्या हातून घडलेल्या सगळ्या कृत्यांसाठी तो जबाबदार आहे. सगळ्या कार्यकलापांमधे समान असलेल्या याच घटकाला महर्षी 'अहंवृत्ती' असे म्हणतात. वस्तुतः पहायचे तर अहंवृत्ती म्हणजे निजस्वरूपाचेच मनाने प्रक्षेपित केलेले आणि फेरफार केलेले एक रूप असते. खरोखरच्या निजस्वरूपामधे आपण एखादी कृती किंवा विचार करतो आहोत अशी कल्पनाच संभवत नाही, त्यामुळे तशी भावना करून घेणारा 'मी' हा काल्पनिक असतो आणि त्यामुळे त्याला सच्चिदानंद निजस्वरूपात झालेला कपोलकल्पित बदलच मानावे लागते. अहंवृत्तीची ही व्याख्या किचकट वाटली तर बोलीभाषेत आपण अहंवृत्तीलाच 'मी पणा' असे म्हणतो तसेच थोडा 'मी पणा' कमी कर असेही म्हणतो हे लक्षात घ्यायला हरकत नाही.<br />
<br />
मनाच्या अहंकार, स्मृती, बुद्धीमत्ता अशा वेगवेगळ्या क्रियाकलापांना वेगवेगळी स्वायत्त कार्ये न समजता अहंवृत्तीचीच ती वेगवेगळी रूपे आहेत असा दृष्टीकोण ठेवण्याला महर्षी प्राधान्य देत असत. तथाकथित स्वतंत्र व्यक्तिमत्व हे नानाविध रूपात होणारे अहंवृत्तीचेच प्राकट्य आहे या मताचे महर्षी समर्थक होते. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर कर्म घडत राहिले तरी कर्ताभाव नष्ट होतो, विचारप्रवाह सुरू राहिले तरी त्या मागचा विश्लेषक नाहीसा होतो आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीवच उरत नाही या आशयाची विधाने महर्षी वारंवार करत असत. अहंवृत्तीचा निरास होणे हाच आत्मसाक्षात्कार होय या सिद्धांताची पुष्टी करणारीच ही विधाने आहेत.<br />
<br />
प्रश्नः अहंकाराकडूनच ज्याची सुरूवात झाली असा कुठलाही शोध (आत्मशोध) अहंतेचा स्वतःचाच खोटेपणा कसा प्रकट करू शकेल?<br />
रमण महर्षी: जेथून 'मी आहे' या अहंस्फुरणाचा उगम होतो त्या उगमस्थानी तुम्ही खोलवर उतरणे अहंकाराच्या इंद्रियगोचर अस्तित्वापलीकडे आपोआप घेऊन जाते.<br />
<br />
प्रश्नः पण अहंकार ज्या तीन रूपात प्रकट होतो त्यापैकी अहंवृत्ती ही फक्त एकच रूप नाही का? योगवसिष्ठ आणि इतर प्राचीन ग्रंथात अहंकाराच्या तिहेरी स्वरूपाचेच वर्णन केलेले आहे.<br />
रमण महर्षी: तसे आहे खरे. अहंकारात स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह असे तीन देह समाविष्ट आहेत असे वर्णन काही प्राचीन ग्रंथांमधे केलेले आहे; मात्र आपण लक्षात घ्यायला हवे की ते वर्णन विश्लेषण करून दाखवण्याच्या एकमेव हेतूने केलेले आहे. आत्मविचाराच्या संदर्भात हे विश्लेषण गैरलागू आहे. आत्मविचार ही पद्धती जर अहंकाराच्या स्वरूपावर अवलंबून असती, तर असे पक्के धरून चाला की या साधनापद्धतीचा अवलंब करणे पूर्णपणे अशक्य कोटीतले गणले गेले असते. अहंवृत्त्तीचे विश्लेषण करणे टाळण्यामागचे महत्वाचे कारण असे आहे, की अहंकारात अगणित रूपे धारण करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे आत्मविचार साध्य व्हावा या हेतूने पुढे जायचे असेल तर अहंवृत्ती हेच अहंकाराचे एकमेव रूप आहे असे प्रमाणभूत मानावे लागते.<br />
<br />
प्रश्नः पण ज्ञानाची प्रचिती यावी या दृष्टीने हे (अति सुलभ केलेले) गृहीतक तोकडे पडणार नाही का?<br />
रमण महर्षी: एखाद्या कुत्र्याने आपल्या मालकाचा त्याच्या शरीराच्या गंधावरून शोध घ्यावा, तद्वतच आत्मविचारात अहंवृत्तीवरून सुगावा लावत लावत आपल्या निजस्वरूपाचा शोध घ्यायचा असतो. कुत्र्याचा मालक त्याच्या नजरेच्या टप्प्यात नसला तरी या कारणामुळे कुत्र्याला त्याचा शोध घेण्यापासून रोखता येत नाही. मालकाच्या शरीराचा गंधच त्या मुक्या प्राण्याला इतकी बिनचूक सूचना देतो, की मालकाने परिधान केलेले कपडे, त्याची उंची, त्याची शरीरयष्टी या सारख्या अवांतर गोष्टी कुत्र्याच्या खिजगणतीतही नसतात. मालकाचा शोध घेताना कुठल्याही अवांतर गोष्टींमुळे विचलीत न होता सारे लक्ष फक्त मालकाच्या शरीराच्या गंधाकडेच केंद्रित केल्याने कमी अधिक वेळ लागला तरी कुत्रा शेवटी मालकापर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतोच.<br />
<br />
प्रश्नः ज्ञानप्राप्ती होण्यासाठी आत्मविचार हाच एकमेव थेट मार्ग ('डायरेक्ट पाथ') आहे असे प्रतिपादन आपण का करता?<br />
रमण महर्षी: त्याचे कारण असे आहे की अध्यात्मिक साधनेचे आत्मविचार वगळता अन्य सारे प्रकार साधन घडून येण्यासाठी मनाचे अस्तित्व शाबूत ठेवावे लागते हे मुळातच गृहीत धरून चालतात, आणि मनाचे सहकार्य नसेल तर त्यांचा सराव करता येणे शक्य होत नाही. साधनेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अहंकार वेगवेगळी आणि सूक्ष्मतर रुपे घेतो, मात्र त्याचा मुळापासून विनाश होत नाही.<br />
<br />
महान ज्ञानी अशी ओळख असलेल्या जनक राजाने बोध होंण्याआधी आश्चर्यचकित होत केलेले एक विधान प्रसिद्ध आहे, "आजवर सातत्याने माझे (पारमार्थिक) नुकसानच करत आलेला चोर आज माझ्या तावडीत सापडलेला आहे. आता त्याचा समूळ नि:पात केला जाईल." जनक राजाचे हे विधान मन किंवा अहंकाराच्या संदर्भातलेच होते.<br />
<br />
आत्मविचार साधनेलाही तंतोतंत लागू पडेल अशा स्वामी स्वरूपानंदांच्या आशिर्वचनाने लेखाची सांगता करतो.<br />
<br />
साधनी असावें तत्पर ।<br />
संकटी न सांडावा धीर ।<br />
सोहं -स्मरणे वारंवार<br />
निजांतर चोखाळावें ।।१।।<br />
<br />
नाना वृतींचे स्फुरण ।<br />
अंतरी होतसे कोठून ।<br />
साक्षित्वे पहावें आपुलें आपण ।<br />
अति अलिप्तपण ठेवोनिया ।।२।।<br />
<br />
सर्वेन्द्रियांसह वर्तमान ।<br />
मन बुद्धि आणि अहंपण ।<br />
आत्मारामीं समर्पून ।<br />
निज-निवांतपण उपभोगावे ।।३।।<br />
<br />
चालता बोलतां हिंडतां फिरतां ।<br />
लिहितां वाचितां खातां जेवितां ।<br />
नाना सुखदु:ख-भोग भोगितां ।<br />
निजात्मसत्ता आठवावी ।।४।।<br />
<br />
होतां सोहं-भजनीं तन्मय ।<br />
एकवटोनि ज्ञाता ज्ञेय ।<br />
घेई आत्मसुखाचा प्रत्यय ।<br />
अतींद्रिय स्वभावे जे ।।५।।<br />
<br />
नाद-श्रवण प्रकाश-दर्शन ।<br />
तेथें श्रोता द्रष्टा कोण ।<br />
तो आत्मा चि मी हें ओळखून ।<br />
तदनुसंधान राखावें ।।६।।<br />
<br />
सदा स्व-रूपानुसंधान ।<br />
हेचि भक्ति हेंचि ज्ञान ।<br />
तेणें तुटोनी कर्म-बंधन ।<br />
परम समाधान प्राप्त होय ।।७।।<br />
<br />
क्लेश-रहित संतोषी जीवन ।<br />
प्रयाणकाली सोहं-स्मरण ।<br />
घडो आवडी परमार्थ-चिंतन ।<br />
आशीर्वचन तुम्हांसी हें ।।८।। <br />
<br />
--प.पू स्वामी स्वरूपानंद</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-90560699400664787342020-02-09T06:26:00.000-08:002021-05-11T07:15:34.530-07:00विभाग १ - स्वरूपबोध - प्रकरण ३ - ज्ञानी <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
स्वरूपबोधविषयक या प्रकरणात आपण 'ज्ञानी' या संकल्पनेविषयीचे रमण महर्षींचा उपदेश जाणून घेणार आहोत.<br />
<br />
तत्पूर्वी भगवद्गीतेच्या अध्यात २ मधे स्थितप्रज्ञ कसा ओळखावा? त्याचे/ तिचे व्यावहारिक जगातले वर्तन कसे असते? या अनुषंगाने अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचे (भगवद्गीता श्लोक २.५४) सविस्तर उत्तर (भगवद्गीता २.५५ ते २.७२) तसेच भगवद्गीतेच्या अध्याय १२ मधे आलेले ज्ञानी भक्ताचे वर्णन (भगवद्गीता श्लोक १२.१३ ते १२.२०) वाचणे खचितच उपयुक्त ठरेल. हा संदर्भ सहज उपलब्ध असल्याने तसेच विस्तारभयास्तव तो इथे समाविष्ट केलेला नाही.<br />
<br />
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश थोडक्यात असा आहे:<br />
<br />
रमण महर्षींची भेट घेणार्या कित्येक लोकांना आत्मसाक्षात्कारी स्थितीबद्दल कधीही न शमणारे कुतुहल असल्याचे दिसून येत असे. प्रामुख्याने ज्ञानी व्यक्तीला स्वतःविषयी आणि सभोवतालच्या जागतिक घडामोडींविषयी येणारा अनुभव कसा असेल या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून अधोरेखित होत असे. आत्मसाक्षात्कारी स्थितीविषयीच्या असलेल्या बहुसंख्य लोकांच्या चित्रविचित्र धारणा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून स्पष्टपणे दिसून येत असत. या प्रश्नांचा ढोबळमानाने पुढील चार प्रश्नात समावेश होऊ शकेल -<br />
<br />
१ - चैतन्याच्या व्यापक जाणीवेत व्यक्तिगत 'मी' चा लय झालेला असला तरी ज्ञानी (अन्य सामान्य व्यक्तींप्रमाणे) आपले कार्य कसे करू शकतो?<br />
<br />
२ - या जगात वावरताना इतरांना सतत कार्यरत असलेला दिसत असला तरी 'मी काहीच करत नाही' (नैष्कर्म्य स्थिती) असे ज्ञानी कसे म्हणू शकतो? (रमण महर्षी नेहेमी ज्ञानी अकर्ता असल्याचे विधान करत असत).<br />
<br />
३. सभोवतालच्या जगाविषयी ज्ञान्याला काय प्रचिती येते? ज्ञानी व्यक्तीला जगाविषयी भान उरते का?<br />
<br />
४. शरीर आणि मन अनुभवत असलेल्या जागृती, निद्रा आणि सुषुप्तीसारख्या सातत्याने बदल होत असलेल्या चैतन्याच्या अवस्थांशी ज्ञानी व्यक्तीच्या विशुद्ध् चैतन्यावस्थेशी नेमका कसा संबंध असतो?<br />
<br />
हे सारे प्रश्न उपस्थित होण्यामागे एक गृहीतक दडलेले आहे, ते असे की ज्या प्रचितीला आपण स्वरूपबोध किंवा आत्मस्थिती असे म्हणतो ती स्थिती अनुभवणारी एक व्यक्ती (ज्ञानी) ज्ञानापासून पृथकत्वाने अस्तित्वात असते. हे गृहीतक मुळातच चुकीचे आहे. हे गृहीतक म्हणजे निव्वळ मनोनिर्मीत असलेली एक निराधार संकल्पना आहे. या संकल्पनेच्या आधारे ज्याला आत्मबोध झालेला नाही अशी व्यक्ती ज्ञानी व्यक्तीच्या प्रचितीबद्दल ठोकताळे बांधत राहते. 'ज्ञानी' हा शब्द देखील या चुकीच्या धारणेला बळ देणाराच ठरतो, कारण शब्दश: पाहता ज्ञानाचा अनुभव घेणारी किंवा ज्ञानाला जाणणारी व्यक्ती असाच त्याचा अर्थ निघतो. तरीही ही संज्ञा अज्ञान्यांकडून नित्यनेमाने वापरली जाते. अज्ञानी जन अशी कल्पना करून बसतात की मानवी जग सत्याला जाणून घेण्याची अभिप्सा असलेले (किंवा सत्याला जाणून न घेतलेले) साधक आणि सत्याचा बोध झालेले ज्ञानी अशा उभयतांनी बनलेले आहे; मात्र स्वरूपबोधामागचे सत्य असे आहे की तिथे ना ज्ञानी अस्तित्वात असते ना अज्ञानी, असते ते केवळ विशुद्ध ज्ञान!<br />
<br />
रमण महर्षी ही गोष्ट कित्येक वेळा कधी थेटपणे तर कधी आडवळणाने निदर्शनास आणून देत असत, मात्र त्यांच्या विधांनामधे दडलेला गर्भितार्थ निव्वळ सैद्धांतिक पातळीवर देखील फार विरळ्या साधकांच्या लक्षात येत असे. साधकांच्या या मर्यादा लक्षात घेत महर्षी नेहेमी आपल्या संकल्पना श्रोत्यांच्या धारणा किंवा पूर्वग्रहांशी विसंगत होणार नाहीत अशा पद्धतीने रुपांतरित करून मांडत असत. ज्ञानी आणि अज्ञानी हा काल्पनिक भेद लक्षात घेत, त्या मागच्या चुकीच्या गृहीतकाला सतत आव्हान देत राहणे टाळून आपण ज्ञान्याची भूमिका घेत स्वरूपबोधाविषयीचा गर्भितार्थ महर्षी कसा उलगडून सांगत हे आपण पुढील भागात पाहणार आहोत.<br />
<br />
प्रश्नः बद्ध आणि मुक्त (व्यक्ती) यात काय फरक असतो?<br />
रमण महर्षी: सर्वसामान्य मानव तार्किक, बौद्धिक पातळीवर (मेंदू केंद्रित) जीवन व्यतित करतो, आपल्या वास्तविक स्वरूपात अंतःप्रेरणा, सहजस्थिती (हृदय किंवा अंत:करण) समाविष्ट आहे या विषयी तो बहुतांशी अनभिज्ञ असतो. ज्ञानसिद्ध व्यक्ती मात्र हृदयात चित्त स्थिर करत (अंतःप्रेरणेने, सहज स्थितीत) जीवन व्यतित करते. अशी व्यक्ती जेव्हा जगात वावरते, तसेच बाह्य सजीव आणि निर्जीव सृष्टीबरोबर व्यावहारिक संबंध ठेवते तेव्हा तिचा हा बोध सतत जागा असतो, की आपण जे काही पाहतो त्यातली एकही गोष्ट एकाच सर्वोच्च वास्तविकतेपेक्षा पृथकत्वाने नांदत नाही (सर्वं खल्विदं ब्रह्मम्). या सर्वोच्च सत्याचा किंवा ब्रह्माचा साक्षात्कार तिला हृदयचक्रात आपल्याच निजस्वरूपात होतो.<br />
<br />
प्रश्नः असे असेल तर मग ज्ञानी व्यक्तीत अहंवृत्ती ('मी' पणाची जाणीव, किंवा स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा बोध) कसे कार्य करते?<br />
रमण महर्षी: ज्ञानी व्यक्तीत ती (अहंवृत्ती) अजिबात कार्यरत नसते. ज्या आदिम, शुद्ध चैतन्याचा उपनिषदांमधे 'प्रज्ञान' असा उल्लेख केलेला आहे, त्या चैतन्याशी एकरूप झाल्याने आणि तदाकार झाल्याने ज्ञान्याचे निजस्वरूप हे हृदयच असते. प्रज्ञान हेच खरोखर ब्रह्म असते (प्रज्ञानं ब्रह्म), आणि ते इतके परिपूर्ण असते की त्या पलीकडे अस्तित्वात काहीही असणे संभवत नाही.<br />
<br />
प्रश्नः स्वरूपात जगाचे प्रतिबिंब पडत नाही?<br />
रमण महर्षी : प्रतिबिंब पडण्यासाठी एखादी वस्तु आणि तिची प्रतिमा असे द्वैत असावेच लागते. स्वरूप अशा द्वैतभावाचा स्वीकार करत नाही.<br />
<br />
प्रश्न: आपण आम्हाला कित्येक गोष्टी करताना दिसता. मग मी कुठलेच कर्म करत नाही असे आपण कसे म्हणू शकता?<br />
रमण महर्षी: (रेडिओकडे अंगुलेनिर्देश करत) हा समोरचा रेडिओ बोलतो आणि गायन करतो असे भासते, मात्र तो उघडून पहाल तर तुम्हाला दिसेल की आत कुणीच अस्तित्वात नाही. तद्वतच, माझे अस्तित्व हे निव्वळ एक अवकाश आहे, त्यातून रेडिओप्रमाणे हे शरीर बोलत असते. अंतर्यामी कर्ता या भूमिकेतून कुणीही कार्यरत नसते.<br />
<br />
प्रश्नः मला हे समजायला अवघड वाटते आहे. भगवान, कृपया थोडे विस्तारपूर्वक सांगाल का?<br />
रमण महर्षी: व्यावहारिक जीवन जगण्यासाठी आणि कार्यरत राहण्यासाठी मनाची नितांत आवश्यकता असली, तरी उन्मनी अवस्थेतला ज्ञानी देखील आपले जीवन कसे व्यतित करतो आणि कार्यरत कसा राहू शकतो हे समजवण्यासाठी शास्त्रांमधे कित्येक समर्पक दाखले दिलेले आहेत. असे पहा की विद्युत शक्तीवर चालणारा पंखा आपण विद्युतप्रवाह बंद केला तरी थोडा वेळ फिरत राहतो. तद्वतच, हे शरीर ज्या प्रारब्धामुळे अस्तिस्त्वात आले, ते प्रारब्धच शरीराला ते ज्या ज्या क्रियाकलापांतून जाण्यासाठी घडले आहे, तसे कर्तृत्व करण्यासाठी बाध्य करत असते. ज्ञानी देखील या सगळ्या कार्यकलापांमधे 'मी कर्ता आहे' अशी यत्किंचितही भावना न ठेवता आपली भूमिका पार पाडत असतो. हे कसे शक्य होते याचे बौद्धिक आकलन करून घेणे अवघड आहे. त्यामुळे शास्त्रांमधे असे उदाहरण दिले जाते की गाढ झोपेतून चार घास खाण्यापुरते जागे झालेल्या बालकाप्रमाणे ज्ञानी आपले कर्म करत असतो. सकाळी जाग येते तेव्हा आपण काय खाल्ले याची कुठलीही नोंद त्या बालकाच्या स्मृतीत नसते.<br />
<br />
इथे हे अवश्य लक्षात घ्यायला हवे की ज्ञान्याकरता अशा कुठल्याच उदाहरणांची किंवा स्पष्टीकरणांची तिळमात्र आवश्यकता नसते. त्याचा बोध परिपूर्ण असतो आणि तो पूर्णपणे नि:शंक झालेला असतो. हा देह हे आपले स्वरूप नाही अशी सघन जाणीव त्याला असते, आणि शरीराकडून जरी एखादे कृत्य होत असेल तरी त्याचे कर्तेपण आपल्याकडे नाही असा निरंतर बोधही त्याच्या अंतर्यामी विनासायास जागृत असतो. सगळ्या स्पष्टीकरणांची गरज फक्त बघ्या लोकांना असते, ज्यांना ज्ञानी देखील देहतादात्म्य राखूनच कार्य करतो असे गृहीत धरणे भाग पडते आणि ज्ञानी विदेही स्थितीत वावरत असल्याचे काही केल्या लक्षात येत नाही.<br />
<br />
प्रश्नः अध्यात्मिक दृष्ट्या उन्नत अवस्थेत असलेल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी काही मूलभूत स्वरूपाचे निकष किंवा चाचण्या आहेत का? हा प्रश्न पडण्याचे एक कारण असे आहे की अशा व्यक्ती बाल, उन्मत्त किंवा पिशाच्चवत व्यवहार करतात असा एक सार्वत्रिक समज आहे.<br />
रमण महर्षी: ज्ञान्याची आंतरिक स्थिती ही केवळ ज्ञान्यालाच समजू शकते. एखाद्या ज्ञान्याला यथास्थित समजून घ्यायचे असेल तर ते दुसर्या ज्ञान्यालाच शक्य आहे. ('अंतरस्थितीचिया खुणा अंतर्निष्ठ जाणती'). असे असले तरी एखाद्या सत्पुरूषाच्या सान्निध्यात जी विलक्षण मनःशांती नकळत अनुभवता येते, तीच एकमेव अशी खूणगाठ आहे जिच्या आधारे त्या सत्पुरूषाची महती साधकांच्या अनायास लक्षात येते. ज्ञान्याने बोललेले शब्द, त्याने केलेल्या कृती किंवा त्याचे बाह्यरूप या त्याच्या महत्तेच्या निशाण्या नसतात. ज्ञानी व्यक्तीच्या आंतरिक गोष्टी बहुतांशी सर्वसामान्य माणसाच्या आकलनक्षमतेच्या आवाक्याबाहेर असतात.<br />
<div>
<br /></div>
</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-56587987845847613312020-02-09T06:20:00.003-08:002021-05-11T07:15:22.678-07:00विभाग १ - स्वरूपबोध - प्रकरण २ - स्वरूपाचे भान, स्वरूपाविषयीचे अज्ञान आणि साधकांच्या श्रेणी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
मागच्या प्रकरणात 'स्व' च्या मूळ स्वरूपाविषयीचे रमण महर्षींचा उपदेश थोडक्यात समजावून घेतल्यावर आता तोच धागा पकडून साधकांचे प्रकार किंवा त्यांच्या श्रेणींबद्दल महर्षींचा दृष्टीकोन या प्रकरणात बघायचा आहे.<br />
<br />
तत्पूर्वी मराठी संत साहित्यातला एक संदर्भ आवर्जुन देतो. पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंदांच्या वर-प्रार्थनेची सुरूवात 'उदारा जगदाधारा देई मज असा वर, स्व-स्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर' अशी होते. त्यांनी रचलेल्या अभंग ज्ञानेश्वरीच्या नित्यपाठाची सुरूवात 'आत्मरूपा तुज, करी नमस्कार, तुझा जयजयकार, असो देवा' अशी होते. संजीवनी गाथेत स्वामीजी असे म्हणतात -<br />
<br />
सद्गुरू गणनाथ उदार समर्थ, घाली नयनांत ज्ञानांजन |<br />
सहज समाधि सापडले धन, लाचावले मन तया ठायी |<br />
चालता बोलता न ढळे आसन, न भंगे ते मौन कदा काळी |<br />
स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद, लागलासे छंद स्व-रूपाचा ||<br />
<br />
नाथपंथी 'सोहम' साधना हा ज्ञानमार्ग असल्याने ही शिकवण रमण महर्षींच्या उपदेशाशी किती साधर्म्य राखणारी आहे हे सहज लक्षात येईल.<br />
<br />
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:<br />
<br />
भगवान रमण महर्षी क्वचित प्रसंगी असे सूचित करत की अध्यात्मिक साधकांच्या ढोबळमानाने तीन श्रेणी असतात. आपल्या मूळ स्वरूपाविषयीची फक्त जाणीव करून देताच पहिल्या आणि सगळ्यात उच्च कोटीच्या साधकांना तत्क्षणी आत्मसाक्षात्कार होतो. ही 'सद्योमुक्ती' असते. ही श्रेणी वगळून इतर साधकांना 'क्रममुक्ती' साधावी लागते. दुसर्या श्रेणीतल्या काही पूर्वाभ्यास असलेल्या साधकांना अल्प काळ का होईना आत्मस्वरूपाचे चिंतन, मनन, निदीध्यास साधल्याने त्यांच्या आत्मस्थितीची बैठक एकदम पक्की होते. या श्रेणीतल्या साधकांनाही फारसे सायास घ्यावे लागत नाहीत. तिसर्या श्रेणीतल्या अध्यात्मिक साधकांना तुलनेने काहीसे दुर्दैवी म्हणावे लागेल, कारण कित्येक तपांच्या महत्प्रयासाने केलेल्या साधनेनंतरच अशांना आत्मलाभ प्राप्त होऊ शकतो.<br />
<br />
या तीन श्रेणी सहज लक्षात येण्यासाठी रमण महर्षी अग्नि प्रदिप्त होण्याच्या क्रियेचा एक दाखला देत असत - दारूगोळ्याचे एखादे कोठार तुमच्या ताब्यात आले, तर एक ठिणगीदेखील त्याला पेटवण्यासाठी पुरेशी ठरते. कोळशासारखा ज्वलनशील पदार्थ असेल तर आगीच्या संपर्कात आल्यावर तो अल्पावधीतच पेट घेताना दिसेल. मात्र भिजलेले लाकूड तुमच्या हाती पडले तर ते वाळवण्यासाठी आणि मग पुढे ते पेटवण्यासाठी तुम्हाला बराच वेळ आणि इंधन खर्ची घालावे लागेल.<br />
<br />
याच अनुषंगाने एका महत्वाच्या विषयाचाही परामर्ष घेता येईल. महर्षींच्या उपदेशात कित्येक वेळा तार्किक विसंगती दिसते. बरीच परस्पर विरोधी विधाने दिसतात. काही वेळा तर महर्षींनी एकाच प्रश्नाची दोन तीन वेगवेगळी उत्तरे वेगवेगळ्या साधकांना दिल्याचेही दिसून येते. साधकांच्या श्रेणी, त्यांची अध्यात्मिक परिपक्वता, त्यांचे पूर्वग्रह आणि पूर्वसंस्कार या गोष्टी लक्षात घेता त्यांचा रूचेल, पचेल आणि आत्मसात करता येईल असा उपदेश करणे हा सद्गुरूंचा हेतू असतो. तर्कसुसंगती राखत एखाद्याच ठराविक विचारसरणीचे, साधनपद्धतीचे किंवा साम्यवाद, समाजवाद या सारख्या एखाद्या 'वादाचे' आग्रही प्रतिपादन आणि तदनुषंगिक खंडन मंडन करणे हा शुष्क तत्वज्ञान्यांचा प्रांत आहे. गुरूत्वाचा अधिकार असलेल्या साक्षात्कारी संतांना देखील क्वचित प्रसंगी असे तात्विक प्रतिपादन करावे लागत असले, तरी शिष्यांच्या पारमार्थिक प्रगतीविषयी तळमळ असलेले आणि सहजस्वभावाने करूणामय असलेले रमण महर्षींसारखे सद्गुरू वेगवेगळ्या पूर्वपीठिका बरोबर घेऊन आलेल्या शिष्यांशी संवाद साधताना वरवरच्या तर्कसंगतीला अवास्तव महत्व देत नसतील तर त्यात आश्चर्य कसले?<br />
<br />
रमणाश्रमात भगवान रमण महर्षींचा शिष्यांशी संवाद सुरू व्हायचा होता. आश्रमात आलेल्या यात्रेकरूंमधे पाश्चिमात्य देशातून आलेल्या कृश शरीरयष्टीच्या उतारवयाच्या एका व्यक्तीचाही समावेश होता. या व्यक्तीच्या वागण्याबोलण्यामधे कमालीचे मार्दव होते, शालिनता होती. आल्यापासून ही व्यक्ती अत्यंत मोजकेच आणि मृदु भाषेत बोलत होती. आहार देखील अत्यंत संयत आणि सात्विक होता. महर्षींचा शिष्यांशी संवाद सुरू झाला. अत्यंत अदबशीरपणे ही व्यक्ती मात्र आदरपूर्वक शांतपणे कोपर्यातल्या एका जागी बसून होती. आश्रमात प्रवेश केल्यापासूनच या व्यक्तीच्या प्रत्येक हालचालीतून आंतरिक शांतता आणि सत्वगुणाचा उत्कर्ष दिसून येत होते. पुढे पुढे करणे, आपले महत्व अधोरेखित करणे किंवा आपला प्रश्न विचारण्यासाठी धडपड करणे तर सोडाच, महर्षींचा एक दोन तास संवाद सुरू असताना ही व्यक्ती जणू काही समाधी अवस्थेत असावी तशी निश्चलपणे बसून होती. प्रश्नोत्तरे संपली आणि तेथून प्रस्थान करण्यासाठी महर्षी आपल्या जागेवरून उठले. श्रोत्यांची पांगापांग होत होती. एका कोपर्यात निश्चलपणे बसलेल्या त्या वृद्ध व्यक्तीची दखलही कुणी घेतली नाही. दोन चार पावले पुढे आल्यावर महर्षींची नजर या व्यक्तीवर पडली. क्षणभर त्या व्यक्तीशी महर्षींची नजरानजर झाली. काही मोजकेच क्षण महर्षींची कृपादृष्टी त्या व्यक्तीकडे रोखलेली होती. महर्षीच्या चेहर्यावर त्यांचे अत्यंत विलोभनीय असे स्मितहास्य तरळले. त्या व्यक्तीच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. शाब्दिक संवाद असा काही झालाच नाही. रात्रीच्या भोजनानंतर त्या व्यक्तीने तिरूवन्नमलै सोडले. पुन्हा ही व्यक्ती कुणालाच दिसली नाही. 'गुरोस्तु मौन व्याख्यानं, शिष्यास्तु छिन्नसंशयः' अशा प्रकारची ती 'मौनी दीक्षा' होती. अध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत परिपक्व असलेल्या उच्च कोटीच्या साधकांसाठी भगवान रमण महर्षींकडून कुठल्याही औपचारिक विधीचा किंवा आलंबनाचा अंतर्भाव नसलेली मौनी दीक्षा प्रदान होत असे.<br />
साधकांच्या परिपक्वतेनुसार रमण महर्षींनी दिलेल्या उत्तरांची उदाहरणे पुढील भागात पाहू या.<br />
<br />
प्रश्नः इहवाद केंद्रित (ऐहिक) दृष्टीचा लोप झाल्यावरच सहजस्थितीची अनुभूती संभवते. पण (व्यावहारिक जीवन जगत असताना) हे साध्य कसे होईल?<br />
<br />
रमण महर्षी: मनाचा लय झाला की सारे जग लयाला जाते. मन हेच जगाचे उगमस्थान आहे. त्याचा लोप झाला की सहजस्थिती आपोआप दृगोचर होते. स्वरूप सातत्याने 'मी' 'मी' अशा अहंस्फुरणेने स्वत:ची जाणीव करून देत असते. ते स्वयंप्रकाशी आणि स्वसंवेद्य असते. ते नेहेमी 'आत्ता आणि इथेच' अस्तित्वात असते. त्या सर्वव्यापी चैतन्यातच आपला देखील समावेश असतो. पाण्यात पोहणार्या मासोळीने पाण्याचा शोध घ्यावा, तद्वत आपण या स्वरूपाचा शोध का बरे घ्यावा? आपल्या पूर्वासुरींनी सांगूनच ठेवले आहे - 'आपल्या दृष्टीला ज्ञानात विलीन करेल, त्याला सारे जग ब्रह्मस्वरूपच दिसेल' (सर्वं खलु इदं ब्रह्म).<br />
<br />
प्रश्नः मान्य आहे, कालांतराने योग्य वेळ आली की हे मला पण उमजेल.<br />
रमण महर्षी: तुम्ही या क्षणी तेच आहात (तत्वमसि). स्थळ, काळ आणि परिस्थितीने स्वरूप कधीच प्रभावित होत नाही. उलटपक्षी या सगळ्या गोष्टींचा स्वरूपातच समावेश असतो. तुम्ही सभोवताली जे काही पाहता ते सगळे तुमच्या आतच सामावलेले असते (पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी). एक किस्सा सांगून हे स्पष्ट करता येईल.<br />
<br />
एका धनाढ्य स्त्रीच्या गळ्यात एक महागडा मणिहार होता. एकदा घाईगडबडीत तिला त्याचा विसर पडला आणि तिची अशी समजूत झाली की आपला मणिहार हरवलेला आहे. ती चिंताग्रस्त झाली आणि तिने घरभर त्या मणिहाराचा शोध घेतला पण तो काही सापडला नाही. तिने परिचितांना आणि कुटुंबातल्या सदस्यांना त्या मणिहाराविषयी काही माहिती आहे का असे विचारले, तसेच तो शोधायला मदत करा अशी विनंती केली. सगळ्यांनी नन्नाचा पाढा वाचला. शेवटी एका मैत्रिणीच्या लक्षात सगळा प्रकार आला. आपल्या मैत्रिणीची चिंता दूर व्हावी यासाठी तिने आश्वासक स्वरात मणिहार गळ्यातच आहे हे त्या धनाढ्य स्त्रीच्या लक्षात आणून दिले. हा सगळा गोंधळ सुरू असताना मणिहार आपल्या गळ्यातच होता हे लक्षात आल्याने ती धनाढ्य स्त्री हरखून गेली. इतरांनी मणिहार सापडला का असे विचारले असता ती म्हणाली, "हो, तो मणिहार नुकताच सापडला आहे." आपला हरवलेला दागिना सापडला आहे अशीच तिची भावना झालेली होती.<br />
<br />
आता हे लक्षात घ्या की तिचा हार खरोखर हरवलेला होता का? तो तर सतत तिच्या गळ्यातच तर होता! पण तिच्या भावना देखील समजून घ्या. हरवलेली मौल्यवान वस्तू मिळावी तशी ती हरखून गेलेली होती. आपल्या सगळ्यांची हीच तर कथा आहे. कधी काळी स्वरूप साक्षात्कार घडेल अशा समजूतीने आपण जगत असतो, मात्र आपण कुठल्याही क्षणी इतर कुठलीही गोष्ट नसून स्वरूपच तर असतो!<br />
<br />
प्रश्नकर्ता: वेल्लोरला असताना मी सतत अस्वस्थ आणि नाराज असतो. आपल्या सहवासात मात्र मला स्थैर्य आणि आनंदाची अनुभूती येते.<br />
रमण महर्षी: या ठिकाणी मिळणारा आनंद हा खराखुरा आत्मिक आनंद आहे का? आपण असे म्हणता की इथून दूर जाताच तुम्ही परत दु:खीकष्टी होता. याचाच अर्थ असा, की इथे अनुभवता आलेला आनंद हा परिपूर्ण आणि शाश्वत असा आनंद नाही. त्यात दु:ख लपलेले आहे, जे इतरत्र जाताच जाणवायला लागते. तुमचा हा तथाकथित आनंद स्थळ, काळ आणि परिस्थिती सापेक्ष आहे. (अध्यात्मिक दृष्ट्या) उपयुक्त ठरण्यासाठी तुमचा आनंद शाश्वत असायला हवा. स्वरूपी लीन व्हा आणि अनुभवा की तो खरा निर्भेळ आनंद आहे. तुम्ही निरंतर स्वरूपच आहात.<br />
<br />
तुम्हाला तुमचे 'असणे' नाकारता येत नाही. हे 'असणे'च सच्चिदानंद स्वरूप आहे. स्वरूपाचा साक्षात्कार ही सततची स्थिती आहे. नित्यसिद्ध अशा स्वरूपाची आस धरावी आणि महत्प्रयासाने साक्षात्कार करून घ्यावा अशी वास्तविक पाहता गरजच नाही.<br />
<br />
अस्तित्वात असल्याशिवाय तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही. आपले असणे तुम्हाला मान्य करावेच लागेल. हे उपाधीरहित निव्वळ 'असणे'च तुमचे स्वरूप आहे, ज्याची प्रचिती तुम्हाला क्षणोक्षणी येतेच आहे. त्यामुळे तुम्ही घेतलेले सगळे कष्ट फक्त आपल्याला स्वरूप साक्षात्कार झालेला नाही अशी चुकीची समजूत आपण करून घेतलेली आहे हा बोध होण्यातच खर्ची पडणार आहे. साक्षात्कारात नित्यनूतन असे काहीच नसते. ती एक सनातन स्थिती आहे. भ्रमाचे आवरण दूर सारले की ती आपोआप प्रकट होते.</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-51703071917373730902020-02-09T06:15:00.000-08:002021-05-11T07:15:18.393-07:00विभाग १ - स्वरूपबोध - प्रकरण १ - 'स्व' चे मूळ स्वरूप<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
विभाग १ - स्वरूपबोध - प्रकरण १ - 'स्व' चे मूळ स्वरूप<br />
<br />
'द सेल्फ' किंवा स्व-स्वरूप ही संकल्पना भगवान रमण महर्षींच्या बोलण्यात वारंवार येत असे. पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या लेखनातही 'स्वामी म्हणे लागे अवीट आनंद, लागलासे छंद स्वरूपाचा' या सारखे उल्लेख ठिकठिकाणी आहेत. रमण महर्षींनी उल्लेख केलेल्या स्वरूपाच्या बाबतीत पुढील गोष्टी लक्षात घेण्याजोग्या आहेतः<br />
<br />
'स्वरूपाचा' अर्थ आपले व्यक्तिमत्व असा नसून ती संकल्पना एका निर्वैयक्तिक आणि सर्वसमावेशक अशा विशुद्ध चैतन्याच्या अखंड अनुभूतीकडे इशारा करते. अहंकार, अस्मिता इत्यादिंच्या परिघात इंद्रियांच्या संयोगाने आलेल्या अनुभवांमुळे जन्माला आलेला, तसेच संस्कारांनी आणि वासनांनी बद्ध असलेला व्यक्तिमत्वदर्शक 'मी' आणि स्व-स्वरूप यात गल्लत होता कामा नये. खरे स्व-स्वरूप निरंतर अस्तित्वात असल्याने ते अनुभवता येणे सहज शक्य आहे. मात्र तसे घडताना दिसत नाही. या बाबतीत महर्षी असे प्रतिपादन करत असत की मुळात अमर्याद असलेल्या चैतन्याभोवती काल्पनिक मर्यादा निर्माण करून बंधनात जखडलेली स्थिती अनुभवण्याची मनाची जन्मोजन्मी जोपासली गेलेली प्रवृत्ती नष्ट झाल्याखेरीज खर्या 'स्व' विषयीची सजग जाणीव होणे संभवत नाही. एकसंध आणि निरंतर अशा स्वरूपाच्या सजग जाणीवेसच आत्मसाक्षात्कार म्हणता येईल.<br />
<br />
सच्चिदानंद, देव, ज्ञान, ह्रदय, तुरिय/ तुर्यातीत, 'आत्मन' तसेच 'सहज स्थिती' अशा अनेकविध संकल्पनांचा उल्लेख रमण महर्षी स्व-स्वरूपाचे किंवा आत्मसाक्षात्कारी स्थितीचे समानार्थी किंवा पर्यायवाचक शब्द या स्वरूपात करत असत. रमण महर्षींचा देव सगुण साकार स्वरूपात नसून या जगाचे रहाटगाडगे चालवणारी एक निराकार शक्ती असे त्याचे स्वरूप आहे. हा देव विश्वाची उत्पत्ती करणारा नसून दृश्य जगाशी त्या शक्तीचा स्वरूप संबंध आहे. ईश्वराच्या अमर्याद चैतन्याच्या एका यःकिंचीत अंशाचे मूळ शक्तीपासून कधीच विभक्त न होणारे प्रकट स्वरूपच आपल्याला ब्रह्मांडाच्या स्वरूपात अनुभवता येते असा या स्वरूप संबंधाचा अर्थ होतो. ब्रह्मांडाच्या अस्तित्वाचा किंवा नास्तित्वाचा मूळ ईश्वरी शक्तीवर काहीच परिणाम होत नाही, तसेच व्यक्त स्वरूपातल्या ब्रह्मांडातल्या कार्यकलापांच्या कर्तृत्वाचा आरोपही ईश्वरावर करता येत नाही.<br />
<br />
प्रश्नः (या जगातली) वास्तविकता (सत्य) नेमकी काय आहे?<br />
रमण महर्षी: सत्य (किंवा वास्तविकता) हे निरंतर सत्यच असले पाहिजे. नाम आणि रूपाने बनलेल्या जगताबद्दल तसे म्हणता येत नाही. ज्या आधारशक्तीच्या बळावर नामरूपात्मक जगत अस्तित्वात येते ती खरी चिरंतन वास्तविकता आहे. ती स्वभावानेच बंधनरहित आणि अनंत आहे. स्वतः सत्यस्वरूप असूनही ही वास्तविकताच आभासी मृगजळासारख्या वस्तुमात्रांचा आधारवड बनून राहते. शाश्वत सत्यस्वरूप जे काही आहे आणि जसे काही आहे ते नेहेमी तसेच राहते. त्याचे वर्णन करू पाहता वाचा खुंटते. अस्तित्व किंवा नास्तित्व या सारख्या संकल्पनांच्या पलीकडची ती चिरंतन आणि स्वयंसिद्ध स्थिती आहे. जेव्हा भौतिक वस्तुंविषयीच्या भ्रामक ज्ञानाचा अज्ञानासमवेत पूर्णपणे निरास होतो, तेव्हा विशुद्ध चैतन्यस्वरूप असलेली वास्तविकता आपोआप प्रकट होते. हेच खरे स्व-स्वरूप आहे किंवा आत्मज्ञान आहे. या ब्रह्मस्वरूपात स्वसंवेद्य अशी शुद्ध जाणीव प्रकर्षाने असते, तसेच अज्ञानाचा लेशमात्रही तिथे शिल्लक नसतो.<br />
<br />
बाह्य जगताची जाणीव असलेली स्थिती (उदा. जागृती) तसेच जाणीव नसलेली स्थिती (उदा. निद्रा) या दोन्हींना व्यापून उरणारी, तसेच पाप, ताप आणि दैन्यापासून मुक्त असलेली स्वयंप्रकाशी अशी विदेही स्थिती हे तुमचे खरे निजस्वरूप आहे. ही स्थिती अंतर्बाह्य मौनानेच अभिव्यक्त होते. सगळे ज्ञानीजन असा निर्वाळा देतात की कुठल्याही स्थळ, काळ आणि परिस्थितीत अबाधित राहणारी अशी ही अंतिम ज्ञानावस्था आहे. विशुद्ध ज्ञान हेच वैराग्य आहे, तेच खरेखुरे सोवळे आहे आणि तेच ईश्वरी साक्षात्कारही आहे. ज्यात क्षणभराचेही आत्मविस्मरण संभवत नाही असे ज्ञान हेच अमरत्व आहे, त्यातच सर्वज्ञता आहे. कैवल्य ज्ञान हेच खरे तर साधकासाठी सारसर्वस्व आहे.<br />
<br />
प्रश्नः आत्मस्वरूप जर स्वयंप्रकाशी, नित्य, स्वयंसिद्ध आणि स्वसंवेद्य असेल तर आत्ता या क्षणी मला त्याची जाणीव का होत नाही?<br />
रमण महर्षी: द्वैत वास्तविक पाहता अस्तित्वातच नाही, मात्र तुम्ही आत्ता ज्याला ज्ञान समजता आहात ते अहंभावातून निपजलेले आहे. असे ज्ञान हे साहजिकच स्थळ काळ आणि परिस्थिती सापेक्ष असते. सापेक्ष ज्ञानासाठी दृष्य वस्तु आणि द्रष्टा दोन्ही अनिवार्य आहेत, मात्र स्वसंवेद्यता ही परिपूर्ण स्थिती असल्याने तिला दृष्य वस्तु आणि द्रष्टा अशा द्वैताची गरज नसते.<br />
<br />
स्मरण ही अशीच एक सापेक्ष गोष्ट आहे, जिथे स्मरणात ठेवायची वस्तु आणि स्मरण करणारा दोहोंची अनिवार्यता आहे. जिथे द्वैतच अस्तित्वात नाही, तिथे कोण कोणाचे स्मरण करेल? तुमचे खरे स्वरूप हे शाश्वत आणि चिरंतन आहे. प्रत्येकालाच आपल्या मूळ स्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे. मात्र मला हे व्यवस्थित समजावून सांगा, की 'पहावे आपणासी आपण' अशी प्रचिती मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकी कुठल्या स्वरूपात मदत अपेक्षीत आहे?<br />
<br />
लोकांना एखादी नाविन्यपूर्ण घटना घडावी अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार अपेक्षित असतो. असा भ्रामक समज करून घेण्यात मुळातच आंतरिक विसंगती आहे, कारण आत्मस्वरूप चिरंतन आणि अखंड असल्याने त्यात कुठलेच परिवर्तन संभवत नाही. साधकांना दिव्य प्रकाश, नाद वगैरे अनुभवांची लालसा असते. आत्मस्वरूप तसे कसे असू शकेल? ते प्रकाश आणि अंधार या सारख्या द्वैताच्या पल्याड असते. (प्रचिती घेता आली तरी) आत्मस्वरूपाची व्याख्या करता येणे शक्य होत नाही. ते जसे असते तसेच सत्य सनातन असते.<br />
<br />
'मी आहे', अहंस्फुरणाची ही उपाधीरहित विशुद्ध जाणीवच आत्मस्वरूपाची त्यातल्या त्यात चांगली व्याख्या आहे असे म्हणावे लागेल. श्रुतिवचनांमधे आत्म्याचे वर्णन अंगुष्ठमात्रा एवढा, केशाग्रासारखा, विजेच्या ठिणगीसारखा, अमर्याद, सूक्ष्माहूनही सूक्ष्म असे नानाविध प्रकारे केलेले दिसते. वास्तविक पाहता हा सगळा पूर्णपणे निराधार असा कल्पनाविलास आहे. (व्यावहारिक दृष्ट्या) आपण ज्याला ज्ञान आणि अज्ञान असे म्हणतो, त्या पेक्षा वेगळे असे हे आत्मस्वरूपाचे ज्ञान आहे. (व्यावहारिक दृष्ट्या) आपण ज्याला तथ्यपूर्ण आणि तथ्यहीन म्हणतो, त्या दोन्हीपेक्षा वेगळे असे हे शाश्वत सत्य आहे. त्याची व्याख्या करायची तरी कशी? हे सत्य जाणता येत नाही, ते जाणण्यासाठी स्वतःच सत्यस्वरूप होउन जावे लागते!</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-27043297261901984302020-02-08T23:59:00.002-08:002021-05-11T07:15:07.398-07:00भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: प्रस्तावना<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
|| श्री गणेशाय नमः ||<br />
<br />
भगवान दक्षिणामूर्ती आणि भगवद्पाद पूज्य श्री आदि शंकराचार्य प्रणित अद्वैत वेदांताची परंपरा अखंड ठेवणार्या, तसेच आधुनिक काळाशी सुसंगत पद्धतीने 'आत्मविचार' या साधनापद्धतीचे पुनरुज्जीवन करणार्या भगवान श्री रमण महर्षीं या लोकोत्तर ज्ञानी सत्पुरुषाविषयी मराठी भाषेत फारसे साहित्य उपलब्ध नाही. हे लक्षात घेता आंतरजालावरच्या मराठी साहित्यसागरात भगवान श्री.रमण महर्षींविषयी थोडीफार भर घालावी असा मानस आहे.<br />
<br />
महर्षींची शिकवण आणि त्यांचा उपदेश या विषयीचा 'प्रमाण ग्रंथ' अशी मान्यता डेव्हिड गॉडमन यांनी महत्प्रयासाने संकलित केलेल्या 'बी अॅज यू आर' या ग्रंथालाच जगभर विखुरलेल्या रमणभक्तांकडून मिळालेली दिसते. महर्षींनी कधीच औपचारिक स्वरूपाची व्याख्याने किंवा प्रवचने दिली नाहीत. महर्षींना वेळोवेळी भेटलेल्या साधकांशी घडलेल्या त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपाच्या संवादांचे अध्यात्मिक मोल देशोविदेशीच्या साधकांना उमगत गेले, आणि प्रश्नोत्तर स्वरूपात या संवादांचे संकलन आणि अनुवाद करण्याचा परिपाठ सुरू झाला. श्री. गॉडमन यांनी वेगवेगळ्या कालखंडातल्या या संवादांचे संकलन तर केलेलेच आहे, त्या जोडीला चर्चिल्या गेलेल्या विषयांच्या अनुषंगाने वर्गवारी करून सुरेख मांडणीही केलेली आहे. प्रत्येक विषयाला अनुसरून अत्यंत समर्पक अशी प्रस्तावनादेखील श्री. गॉडमन यांनी लिहीलेली आहे. हा सगळा भाग मुळातूनच वाचण्यासारखा आहे. ग्रंथाचे पुढील प्रमाणे सहा विभाग आहेतः १. स्वरूपबोध २. आत्मविचार आणि शरणागती ३. सद्गुरू ४. ध्यान आणि योग ५. प्रचिती आणि ६. अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोह.<br />
<br />
गॉडमन यांच्या क्रमवारीशी सुसंगती ठेवत त्यातील निवडक भागाचा अनुवाद करून तसेच पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंद या सत्पुरूषाच्या लेखनातले काही संदर्भ घेत या पुस्तकाचे सिंहावलोकन करण्याचा प्रयत्न करणार आहे. महर्षींविषयी मराठी भाषेत फारशी पुस्तके उपलब्ध नाहीत, हे लक्षात घेता आंतरजालावर मराठीत उपलब्ध असलेल्या विशाल ज्ञानसागरात महर्षींविषयक माहिती उपलब्ध करून देण्यात खारीचा वाटा उचलणे इतकाच या लेखनामागचा उद्देश आहे. संदर्भासाठीचे साहित्य (रेफरन्स मटेरियल) स्वरूपाचे हे लेखन आहे हे पुन्हा एकदा नमूद करत लेखनाचा श्रीगणेशा करतो.<br />
<br /></div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4742910282046508774.post-75039027759020493542019-12-30T21:01:00.000-08:002020-06-02T23:19:38.892-07:00रमण महर्षी - संक्षिप्त चरित्र<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="background-color: white; color: #222222; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">रमण महर्षी हे आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेले सद्गुरू आहेत. विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा या दक्षिण भारतीय संतांचा कार्यकाळ होता. १८९७ साली तमिळनाडूमधे मदुराईजवळच्या एक खेड्यात त्यांचा जन्म झाला. वडिलांचा शेतीचा व्यवसाय होता. त्यांच्या तीन पुत्रांपैकी महर्षी हे दुसरे अपत्य होते. महर्षींचे कुटुंब धार्मिक वळणाचे होते. कुलदेवतांची विधीवत सेवा करणे तसेच मंदिराना भेटी देण्याचा त्यांचा परिपाठ होता. या कुटुंबाच्या इतिहासात एक आगळीवेगळी घटना घडलेली होती. अवधूत अवस्थेत भ्रमण करणार्या एका योगी पुरूषाला भिक्षा नाकारण्याची कोंण्या पूर्वजाकडून आगळिक घडल्याने त्याने या कुटुंबाबद्दल शापवाणी उच्चारलेली होती. महर्षींच्या अय्यर परिवारात प्रत्येक पिढीत एक तरी पुरूष सर्वसंगपरित्याग करून संन्यस्त जीवन जगेल असा शाप त्या योग्याने दिलेला होता.</span><br />
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, helvetica, sans-serif;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, helvetica, sans-serif;">
शालेय जीवनात छोट्या रमणला फारसे स्वारस्य नव्हते. आपले काम करतानाही तो वेगळ्याच तंद्रीत असायचा. अंतर्मुख होणे आणि आत्मपरीक्षण करण्याकडे त्याचा खास ओढा होता हे मात्र सहज दृगोचर होत असे. आपली खरी ओळख नेमकी काय आहे याविषयीचे मूलगामी प्रश्न, उदा. "मी कोण आहे?" तो विचारत असे. आपल्या स्वरूपाची खरी ओळख आणि त्याचे उगमस्थान याविषयी असलेले गूढ उलगडावे असा निदीध्यासच त्याने घेतला होता असे म्हणावे तर ते अतिशयोक्त ठरणार नाही.<br />
<br />
छोट्या रमणच्या व्यक्तित्वाची आणखी एक खासियत अशी की तो अत्यंत गाढ निद्रा घेत असे. निद्रादेवीच्या अधीन असताना त्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवले किंवा अगदी चोपून काढले तरी त्याची झोपमोड होत नसे. गमतीने महिनोमहिने झोप घेणार्या रामायणातल्या एका पात्रावर बेतलेली 'कुंभकर्ण' अशी उपाधीही त्याला प्रदान करण्यात आलेली होती.<br />
<br />
१८९६ च्या उन्हाळ्यात छोट्या रमणने चित्ताची एक वेगळीच अवस्था (जागृती, निद्रा आणि सुषुप्तीपलीकडची तुर्यावस्था) अनुभवली, जिचा त्याच्यावर अगदी खोलवर परिणाम झाला. त्याला एक विलक्षण प्रचिती आली जिचा आपला मृत्यु आणि पुनर्जन्म याची देही याची डोळा अनुभवला आहे असा अन्वयार्थ त्याने लावला. आपले अस्तित्व या देहाच्या पलीकडे आहे ही स्पष्ट अनुभूती देणारे काही दिव्य अनुभव त्याच्या चिदाकाशात विजेचा कडकडाट व्हावा तसे अतर्क्य पद्धतीने चमकून गेले. या घटना घडत असताना भौतिक शरीर किंवा आजूबाजूचे स्थूल जगत दोन्हींवर अवलंबून नसणारी अशी एक शाश्वत, नित्य आणि सनातन अशी सद्वस्तु आपण आहोत ही प्रगाढ प्रचिती त्याला अनुभवता आली.</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, helvetica, sans-serif;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: small;">
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px;">
या सगळ्या विलक्षण आंतरिक दृष्टांतांच्या जोडीलाच 'अरूणाचल' या शब्दाविषयीचे अनिवार आकर्षणही रमणला जाणवत असे. अरूणाचलाबरोबर असेलेले उत्कट भक्तीभावनेचे नाते गहिरे होत होते, त्या जोडीलाच या एका शब्दाभोवतीच नियतीने आपले जीवन गुंफलेले आहे असेही रमणला जाणवत असे. वयाच्या सोळाव्या वर्षी योगायोगाने अरूणाचल नाव असलेला एक पर्वत खरोखरच अस्तित्वात आहे ही माहिती रमणपर्यंत पोचली आणि त्याच्या आनंदाला पारावारच उरला नाही. आज आधुनिक सुविधा असलेले तिरूवन्नमलै हे गाव या पर्वताभोवतीच वसलेले आहे.</div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px;">
रमणचे शालेय शिक्षण संपत आलेले होते, आणि त्या सुमारासच कुणीतरी अत्यंत बेदरकारपणे रमण कुठलेही शिक्षण घेण्यासाठी लायक नाही अशा स्वरूपाची टीका त्याच्यावर केली. उद्विग्न होउन शिक्षणाला रामराम ठोकण्याचा ठाम निर्णय रमणने त्याच वेळी घेतला. विख्यात तमिळ संतांविषयीची पुस्तके वाचण्याची रमणला उपजतच गोडी होती, त्यामुळे घरादाराचा त्याग करून धार्मिक साधकाप्रमाणे जीवन व्यतित करावे या निष्कर्षापर्यंत रमण पोचला. साहजिकच आपल्या धार्मिक श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या अरूणाचलाकडे प्रस्थान ठेवावे असे त्याने ठरवले.</div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px;">
<br /></div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px;">
वयाच्या सतराव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करत रमणने अरूणाचल गाठण्यासाठी वाटचाल सुरू केली. चार दिवसांच्या बहुतांशी रेल्वेने केलेल्या खडतर प्रवासानंतर तो अरुणाचली पोचला. तिथे पोचल्यावर तो थेट मंदिराच्या गाभार्यात उभा ठाकला आणि तिथल्या शिवलिंगासमोर उभे राहून त्याने आपले मनोगत व्यक्त केले - "ईश्वरी आदेशानुसार मी सर्वसंगपरित्याग करून आज येथे (आपल्या कर्मभूमीत) दाखल झालेलो आहे."</div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px;">
अरूणाचल पर्वताच्या परिसरातल्या मंदिरांमधे आणि गुहांमधे ध्यानस्थ अवस्थेत, अध्यात्मिक चित्तशुद्धीचा ध्यास घेत आणि शुकासारखे पूर्ण वैराग्य आणि मौन पाळत रमणने दहा वर्षे व्यतित केली. या कालखंडात लोकांनी विक्षीप्त ठरवलेल्या आणि एकांतात राहणार्या शेषाद्री स्वामी या योगी पुरूषाने पुत्रवत रमणचा सांभाळ केला. याच सुमारास अध्यात्माच्या प्रांतातले एक अधिकारी सद्गुरू 'ब्रह्म स्वामी' या नावाने रमणची ख्याति व्हायला लागली आणि साधकांनी या स्वामींच्या भेटीला येणेही सुरू झाले. या शिष्यवर्गापैकी काही लोक हे प्रकांड पंडितही होते, त्यांच्याकडून अध्यात्मपर काही पवित्र ग्रंथांचाही लाभ रमणला होत असे. दक्षिण भारतातल्या अनेकविध भाषांमधले ग्रंथ वाचून धार्मिक प्रांतातल्या पंथ परंपरांविषयीची मोलाची माहितीही याच काळात त्याने आत्मसात केली.</div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px;">
<br /></div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px;">
सुरूवातीच्या कालखंडात रमणच्या पार्श्वभूमिविषयी जाणून घेताना त्याच्या मातृभाषेतून संवाद साधूनही शिष्यवर्गाला बरीच अडचण येत असे, कारण रमण बोलणे टाळत असे आणि आपले मौन भंग होउ देत नसे. जसजसा काळ लोटला तशी ही मौनी साधूची अवस्था हळूह़ळू मागे पडली आणि आश्रमसदृश वातावरणात अत्यंत संयत आणि सहज व्यावहारिक जीवन व्यतित करण्याची सुरूवात झाली. </div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px;">
<br /></div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px;">
भारतातून तसेच परदेशातून आपल्या नानाविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी अगणित साधक या स्वामींकडे यायला लागले. या शिष्यांपैकी गणपती मुनि हे स्वतः एक महान योगी पुरूष होते. व्यंकटरमण अय्यर या जन्मनावातील 'रमण' हा शब्द घेऊन स्वामींचे 'भगवान श्री रमण महर्षी' असे नामकरण गणपति मुनिंनीच केले, आणि पुढे तेच जनमानसात रूढ झाले. कालौघात रमण महर्षींच्या शिष्यवर्गाने अरूणाचल पर्वताच्या सान्निध्यात एका मंदिराची (मातृमंदिर) तसेच एका आश्रमाची निर्मिती केली. या आश्रमात कित्येक यात्रेकरूंच्या निवासाची व्यवस्था होउ शकते.</div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px;">
आश्रमातल्या जीवनशैलीचे वर्णन असे करता येईल - रमण महर्षी आश्रमाच्या स्वयंपाकघरात स्वतः पहाटेपासून कार्यरत असत. न्याहारी किंवा भोजनाच्या वेळी इतर शिष्यगणांसोबतच अन्नग्रहण करण्याचा महर्षींचा शिरस्ता होता. आपल्याला कुठलीही खास सुविधा किंवा सवलत दिलेली त्यांना खपत नसे. कुठलाही पदार्थ असो तो सर्वांना मिळाला अशी खात्री करून घेत मगच तो ते स्वतःच्या पानात घेत असत. श्री रमणाश्रम ही जागा अरूणाचलाच्या परिसरातील पशु पक्ष्यांसाठी एक भयमुक्त संचार करता येईल असे आश्रयस्थान होते (आजही तसेच आहे). आश्रमाच्या परिसरातली माकडे, गायी, खारी तसेच मोर आणि इतर पक्षी यांच्याविषयी महर्षींना मोठाच जिव्हाळा होता. प्राण्यांना हिडीस फिडीस करणे तर दूरच, महर्षींनी प्रत्येक प्राण्याचे नामकरण केलेले होते, आणि या नावानेच ते प्रत्येकाचा कटाक्षाने आदरपूर्वक उल्लेख करत असत.</div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px;">
<br /></div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px;">
"मी कोण आहे?" या प्रश्नातून अभिव्यक्त होणारी, आपल्या स्वरूपाचा शोध घेणारी 'आत्मविचार' ही साधनाच महर्षींनी निरंतर सुरू ठेवली. मंत्र दीक्षा देणे किंवा नियमीत उपदेश करणे या दृष्टीने पाहता रमण महर्षी हे पारंपारिक पद्धतीचे गुरू नव्हते असेच म्हणावे लागेल. अगदी खरे सांगायचे तर एखाद्या साधकाने मंत्र जपाची साधना करण्याची ईच्छा व्यक्त केलीच, तर महर्षी संस्कृत भाषेतले मंत्र किंवा ईश्वराच्या अनेक नामांपैकी एखादे नाम न सांगता 'मी' ही सहज होणारी जाणीव किंवा 'मी आहे' या अहंस्फुरणाकडे लक्ष पुरवायला सांगायचे. त्या योगे साधकाचे चित्त बाह्य शब्द किंवा वस्तुकडे आकृष्ट न होता त्याच्या 'शुद्ध अस्तित्वाचे' किंवा स्वत:च्या सच्चिदानंद स्वरूपाचे गूढ थेटपणे उलगडण्यासाठीच मनाची एकाग्रता व्हावी असा हेतू असे. </div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px;">
<br /></div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px;">
असे असले तरी रमण महर्षींनी अनौपचारिक पद्धतीने दीक्षा देण्याची अनेक उदाहरणे आहेत. या दीक्षा निव्वळ कृपाकटाक्षाने, अनाहूतपणे केलेल्या स्पर्शाने आणि स्वप्न दृष्टांताने घडून येत असत. महर्षींच्या उपस्थितीत अशी काही विलक्षण ताकद होती, की त्यांनी वरपांगी काहीच कृती केली नाही तरी आश्रमात आलेल्या यात्रेकरूंवर त्यांच्या सहवासाने खोलवर प्रभाव पडत असे. महर्षींची भेट झाल्यावर कित्येक परिपक्व साधकांच्या उर्वरित आयुष्याचा प्रवाहच क्षणार्धात बदलून जात असे. रमण महर्षींनी कित्येक साधकांना स्वप्नात दर्शन देत आणि फक्त काही क्षणांच्या उत्कट नजरानजरेने दीक्षा दिल्याची उदाहरणे आहेत. शेकडो मैलांवर असलेल्या शिष्यांना एका तेजःपुंज आकृतीच्या स्वरूपात महर्षींनी दर्शन द्यावे आणि मग कालांतराने ती आकृती म्हणजेच महर्षी असा त्या शिष्याला प्रत्यक्ष भेटीत उलगडा व्हावा असेही घडलेले आहे.</div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px;">
<br /></div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px;">
शेवटच्या काही वर्षात महर्षींना असाध्य अशा कर्करोगाने ग्रासले होते. त्यांना गमावण्याबद्दलची चिंता काही भक्तांनी व्यक्त केल्यावर महर्षींनी केलेले एक विधान मोलाचे आहे, "मी कुठेही निघालेलो नाही, मी कोठे जाणार आहे? जिथे माझे अस्तित्व आहे तिथेच मी निरंतर वास्तव्य करून असणार आहे". जन्म आणि मृत्युच्या द्वैताला ओलांडून गेलेल्या जीवनमुक्ताचे हे विधान खूप काही सांगून जाते.</div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px;">
१९५० साली एप्रिल महिन्यात पद्मासनात आसनस्थ होत 'ओम' या एकाक्षरी मंत्राचा उच्चार करत महर्षींनी देहत्याग केला. प्रसिद्ध फ्रेंच छायाचित्रकार कार्टियर-ब्रेसन त्या वेळी आश्रमात उपस्थित होता. परमपवित्र अरूणाचलाच्या सान्निध्यात अनुभवलेल्या महर्षींच्या महानिर्वाणाच्या वेळच्या खगोलशास्त्रीय घटनेचे वर्णन त्यानी असे केले आहे - "आकाशात मला एक तेजस्वी शेपटी असलेला तारा अचानक उदयाला आलेला आणि मग संथगतीने मार्गक्रमण करताना दिसला. इतके सुंदर दृष्य मी आयुष्यात पाहिलेले नव्हते. अरूणाचलाची जणू एक प्रदक्षिणा करून तो तारा पर्वताच्या माथ्याच्या मागे लुप्त झाला. आम्ही लगेच आमच्या घड्याळाकडे पाहिले. रात्रीचे आठ वाजून सत्तेचाळीस मिनीटे झाली होती. आम्ही तसेच धावत आश्रमात गेलो आणि आम्हाला समजले की नेमक्या त्याच क्षणी आमच्या सद्वुरूंनी आपली लौकिक यात्रा संपवली होती." १४ एप्रिल १९५० च्या त्या दिवशी ही घटना मद्रासच्या सभोवतालच्या गावांमधे कित्येकांनी पाहिली होती. या अलौकिक घटनेचे वृत्तांतही वृत्तपत्रात पुढच्या दिवशी छापून आले होते.</div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px; margin-bottom: 10px;">
महर्षींनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे आजही रमणाश्रमाचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. देश विदेशातून इथे लोटणारा साधकांचा महापूर आजही आटलेला नाही. महर्षींवर गाढ श्रद्धा असलेल्या साधकांना त्यांच्या देही नसण्याची उणीव जाणवत नाही. उलट अरूणाचलाच्या परमपवित्र सान्निध्यात महर्षींच्या अस्तित्वाची आणखीच प्रकर्षाने प्रचिती येते.</div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px;">
|| श्री रमणार्पणमस्तु || </div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px;">
<br /></div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px;">
<span style="color: #222222; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif; font-size: x-small;">संदर्भः </span><a data-saferedirecturl="https://www.google.com/url?q=http://www.om-guru.com/html/saints/maharshi.html&source=gmail&ust=1577854312410000&usg=AFQjCNEUxIwJTpo7XD3d6GfLEgA_mRVcNw" href="http://www.om-guru.com/html/saints/maharshi.html" style="color: #1155cc; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: small;" target="_blank">http://www.om-guru.com/html/<wbr></wbr>saints/maharshi.html</a></div>
<div style="box-sizing: border-box; color: #333333; font-family: "Noto Sans", sans-serif; font-size: 16px;">
<br /></div>
</div>
</div>
Rahul Aptehttp://www.blogger.com/profile/09285759111186891832noreply@blogger.com0